शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

खरीप पीक विम्यासाठी साडेसहा कोटींचा भरणा

By admin | Updated: December 8, 2015 00:14 IST

नैसर्गिक आपत्ती तसेच किडी व रोग यापासून शेती पिकांना संरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ५६३ शेतकऱ्यांनी ...

राष्ट्रीय कृषी पीक विमा : योजनेत १ लाख ४३ हजार शेतकऱ्यांचा सहभागअमरावती : नैसर्गिक आपत्ती तसेच किडी व रोग यापासून शेती पिकांना संरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ५६३ शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. यासाठी ६ कोटी ६६ लाख ३१ हजार रूपयांचा भरणा वित्तीय संस्थांकडे केला आहे. खरीप हंगाम २०१५ साठी राष्ट्रीय कृषि पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात आली. या योजनेत जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप ज्वारी, भात, उडीद, मूग, तूर, भुईमूग, तीळ, सोयाबीन व कपाशी या पिकासाठी १ लाख ३४ हजार ८३५ हेक्टर क्षेत्र संरक्षित केलेले आहे. खरीप ज्वारीसाठी २ हजार ५५९ शेतकऱ्यांनी १ हजार ८२५ क्षेत्रासाठी ३ लाख ६४ हजार रुपयांचा भरणा केला आहे. भातासाठी १ हजार १९२ शेतकऱ्यांनी ५६१ हेक्टरसाठी १ लाख ४३ हजार रुपयांचा भरणा केला आहे. उडीदासाठी १ हजार ४४६ शेतकऱ्यांनी १ हजार १२६ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले. यासाठी १ लाख ४३ हजार रूपये विमा हप्ता भरला आहे. मुगासाठी १५ हजार ४७५ शेतकऱ्यांनी १८ हजार ८४० हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा काढला. यासाठी ४४ लाख ८६ हजार रूपयांचा विमा हप्ता भरलेला आहे. तूर पिकासाठी २८ हजार ३४२ शेतकऱ्यांनी १० हजार ५३५ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले यासाठी ३५ लाख ४५ हजारांचा भरणा केलेला आहे. सोयाबीनसाठी ७६ हजार ६७१ शेतकऱ्यांनी ८६ हजार ५८५ हेक्टर क्षेत्र विम्यासाठी संरक्षित केले. यासाठी ३ कोटी ५० लाख ३२ हजार रुपयांचा भरणा केलेला आहे. कपाशी पिकासाठी १७ हजार ८३७ शेतकऱ्यांनी १५ हजार ३४० हेक्टर क्षेत्रासाठी २ कोटी २७ लाख ७८ हजार रुपयांचा भरणा वित्तीय संस्थेकडे केला आहे. यंदा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे खरिपाचा हंगाम उद्धवस्त झाला. शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत असल्यामुळे विमा भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. (प्रतिनिधी)