शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात काँग्रेस, अपक्षांचा टक्का घसरणार

By admin | Updated: October 18, 2014 00:48 IST

जिल्ह्यात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, अपक्ष उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली होती. मात्र; यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वेगळे निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमरावती : जिल्ह्यात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, अपक्ष उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली होती. मात्र; यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वेगळे निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी काँग्रेस, अपक्षांची संख्या रोडावेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चार उमेदवार निवडून आले होते. यात तिवसा येथून यशोमती ठाकूर, अमरावतीतून रावसाहेब शेखावत, मेळघाटमधून केवलराम काळे तर धामणगाव रेल्वे मतदारसंघातून वीरेंद्र जगताप यांचा समावेश होता. अपक्ष म्हणून बडनेऱ्यातून रवी राणा, मोर्शीतून अनिल बोंडे तर अचलपुरातून बच्चू कडू विजयी झाले होते. शिवसेनेला दर्यापूर मतदारसंघात विजय मिळविता आला. परंतु या निवडणुकीत युती, आघाडी संपुष्टात आल्यानंतर भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणुका लढविल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अख्खा महाराष्ट्र भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंजून काढला. त्यामुळे शहरी भागात मोदीलाटेचा परिणाम जाणवला. भाजपचे शेवटपर्यंत लढतीत नसलेले उमेदवार ऐनवेळी स्पर्धेत आले. हिंदुत्व विचारसरणीच्या मतदारांनी भाजप उमेदवारांच्या बाजुने कौल दिल्याचे चित्र मतदानानंतर स्पष्ट होऊ लागले आहे. गुप्तचर यंत्रणेने सुद्धा हाच अंदाज वर्तविला आहे. चार ते पाच जागा भाजपला मिळतील, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या; आता भाजपला चार जागा मिळण्याचे संकेत आहेत. गत विधानसभा निवडणुकीत तीन जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. मात्र, आता अपक्षाला एकच जागा मिळविता येईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. थोड्या फार मतांचे बदल झाल्यास शिवसेनेला दोन ते तीन जागांवर विजय मिळवता येईल, अशी मतदानानंतरची परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. गत निवडणुकीत एकही जागा भाजपला मिळवता आली नव्हती. मात्र, यंदा चार ते पाच जागांवर विजयाची अपेक्षा आहे. शिवसेनेचे गड असलेल्या बडनेरा, दर्यापूर व तिवसा मतदारसंघात भाजपने दमदार उमेदवार मैदानात आणून सेनेला घाम सुटल्याचे प्रचारादरम्यान दिसून आले. युती, आघाडीची ताटातूट झाल्यानंतर बसपने खाते उघडण्याच्या उद्देशाने धामणगाव, अमरावती, अचलपूर मतदार संघात अनुक्रमे अभिजीत ढेपे, मिर्झा नईम बेग, हाजी रफीक सेठ यांना उमेदवारी देऊन जोरदार ‘फिल्डींग’ लावली. मात्र बसपचा हत्ती फार धावला नाही, असे मतदानानंतर दिसून आले. तरीही बहुजन समाज पक्ष निकालामध्ये महत्वाची भूमिका बजावण्याची चिन्हे आहेत. एकूणच राजकीय विश्लेषकांच्या अंदाजांवरून सध्या तरी जय-पराजयाची गणिते बांधली जात आहेत.