शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांची तारांबळ

By admin | Updated: March 6, 2015 00:47 IST

स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले असून अन्य अधिकारी रजेवर असल्याने या आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळला आहे.

आसेगाव पूर्णा : स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले असून अन्य अधिकारी रजेवर असल्याने या आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळला आहे. परिसरातील रूग्णांना त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परिसरातील रूग्णांची तारांबळ लक्षात घेता या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी प्रहारचे कार्यकर्ते अजय तायडे व चांदूरबाजार पंचायत समितीच्या माजी सभापती माया तायडे यांनी केली आहे. परिसराची लोकसंख्या तीस हजारांच्या आहे. मध्यवर्ती भागात असलेल्या या आरोग्य केंद्राचा लाभ आसेगाव परिसरातील नागरिकही घेतात. आसपास कुठे रस्ता अपघात झाला तर जखमींना प्रथमोपचारासाठी येथे आणले जाते. आतापर्यंत या आरोग्य केंद्राचा कारभार दोन वैद्यकीय अधिकारी पाहत होते, हे विशेष. पण, काही दिवसांपूर्वी येथीलच एका महिला कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीवरुन त्यांची येथून इतरत्र बदली करण्यात आली आहे. येथील दुसरे वैद्यकीय अधिकारी काही दिवसांपासून रजेवर असून त्यांची येथे पुन्हा रुजू होण्याची मानसिकता नसल्याचे दिसते. या आरोग्य केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने या केंद्राचा प्रभार नजीकच्या हिरुर आणि राजना उपकेंद्रातील डॉक्टरांकडे सोपविण्यात आला आहे. परंतु एकाच वेळी दोन्ही ठिकाणी सेवा देताना या प्रभारी डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी आसेगावच्या आरोग्य केंद्राकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. डॉक्टरांच्या गैरहजेरीत कित्येकदा १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे काही कर्मचारी रुग्णांची थातुरमातूर तपासणी करुन टाईमपास करताना आढळतात. डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जात नसल्याने रुग्णांचे समाधान होत नाही. त्यामुळे कित्येक गोरगरीब ऐपत नसतानाही खासगी डॉक्टरांकडून इलाज करुन घेणे अधिक पसंत करतात. तसेच प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना कोणतीही कारणे दाखवून जिल्हा स्त्री रुग्णालयात पाठविले जाते. शासन या केंद्रांवर लाखो रुपयांचा खर्च करीत असूनही रुग्णांची गैरसोय होत असल्याची खंत वाटते. या आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळल्याने येथे तपासणीसाठी येणाऱ्या बाह्यरुग्णांची व प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या रोडावत चालली आहे. शासनाच्या आरोग्य विषयक धोरणावरही त्याचा परिणाम होत आहे. सध्या ताप, सर्दी, खोकल्याची साथ असल्याने येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची नितांत आवश्यकता भासत आहे. येथे दोन वद्यकीय अधिकाऱ्यांची त्वरित नियुक्ती करण्याची मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे.