शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थेत पतिराजांचा हस्तक्षेप

By admin | Updated: July 15, 2015 00:18 IST

शासनाचे धोरण महिला सक्षमीकरणाचे असले तरीही महिला जनप्रतिनिधींचे ‘पतिराजच’ ढवळाढवळ करीत असल्यामुळे ..

गैरप्रकार : महिला केवळ नावापुरत्याचसुमित हरकूट चांदूरबाजारशासनाचे धोरण महिला सक्षमीकरणाचे असले तरीही महिला जनप्रतिनिधींचे ‘पतिराजच’ ढवळाढवळ करीत असल्यामुळे शासनाचे महिलांसाठी असणारे उद्दिष्ट साकार होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यात नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या संस्थेमध्ये अध्यक्ष, सरपंच, सभापती पदावर असणाऱ्या महिला लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी दुर्बल ठरतात.प्रत्येक आघाडीवर त्या प्रामुख्याने धडकत आहे. आपले निर्णय ते ठामपणाने घेऊ शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक निवडणुकीत पुरुषाबरोबर महिला मोठ्या प्रमाणात निवडून आल्या आहेत. त्यामुळे सध्या नगरपालिका, पंचायत समिती तसेच अनेक ग्रामपंचायतीवर सध्या महिलाराज सुरू आहे. परंतु या महिलाराज असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचा पतिराजांचीच ढवळाढवळ अधिक असते. यामुळे शहरात होणारी विकासकामे कोणत्या कंत्राटदाराला देण्यात यावी, कोणाची देयके द्यावी, कोणाची रोखून ठेवावी, सभागृहात चालणारे राजकारण, अर्थकारण ही सर्व निर्णय पतिराजच घेत असल्याचे सर्वश्रृत आहे. तसेच विशेष सभेत महीला सदस्यांचाच बाजूलाच त्यांचा पतिराजांची खुर्ची आरक्षित असते. हे प्रमाण फक्त पदाधिकारीपुरतेच मर्यादित नसून अनेक महिला नगरसेविकांचीसुद्धा हीच स्थिती आहे. ज्या ठिकाणी अधिकारी कर्तव्यदक्ष असतील त्याच ठिकाणी पतिराजांना खुर्चीसाठी ताटकळत बसावे लागतात.हेच चित्र अनेक ग्रामपंचायतीत सुद्धा दिसून येते. सरपंचासारखे मानाचे पद गावाच्याा विकासासाठी महत्त्वाचे असून लोकहिताचे निर्णय घेण्याची कुवत महिला सरपंचामध्ये असतानादेखील त्यांचे पतिराज आपल्या वैयक्तिक हितासाठी दबाव आणून आपले निर्णय घेण्यास भाग पाडतात. यामुळे गावाचे नुकसान होऊन विकास कामाचा खेळखंडोबा होत आहे आणि हीच परिस्थिती पंचायत समिती, जिल्हा परिषदेत होत आहे. महिला पदाधिकारीच्या पतिराजांनी उच्च पद प्राप्त या महिलांना ‘कठपुतली’ बनवून ठेवले आहे. यावर शासनाने वेळीच कठोर पाऊले उचलने गरजेचे आहे.