शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्ह्यात काँग्रेस, अपक्षांचा टक्का घसरणार

By admin | Updated: October 18, 2014 00:48 IST

जिल्ह्यात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, अपक्ष उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली होती. मात्र; यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वेगळे निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमरावती : जिल्ह्यात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, अपक्ष उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली होती. मात्र; यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वेगळे निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी काँग्रेस, अपक्षांची संख्या रोडावेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चार उमेदवार निवडून आले होते. यात तिवसा येथून यशोमती ठाकूर, अमरावतीतून रावसाहेब शेखावत, मेळघाटमधून केवलराम काळे तर धामणगाव रेल्वे मतदारसंघातून वीरेंद्र जगताप यांचा समावेश होता. अपक्ष म्हणून बडनेऱ्यातून रवी राणा, मोर्शीतून अनिल बोंडे तर अचलपुरातून बच्चू कडू विजयी झाले होते. शिवसेनेला दर्यापूर मतदारसंघात विजय मिळविता आला. परंतु या निवडणुकीत युती, आघाडी संपुष्टात आल्यानंतर भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणुका लढविल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अख्खा महाराष्ट्र भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंजून काढला. त्यामुळे शहरी भागात मोदीलाटेचा परिणाम जाणवला. भाजपचे शेवटपर्यंत लढतीत नसलेले उमेदवार ऐनवेळी स्पर्धेत आले. हिंदुत्व विचारसरणीच्या मतदारांनी भाजप उमेदवारांच्या बाजुने कौल दिल्याचे चित्र मतदानानंतर स्पष्ट होऊ लागले आहे. गुप्तचर यंत्रणेने सुद्धा हाच अंदाज वर्तविला आहे. चार ते पाच जागा भाजपला मिळतील, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या; आता भाजपला चार जागा मिळण्याचे संकेत आहेत. गत विधानसभा निवडणुकीत तीन जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. मात्र, आता अपक्षाला एकच जागा मिळविता येईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. थोड्या फार मतांचे बदल झाल्यास शिवसेनेला दोन ते तीन जागांवर विजय मिळवता येईल, अशी मतदानानंतरची परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. गत निवडणुकीत एकही जागा भाजपला मिळवता आली नव्हती. मात्र, यंदा चार ते पाच जागांवर विजयाची अपेक्षा आहे. शिवसेनेचे गड असलेल्या बडनेरा, दर्यापूर व तिवसा मतदारसंघात भाजपने दमदार उमेदवार मैदानात आणून सेनेला घाम सुटल्याचे प्रचारादरम्यान दिसून आले. युती, आघाडीची ताटातूट झाल्यानंतर बसपने खाते उघडण्याच्या उद्देशाने धामणगाव, अमरावती, अचलपूर मतदार संघात अनुक्रमे अभिजीत ढेपे, मिर्झा नईम बेग, हाजी रफीक सेठ यांना उमेदवारी देऊन जोरदार ‘फिल्डींग’ लावली. मात्र बसपचा हत्ती फार धावला नाही, असे मतदानानंतर दिसून आले. तरीही बहुजन समाज पक्ष निकालामध्ये महत्वाची भूमिका बजावण्याची चिन्हे आहेत. एकूणच राजकीय विश्लेषकांच्या अंदाजांवरून सध्या तरी जय-पराजयाची गणिते बांधली जात आहेत.