शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

अपस्मारच्या रुग्णांना विश्वास देणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 21:49 IST

अपस्मार यालाच फीट किंवा मिरगीचा आजार संबोधले जाते. हा दीर्घकालीन मज्जारज्जूचा आजार असून, भारतात सुमारे ५ दशलक्षाहून अधिक नागरिक याने ग्रस्त आहेत. फीट येणारे व्यक्त हे सामान्य व्यक्तीच असून, त्यांना विश्वास देणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देश्रीकांत शिंगणे : विविध उपाय उपलब्ध

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपस्मार यालाच फीट किंवा मिरगीचा आजार संबोधले जाते. हा दीर्घकालीन मज्जारज्जूचा आजार असून, भारतात सुमारे ५ दशलक्षाहून अधिक नागरिक याने ग्रस्त आहेत. फीट येणारे व्यक्त हे सामान्य व्यक्तीच असून, त्यांना विश्वास देणे गरजेचे आहे. या आजाराबाबत अनेक गैरसमज असून, ते दूर व्हावे त्यांना जगण्यास आत्मविश्वास मिळावा, हाच यामागील उद्देश आहे, असे दिशा फौंडेशनचे डॉ. श्रीकांत शिंगणे यांनी जागतिक अपस्मारदिनी आयोजित कार्यक्रमात सांगितले.लाखभर अपस्मार रुग्ण वैद्यकीय उपचारांना दाद देत नसल्याने लँडमार्क एसईएलपी ग्रुप अमरावती, अकोला येथील दिशा फाऊंडेशनच्या सहकार्याने संपूर्ण राज्यभर जनजागृती अभियान राबविण्याचे ठरविले आहे. यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी जसे बस स्थानक, रेल्वे स्थानकांवर १७ नोव्हेंबरपासून जागृती करण्यात येत आहे. अपस्मार या आजाराच्या रुग्णाबाबत भीती नव्हे, तर सहानुभूती आणि कणव बाळगण्याची आवश्यकता आहे.या करा उपाययोजनाफीट आल्यास तोंडात कांदे, चपला किंवा वस्तू कोंबू नये, श्वास कोंडणार नाही याची काळजी घ्यावी, पोहणे टाळावे, अग्नीजवळ जाण्याचे टाळावे, वाहन चालवू नये, झाडावर चढू नये, भयभीत होऊ नये, ओळखपत्र नेहमी सोबत बाळगावे, अशा स्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांनी न्यूरोलॉजिस्टशी संपर्क साधून उपचार करावे.आजाराची लक्षणेझटके, चेहऱ्याला कंप, हात-पाय थरथरणे, लक्ष विचलित होणे, शरीर वेडेवाकोडे होऊन शुद्ध हरपणे आदी अपस्माराची लक्षणे आहेत.एक ते तीन मिनिटांचा काळअपस्मारग्रस्तांना फीट एक ते तीन मिनिटांपर्यंत राहते. त्यादरम्यान तोंडातून फेस येणे, श्वास गुदमरणे, असुरक्षित जागेवर पडल्यास इजा पोहचते. तसेच हा कालावधी वाढल्यास मेंदूला इजा होण्याची शक्यता असते.औषधोपचार अनिवार्यअपस्मार हा जिवावर बेतणारा आजार असून, यातून सुटका मिळण्यासाठी रुग्णांना किमान दोन ते पाच वर्षे औषधोपचार घेणे अनिवार्य आहे. तोसुद्धा सुयोग्य पद्धतीने व वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावा. बहुतांश रुग्णांना या अपस्मार आजारातून मुक्तता मिळाल्याची माहिती आहे.