शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

प्रलंबित घाट लिलावात ‘अर्थ’कारण

By admin | Updated: January 5, 2015 22:55 IST

विदर्भात सर्वच जिल्ह्यांमध्ये वाळूघाटाचे लिलाव करुन शासन नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अमरावतीत पर्यावरण विभागाच्या परवानगीचे गोंडस नाव पुढे करुन

अमरावती : विदर्भात सर्वच जिल्ह्यांमध्ये वाळूघाटाचे लिलाव करुन शासन नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अमरावतीत पर्यावरण विभागाच्या परवानगीचे गोंडस नाव पुढे करुन ‘अर्थ’कारणासाठी वाळूघाटांचे लिलाव रोखण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. परंतु सोमवारपासून आॅनलाईन निविदा प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.वर्धा नदीपात्रातून वाळू तस्करांनी घाटांचे लिलाव होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात वाळू साठवून ठेवली आहे. वाळू साठवून ठेवण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांची मोलाची भूमिका ठरली आहे. वाळू उपस्याला बंदी असताना काही महिन्यांपासून अवैध मार्गाने वाळू शहरात आणली जात असल्याचे महसूल व पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून स्पष्ट झाले आहे. वाळू तस्करीत अनेकांचा सहभाग असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे घाटांचे लिलाव न होता मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करण्यात आला आहे. शहरात अनेक जागी साठवून ठेवलेले वाळूचे ढिगारे हे त्याचे उदाहरण आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व नागपूर येथे वाळू निविदा प्रक्रिया राबवून घाटांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यात वाळूघाटांचे लिलाव करण्यास विलंब का? यामागे बरेच काही दडले आहे. एकीकडे पर्यावरण विभागात वाळूघाटांच्या लिलावास परवानगी मिळावी, यासाठी अनेक दिवस फाईल प्रलंबित ठेवण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पर्यावरण अधिकाऱ्यांचे कार्यालय असताना इतके दिवस वाळू घाटांच्या लिलाव परवानगीची फाईल प्रलंबित ठेवण्यामागे कारण काय? हा सवाल देखील उपस्थित होत आहे. लिलाव उशिरा करण्यामागे मोठे अर्थकारण असून यात जिल्हाधिकाऱ्यांना कनिष्ठ अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट होते. वाळूमाफियांसोबत महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचे मधुर संबंध आहेत. हेच अधिकारी वाळूमाफियांना प्रत्येक घडामोडींची माहिती देत असल्याचे बोलले जाते. महिनाभरापूर्वीच वाळूघाटांचे लिलाव करुन वाळूपासून मिळणारे उत्पन्न निश्चित होणे अपेक्षित होते. परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तब्बल महिनाभर उशिरा वाळूघाटांचे लिलाव होत आहेत. या महिन्याभरातच नदी पात्रातून वाळूचा उपसा करुन माफियांनी शासनाचा कोट्यवधीच्या महसूल बुडविला आहे. वाळू उपसा व निविदा प्रक्रियेसंदर्भात खनिकर्म अधिकारी शिरभाते यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.