शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

‘पे अ‍ॅन्ड पार्क’चा प्रस्ताव फेटाळला

By admin | Updated: December 20, 2014 22:30 IST

शहरातील दोन उड्डाणपुलाखाली वाहने उभी करण्यासाठी ‘पे अ‍ॅन्ड पार्क’चा प्रशासनाने वेळेवर आणलेला प्रस्ताव सदस्यांनी एकजूट होत फेटाळून लावला. एवढेच नव्हे, तर वाहनतळाच्या राखीव

महापालिका सदस्य आक्रमक : वाहनतळाचे अतिक्रमण हटविण्याची मागणीअमरावती : शहरातील दोन उड्डाणपुलाखाली वाहने उभी करण्यासाठी ‘पे अ‍ॅन्ड पार्क’चा प्रशासनाने वेळेवर आणलेला प्रस्ताव सदस्यांनी एकजूट होत फेटाळून लावला. एवढेच नव्हे, तर वाहनतळाच्या राखीव जागेवर असलेले अतिक्रमण का हटविले जात नाही, असा सवाल उपस्थित करुन ‘भ्रष्टाचारी’ अशी उपमा देत महापालिका प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजित कौर नंदा यांच्या पीठासीनाखाली शनिवारी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी पीठासीनावर उपायुक्त विनायक औगड, नगरसचिव मदन तांबेकर यांनी कामकाज सांभाळले. सभेच्या प्रारंभी शहर बस समिती सदस्य नियुक्तीवरुन वादळ उठले. राष्ट्रवादीचे सुनील काळे आणि अविनाश मार्डीकर यांच्यात सदस्य निवडीच्या पत्रावरुन शाब्दिक वादही झाला. अखेर महापौरांनी राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, शिवसेना या गटात नेतेदाचा वाद कायम असल्याने हा विषय पुढच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्याचा निर्णय घेतला.अवैध होर्डींग्जचा मुद्दा गाजलाप्रदीप दंदे यांनी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी असल्याचे सांगून सर्वसाधारण सभा स्थगित करण्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र काही सदस्यांच्या मागणीवरुन संत गाडगेबाबा यांच्या छायाचित्रांचे पूजन करुन आदरांजली वाहण्यात आली. बाजार परवाना विभागाचे प्रमुख गंगाप्रसाद जयस्वाल यांनी प्रशासनाच्यावतीने उड्डाणपुलाखाली ‘पे अ‍ॅन्ड पार्क’चा विषय वेळेवर सभागृहात आणला. याला सदस्यांनी कडाडून विरोध केला. दिनेश बूब यांनी याचा विरोध करीत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच ताशेरे ओढले. राजू मसराम, सुजाता झाडे यांनी अवैध होर्डिग्ज उभारण्याबाबतचा मुद्दा मांडला. प्रदीप बाजड, अरुण जयस्वाल, प्रदीप हिवसे, अमोेल ठाकरे, अजय सामदेकर, प्रशांत वानखडे, हमीद शद्दा हे प्रशासनावर तुटून पडले. अमोल ठाकरे यांनी शाम टॉकीज जवळील वाहनतळाच्या जागेवर असलेले अतिक्रमणाबाबत न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत अधिकाऱ्यांचा अक्षरश: वर्ग घेतला. वाहनतळासाठी राखीव असलेले अतिक्रमण काढण्यासाठी काय अडचण आहे? हा मुद्दा प्रदीप बाजड, प्रदीप हिवसे यांनी रेटून धरला. बाजड यांनी जुने दाखले देत या जागेप्रकरणी झालेल्या ‘तोडी’चा विषय उपस्थित केला. मात्र आता तोडातोडीचा विषय आला. महापौर चरणजित कौर नंदा यांना सावित्रीबाई फुले, अहल्यादेवी होळकर, झाशीची राणी अशा उपमा देत आम्ही तुम्हाला मर्दानी म्हणून बघतो, असे म्हणत प्रदीप बाजड यांनी काही तरी निर्णय द्या, असे म्हणाले. मात्र ही जागा शासनाची आहे, असा न्यायालयाचा निर्णय २३ सप्टेंबर २०१४ चा आहे. मात्र अतिक्रमण धारकांना कोर्टातून स्थनगादेश आणण्याची संधी प्रशासनाने दिली, असा आरोप अरुण जयस्वाल यांनी केला. (प्रतिनिधी)