शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

जनआक्रोश मोर्चासाठी जिल्हा काँग्रेसने कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:05 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने तीन वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना न्याय देण्याऐवजी अन्यायकारक निर्णय घेतले. त्यामुळे भाजप सरकार विरोधात जनतेत तीव्र जनआक्रोश निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपूर्वतयारी : जिल्ह्यातून हजारोवर कार्यकर्ते होणार सहभागी

आॅनलाईन लोकमतअमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने तीन वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना न्याय देण्याऐवजी अन्यायकारक निर्णय घेतले. त्यामुळे भाजप सरकार विरोधात जनतेत तीव्र जनआक्रोश निर्माण झाला आहे.भाजप सरकारच्या जनहितविरोधी धोरणाचा जाब विचारण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात काँग्रेसच्यावतीने दीक्षाभूमीपासून विधिमंडळापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी ३ डिसेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा व तालुका पदाधिकाºयांची बैठक बोलवली होती. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार केवलराम काळे, झेडपीचे सभापती जयंत देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी बबलू देशमुख यांनी भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेत शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांवर अन्याकारक धोरण राबविले. परिणामी जनतेत भाजप सरकारविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्यावतीने हिवाळी अधिवेशनावर जनआक्रोश मोर्चा धडकणार आहे. या मोर्चाच्या नियोजन व सहभागाबाबत पदाधिकाºयांना महत्त्वाच्या सूचना पदाधिकाºयांनी कार्यकर्त्यासह सहभागी होण्याचे आवाहन बबलू देशमुख यांनी केले. सभेला आ. वीरेंद्र जगताप यांनी मार्गदर्शन केले. मोर्चात अ.भा. काँग्रसेचे नेते गुलाबनबी आझाद व अनेक नेते सहभागी होणार असून कार्यकर्त्यांनी हातात काँग्रेस झेंडे घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन केले. सभेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी, तर आभार प्रदर्शन जयंत देशमुख यांनी केले. सभेला भैय्यासाहेब मेटकर, प्रकाश काळबांडे, मनोज देशमुख, राजेंद गोरले, बाळासाहेब हिंगणीकर, महेद्रसिंग गैहलवार, सुभाष पाथरे आदी उपस्थित होते.काँग्रेस पक्षातर्फे शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्यांमध्ये भाजप सरकारविरोधात रोष वाढला आहे. फसवी कर्जमाफी व अन्य प्रश्नामुळे शेतकरी संकटात आहे. यासह इतर प्रश्नांसाठी अधिवेशनावर जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे.- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी