शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

तुरीच्या डाळीने गाठला उच्चांक

By admin | Updated: May 14, 2015 00:06 IST

पाच वर्षांत ज्वारीचे दर वाढल्यामुळे भाकरी केव्हाच महागली आहे. आता तूर डाळीसह सर्वच डाळींनी दरांचा उच्चांक गाठला आहे.

दरवाढीने सामान्य नागरिक हैराण : वरण-भाकरीची चव झाली अवघडजितेंद्र दखने अमरावतीपाच वर्षांत ज्वारीचे दर वाढल्यामुळे भाकरी केव्हाच महागली आहे. आता तूर डाळीसह सर्वच डाळींनी दरांचा उच्चांक गाठला आहे. बाजारपेठेत केवळ चार दिवसांपूर्वी ८० रुपये किलोने मिळणारी तूरडाळ चक्क किरकोळ दुकानात १०० ते १२० रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे आता गरिबांचे वरणही महागले आहे. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तुंच्या दरात वाढच होत आहे. उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे भाजीपालाही खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. ४० रुपयांनी मिळणारा शेवगा ६० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावा लागत आहेत. तीच गत वांगी, दोडके, वाटाणा अशा सर्वच भाज्यांची झाली आहे. पालेभाज्या तर उन्हाळ्याच्या तोंडावर महाग झाल्या होत्या. आता तर १० ते १५ रुपयांच्याखाली कोणतीही पालेभाजी मिळत नाही. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागासाठी प्रत्येक कुटुंबात भाजीपाल्याला पूरक म्हणून आणि आवश्यक म्हणून विविध डाळींचा वापर केला जातो. वरण, भाकर तर गरिबांचे जेवण समजले जाते. मात्र या वरणाच्या सर्वच डाळींचे दर मागील तीन चार दिवसांत कडाडले आहेत. जिल्हाभरात विविध भागांतून डाळी येतात. तुरडाळ पश्चिम महाराष्ट्रातून तर हरभरा डाळ बहुतांश इंदूर येथून येते. त्या भागात डाळीचे उत्पन्न घटल्याने त्याचा परिणाम झाल्याचे मापारी सांगत आहेत. त्यामुळे या डाळीचे दर वाढले असून त्याची आवकही पुरेशी कमी आहे. डाळीचे दर झपाट्याने वाढत असल्यामुळे ग्राहक किराणा दुकानात डाळीचे दर ऐकताच निराश होत आहेत. प्रत्येक कुटुंबात महिन्यात किमान २ किलो तरी एक दोन प्रकारच्या डाळी वापरल्या जातात. कढीपत्ता घालून फोडणी दिलेले तुरीच्या डाळीचे वरण सर्वांच्याच आवडीचे असते. मात्र ही आमटीही महाग झाली आहे. मात्र पावभर डाळ आणली तर किमान दोन - तीन वेळ पुरते. हे महिलांचे स्वयंपाकगृहातील गणित आहे. पण आता दरामुळे हे गणित बिघडून गेलेले आहेत. प्रत्येक कुटुंबात कमी जास्त प्रमाणात डाळीचा वापर अनिवार्य असतो. डाळीचे वाढलेले दर सर्वच महिलांना त्रासदायक ठरणार आहे. वाढलेले दर पुन्हा कधी कमी होत नाहीत, हे आणखी वाईट. -प्रभा मानकर, गृहिणी