शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांची तारांबळ

By admin | Updated: March 6, 2015 00:47 IST

स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले असून अन्य अधिकारी रजेवर असल्याने या आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळला आहे.

आसेगाव पूर्णा : स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले असून अन्य अधिकारी रजेवर असल्याने या आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळला आहे. परिसरातील रूग्णांना त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परिसरातील रूग्णांची तारांबळ लक्षात घेता या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी प्रहारचे कार्यकर्ते अजय तायडे व चांदूरबाजार पंचायत समितीच्या माजी सभापती माया तायडे यांनी केली आहे. परिसराची लोकसंख्या तीस हजारांच्या आहे. मध्यवर्ती भागात असलेल्या या आरोग्य केंद्राचा लाभ आसेगाव परिसरातील नागरिकही घेतात. आसपास कुठे रस्ता अपघात झाला तर जखमींना प्रथमोपचारासाठी येथे आणले जाते. आतापर्यंत या आरोग्य केंद्राचा कारभार दोन वैद्यकीय अधिकारी पाहत होते, हे विशेष. पण, काही दिवसांपूर्वी येथीलच एका महिला कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीवरुन त्यांची येथून इतरत्र बदली करण्यात आली आहे. येथील दुसरे वैद्यकीय अधिकारी काही दिवसांपासून रजेवर असून त्यांची येथे पुन्हा रुजू होण्याची मानसिकता नसल्याचे दिसते. या आरोग्य केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने या केंद्राचा प्रभार नजीकच्या हिरुर आणि राजना उपकेंद्रातील डॉक्टरांकडे सोपविण्यात आला आहे. परंतु एकाच वेळी दोन्ही ठिकाणी सेवा देताना या प्रभारी डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी आसेगावच्या आरोग्य केंद्राकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. डॉक्टरांच्या गैरहजेरीत कित्येकदा १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे काही कर्मचारी रुग्णांची थातुरमातूर तपासणी करुन टाईमपास करताना आढळतात. डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जात नसल्याने रुग्णांचे समाधान होत नाही. त्यामुळे कित्येक गोरगरीब ऐपत नसतानाही खासगी डॉक्टरांकडून इलाज करुन घेणे अधिक पसंत करतात. तसेच प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना कोणतीही कारणे दाखवून जिल्हा स्त्री रुग्णालयात पाठविले जाते. शासन या केंद्रांवर लाखो रुपयांचा खर्च करीत असूनही रुग्णांची गैरसोय होत असल्याची खंत वाटते. या आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळल्याने येथे तपासणीसाठी येणाऱ्या बाह्यरुग्णांची व प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या रोडावत चालली आहे. शासनाच्या आरोग्य विषयक धोरणावरही त्याचा परिणाम होत आहे. सध्या ताप, सर्दी, खोकल्याची साथ असल्याने येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची नितांत आवश्यकता भासत आहे. येथे दोन वद्यकीय अधिकाऱ्यांची त्वरित नियुक्ती करण्याची मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे.