शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

‘पतीराज’पुढे अधिकारी हतबल

By admin | Updated: April 22, 2017 00:23 IST

जिल्हा परिषदेतील नव्या पदाधिकाऱ्यांचा जेमतेम कारभार सुरू झाला असताना ‘पतीराज’ हस्तक्षेप वाढला आहे.

शासन निर्णयाला छेद : कशासाठी खपवून घेतात मुजोरी अमरावती : जिल्हा परिषदेतील नव्या पदाधिकाऱ्यांचा जेमतेम कारभार सुरू झाला असताना ‘पतीराज’ हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे पदाधिकारी महिला की पुरूष हे अधिकाऱ्यांनाही कळू शकत नाही. नेमके कुणाचे ऐकावे या व्दिधावस्थेत अधिकारी आले आहेत. मात्र शासन निर्णयानुसार ‘पतीराज’ हस्तक्षेप नको असे असतानाही अधिकारी कशासाठी हतबल होतात हा संशोधनाचा विषय आहे. जिल्हा परिषदेत नव्यानेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदावर वनिता पाल यांची नियुक्ती झाली आहे. मात्र त्याच्यासाठी जुन्या वाहनाऐवजी नवीन वाहन मिळविण्यासाठी प्रशासनालातील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना श्रीपाल पाल यांनी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांच्या माध्यमातून ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ केले. यासाठी श्रीपाल पाल यांची बाजू घेत उपाध्यक्ष ढोमणे यांनीही संबंधित अधिकाऱ्याला ‘वाहन द्या ; नाही तर माझे वाहन देऊन मीच पायी जातो’ असा दम भरत अधिकाऱ्यांना नियम डावलून महिला व बालकल्याण समिती सभापतींना अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या नावाने असलेले एमएच २७ अ‍े.अ‍े ६५२ क्रमांकाचे वाहन देण्यास दबाब तंत्राचा वापर वाहन मिळवून दिले. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यानंतर अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी हे महत्वाचे पद आहे. हा विषय त्यांचे पती श्रीपाल पाल यांनी अधिकारी व उपाध्यक्षांपर्यत नेऊन नियुक्तीच्या दिवसापासूनच सभापतींच्या कामकाजात हस्तक्षेप करत रेटून धरला. एकीकडे शासनाने महिलांच्या सबलीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखिव असल्याची तरतूद केली. मात्र याचा फायदा हा महिला पदाधिकाऱ्यांन पेक्षा पतीराजच अधिक करत असतील तर शासन निर्णय, धोरणाचा उपयोग तरी काय? या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे. त्याच यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी ‘पतीराज’ सारख्या बिनधिकत वावणाऱ्या समोर का म्हणून झुकावे हा सुध्दा संशोधनाचा विषय आहे. प्रशासनात काम करतांना शासनाचे प्रतिनिधी म्हणून कायदा,नियम,धोरण यांचा वापर केल्यास पतीराज सारख्या प्रकारांना आळा बसू शकेल अन्यथा असे प्रकार हे दिवसेदिवस कमी होण्यापेक्षा जास्त होतील हे मात्र नाकारता येणार नाही. त्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर केला तर ही डोकेदुखी कायमची मोडीत निघू शकते.