शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जनआक्रोश मोर्चासाठी जिल्हा काँग्रेसने कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:05 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने तीन वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना न्याय देण्याऐवजी अन्यायकारक निर्णय घेतले. त्यामुळे भाजप सरकार विरोधात जनतेत तीव्र जनआक्रोश निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपूर्वतयारी : जिल्ह्यातून हजारोवर कार्यकर्ते होणार सहभागी

आॅनलाईन लोकमतअमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने तीन वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना न्याय देण्याऐवजी अन्यायकारक निर्णय घेतले. त्यामुळे भाजप सरकार विरोधात जनतेत तीव्र जनआक्रोश निर्माण झाला आहे.भाजप सरकारच्या जनहितविरोधी धोरणाचा जाब विचारण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात काँग्रेसच्यावतीने दीक्षाभूमीपासून विधिमंडळापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी ३ डिसेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा व तालुका पदाधिकाºयांची बैठक बोलवली होती. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार केवलराम काळे, झेडपीचे सभापती जयंत देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी बबलू देशमुख यांनी भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेत शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांवर अन्याकारक धोरण राबविले. परिणामी जनतेत भाजप सरकारविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्यावतीने हिवाळी अधिवेशनावर जनआक्रोश मोर्चा धडकणार आहे. या मोर्चाच्या नियोजन व सहभागाबाबत पदाधिकाºयांना महत्त्वाच्या सूचना पदाधिकाºयांनी कार्यकर्त्यासह सहभागी होण्याचे आवाहन बबलू देशमुख यांनी केले. सभेला आ. वीरेंद्र जगताप यांनी मार्गदर्शन केले. मोर्चात अ.भा. काँग्रसेचे नेते गुलाबनबी आझाद व अनेक नेते सहभागी होणार असून कार्यकर्त्यांनी हातात काँग्रेस झेंडे घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन केले. सभेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी, तर आभार प्रदर्शन जयंत देशमुख यांनी केले. सभेला भैय्यासाहेब मेटकर, प्रकाश काळबांडे, मनोज देशमुख, राजेंद गोरले, बाळासाहेब हिंगणीकर, महेद्रसिंग गैहलवार, सुभाष पाथरे आदी उपस्थित होते.काँग्रेस पक्षातर्फे शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्यांमध्ये भाजप सरकारविरोधात रोष वाढला आहे. फसवी कर्जमाफी व अन्य प्रश्नामुळे शेतकरी संकटात आहे. यासह इतर प्रश्नांसाठी अधिवेशनावर जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे.- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी