शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावात पथसंचलन

By admin | Updated: September 16, 2015 00:16 IST

अंजनगाव शहर ही गेली तीन-चार वर्षापूर्वी संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते.

अंजनगाव सुर्जी : अंजनगाव शहर ही गेली तीन-चार वर्षापूर्वी संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. परंतु त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच उपाययोजना करून अंजनगाव शहरात शांतता प्रस्थापित केली होती. त्याला मुख्य कारण तत्कालीन ठाणेदारपदी असलेले पोलीस निरीक्षक डोंगरे, ठाकरे, मानकर, पडघम व सद्यस्थितीत ठाणेदारपदी रुजू असलेले मल्लिकार्जुन इंगळे यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पथसंचलन केले.गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असताना अंजनगाव शहरात भावी काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, या मुख्य उद्देशाने उपविभागीय अधिकारी शिवतरे, ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे, उपनिरीक्षक उपासे, छत्रपती घावट, गायकवाड यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशन येथून ओम चौक, शनिवारा, आलम चौक, पाचपावली, नेताजी चौक, नवले चौक, डब्बीपुरा, शहापुरा मार्गे जुने एसटी स्टँड मार्गे गुलजारपुरा, पानअटाईमार्गे शनिवारा पोलीस स्टेशनमार्गे शहरातील दोन्ही भागामधून रुटमार्च काढण्यात आला. यामध्ये बनारस येथील सीआयएसएफचे २५ जवान व एक अधिकारी यामध्ये प्रमुख आकर्षण होते. रुटमार्चमध्ये पथ्रोट येथील पाच कर्मचारी व एक अधिकारी, रहिमापूर येथील पाच अधिकारी व एक कर्मचारी, अंजनगाव पोलीस स्टेशनचे ३५ कर्मचारी व ६ अधिकारी असे ६७ कर्मचारी रुटमार्चमध्ये सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)