शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जनआक्रोश मोर्चासाठी जिल्हा काँग्रेसने कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:05 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने तीन वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना न्याय देण्याऐवजी अन्यायकारक निर्णय घेतले. त्यामुळे भाजप सरकार विरोधात जनतेत तीव्र जनआक्रोश निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपूर्वतयारी : जिल्ह्यातून हजारोवर कार्यकर्ते होणार सहभागी

आॅनलाईन लोकमतअमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने तीन वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना न्याय देण्याऐवजी अन्यायकारक निर्णय घेतले. त्यामुळे भाजप सरकार विरोधात जनतेत तीव्र जनआक्रोश निर्माण झाला आहे.भाजप सरकारच्या जनहितविरोधी धोरणाचा जाब विचारण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात काँग्रेसच्यावतीने दीक्षाभूमीपासून विधिमंडळापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी ३ डिसेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा व तालुका पदाधिकाºयांची बैठक बोलवली होती. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार केवलराम काळे, झेडपीचे सभापती जयंत देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी बबलू देशमुख यांनी भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेत शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांवर अन्याकारक धोरण राबविले. परिणामी जनतेत भाजप सरकारविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्यावतीने हिवाळी अधिवेशनावर जनआक्रोश मोर्चा धडकणार आहे. या मोर्चाच्या नियोजन व सहभागाबाबत पदाधिकाºयांना महत्त्वाच्या सूचना पदाधिकाºयांनी कार्यकर्त्यासह सहभागी होण्याचे आवाहन बबलू देशमुख यांनी केले. सभेला आ. वीरेंद्र जगताप यांनी मार्गदर्शन केले. मोर्चात अ.भा. काँग्रसेचे नेते गुलाबनबी आझाद व अनेक नेते सहभागी होणार असून कार्यकर्त्यांनी हातात काँग्रेस झेंडे घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन केले. सभेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी, तर आभार प्रदर्शन जयंत देशमुख यांनी केले. सभेला भैय्यासाहेब मेटकर, प्रकाश काळबांडे, मनोज देशमुख, राजेंद गोरले, बाळासाहेब हिंगणीकर, महेद्रसिंग गैहलवार, सुभाष पाथरे आदी उपस्थित होते.काँग्रेस पक्षातर्फे शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्यांमध्ये भाजप सरकारविरोधात रोष वाढला आहे. फसवी कर्जमाफी व अन्य प्रश्नामुळे शेतकरी संकटात आहे. यासह इतर प्रश्नांसाठी अधिवेशनावर जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे.- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी