शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

नझूल जमिनीचे हस्तांतरणीय धोरण लोकाभिमुख

By admin | Updated: February 23, 2016 00:09 IST

राज्य शासनाने नझूल जमिनीच्या हस्तांतरणाबाबत घेतलेला निर्णय लोकाभिमुख असून या धोरणाचा नागरिकांना लाभ मिळेल,..

शिबिराचे उद्घाटन : पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे प्रतिपादनअमरावती : राज्य शासनाने नझूल जमिनीच्या हस्तांतरणाबाबत घेतलेला निर्णय लोकाभिमुख असून या धोरणाचा नागरिकांना लाभ मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.येथील तहसील कार्यालयाच्या बचत भवनात आयोजित शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे, उपअधीक्षक भूमि अभिलेख भारती खंडेलवाल आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले, १९६६ पूर्वी ब सत्ताप्रकार शासकीय जमिनी स्थायी मुदतीकरिता प्रदान केल्या आहेत. परंतु या जमिनीचे नूतनीकरण, हस्तांतरण व वापरात बदल करण्याकरिता नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. यावर तोडगा म्हणून महसूल विभागाने २३ डिसेंबर २०१५ रोजी अमरावती विभागाकरिता सुधारित धोरण जाहीर केले आहे. नवीन धोरणामुळे सर्वांना सरळ व सोप्या पध्दतीने जमिनीचे व्यवहार करता येईल, असे त्यांनी सांगितले. ना. पोटे पुढे म्हणाले की, ब्रिटीश कालीन ताब्यात असलेल्या नझूल व बी सत्ताप्रकार जमिनी हस्तांतरणाबाबत निर्गमित झालेल्या नवीन शासन धोरणामुळे नागरिकांना सरळ व सोप्या पध्दतीने जमिनी संबंधीचे व्यवहार करता येणार आहे. या नवीन धोरणानुसार नागरिकांवर महसुली नियमानुसार आकारण्यात येणारी अनर्जित उत्पन्नाची रक्कम जमिनीच्या बाजार मूल्याच्या २५ टक्क्यावरून १० टक्के इतकी करण्यात आली आहे. सदर रक्कम अदा करून ताब्यात असलेल्या जमिनी स्वत:च्या मालकीची होणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी नवीन धोरणानुसार शासकीय जमीन वापराबद्दल दंडाच्या आदेशातील रक्कम भरणारा प्रथम लाभार्थी पवन जयकिसन गट्टानी यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते ताबा प्रमाणपत्र हस्तांतरित करण्यात आले.नझूल जमीन नूतनीकरण, शर्तभंग नियमानुकूल कामे पार पाडणे सोईचे होण्यासाठी महसूल विभागाव्दारे सहा दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. प्रास्ताविक प्रवीण ठाकरे यांनी तर आभार उपअधीक्षक भूमिअभिलेख खंडेलवाल यांनी मानले. (प्रतिनिधी)