शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

जिल्ह्यात काँग्रेस, अपक्षांचा टक्का घसरणार

By admin | Updated: October 18, 2014 00:48 IST

जिल्ह्यात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, अपक्ष उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली होती. मात्र; यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वेगळे निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमरावती : जिल्ह्यात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, अपक्ष उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली होती. मात्र; यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वेगळे निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी काँग्रेस, अपक्षांची संख्या रोडावेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चार उमेदवार निवडून आले होते. यात तिवसा येथून यशोमती ठाकूर, अमरावतीतून रावसाहेब शेखावत, मेळघाटमधून केवलराम काळे तर धामणगाव रेल्वे मतदारसंघातून वीरेंद्र जगताप यांचा समावेश होता. अपक्ष म्हणून बडनेऱ्यातून रवी राणा, मोर्शीतून अनिल बोंडे तर अचलपुरातून बच्चू कडू विजयी झाले होते. शिवसेनेला दर्यापूर मतदारसंघात विजय मिळविता आला. परंतु या निवडणुकीत युती, आघाडी संपुष्टात आल्यानंतर भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणुका लढविल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अख्खा महाराष्ट्र भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंजून काढला. त्यामुळे शहरी भागात मोदीलाटेचा परिणाम जाणवला. भाजपचे शेवटपर्यंत लढतीत नसलेले उमेदवार ऐनवेळी स्पर्धेत आले. हिंदुत्व विचारसरणीच्या मतदारांनी भाजप उमेदवारांच्या बाजुने कौल दिल्याचे चित्र मतदानानंतर स्पष्ट होऊ लागले आहे. गुप्तचर यंत्रणेने सुद्धा हाच अंदाज वर्तविला आहे. चार ते पाच जागा भाजपला मिळतील, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या; आता भाजपला चार जागा मिळण्याचे संकेत आहेत. गत विधानसभा निवडणुकीत तीन जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. मात्र, आता अपक्षाला एकच जागा मिळविता येईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. थोड्या फार मतांचे बदल झाल्यास शिवसेनेला दोन ते तीन जागांवर विजय मिळवता येईल, अशी मतदानानंतरची परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. गत निवडणुकीत एकही जागा भाजपला मिळवता आली नव्हती. मात्र, यंदा चार ते पाच जागांवर विजयाची अपेक्षा आहे. शिवसेनेचे गड असलेल्या बडनेरा, दर्यापूर व तिवसा मतदारसंघात भाजपने दमदार उमेदवार मैदानात आणून सेनेला घाम सुटल्याचे प्रचारादरम्यान दिसून आले. युती, आघाडीची ताटातूट झाल्यानंतर बसपने खाते उघडण्याच्या उद्देशाने धामणगाव, अमरावती, अचलपूर मतदार संघात अनुक्रमे अभिजीत ढेपे, मिर्झा नईम बेग, हाजी रफीक सेठ यांना उमेदवारी देऊन जोरदार ‘फिल्डींग’ लावली. मात्र बसपचा हत्ती फार धावला नाही, असे मतदानानंतर दिसून आले. तरीही बहुजन समाज पक्ष निकालामध्ये महत्वाची भूमिका बजावण्याची चिन्हे आहेत. एकूणच राजकीय विश्लेषकांच्या अंदाजांवरून सध्या तरी जय-पराजयाची गणिते बांधली जात आहेत.