शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
5
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
6
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
7
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
8
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
9
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
10
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
11
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
12
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
13
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
14
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
15
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
16
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
17
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
18
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
19
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
20
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स

टंचाई आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींची खडाजंगी

By admin | Updated: July 21, 2014 23:37 IST

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ २२ टक्केच खरीप पेरण्या झाल्या आहेत. मात्र यातही दुबार पेरणीचे संकट उभे असताना

पालकमंत्र्यांची शिष्टाई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तापली सभाअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ २२ टक्केच खरीप पेरण्या झाल्या आहेत. मात्र यातही दुबार पेरणीचे संकट उभे असताना दुष्काळाची स्थिती गंभीर होत आहे. या मुद्यावर शेतकऱ्यांसाठी प्रशासकीय यंत्रणा काहीच करीत नसल्याने संतप्त सत्ताधारी काँग्रेस व अपक्ष आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांची पालकमंत्र्याच्या उपस्थितीत पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. जिल्ह्यात शेतकऱ्यांना अद्यापही गारपिटीचे अनुदान पूर्णपणे मिळाले नसल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा मुद्दा या सभेत लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषद सदस्य अभिजित ढेपे यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडला असता, धामणगाव रेल्वे मतदारसंघात ९५ टक्के गारपीटग्रस्तांना मदत वाटप झाल्याचे धामणगावचे लोकप्रतिनिधींनी सांगताच, या मुद्यावर सभागृहात सत्ताधारी व विरोधी गटात चांगलीच जुंपली. या मुद्यावर वादळ उठले असताना आमचे-तुचे प्रश्न उपस्थित झाल्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा गांभीर्याने घेत यावर आक्षेप नोंदविला. अखेर पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यामुळे हा तणाव निवळला. वातावरण शांत होत नाही तोच पीक विम्याच्या मुद्यावर तसेच शेतकऱ्यांना कर्जवाटपाबाबत बँकांकडून दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचा मुद्या उपस्थितीत झाला. यावर लोकप्रतिनिधींसह देशमुख यांनी विरोधकांच्या या प्रश्नाला बगल देण्याच्या प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी या मुद्यावर सभागृहात आक्रमक भूमिका घेत ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतील त्या बँकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी कृषीमंत्र्यांकडे उपस्थित लोकप्रतिनिधींनी केली. याशिवाय जिल्ह्यातील संत्रा मृग बहर फुटला नाही, तर आंबिया गळाला. त्यामुळे संत्रा उत्पादकांना फटका बसल्यामुळे संत्रा उत्पादकांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. दरम्यान लोकप्रतिनिधींच्या आक्रमकतेमुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संत्रा बागांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाच्या यंत्रणेला दिले. हा अहवाल प्राप्त होताच मदतीबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात पालकमंत्र्यांनी दिले. सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या या आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत ही सभा चांगलीच गाजवली. सभेला आ. वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, अनिल बोंडे, अभिजित अडसूळ, यशोमती ठाकूर, केवलराम काळे, रावसाहेब शेखावत, बबलू देशमुख, जि.प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे, महापौर वंदना कंगाले, विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल भंडारी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.