शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

अंजनगावात पथसंचलन

By admin | Updated: September 16, 2015 00:16 IST

अंजनगाव शहर ही गेली तीन-चार वर्षापूर्वी संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते.

अंजनगाव सुर्जी : अंजनगाव शहर ही गेली तीन-चार वर्षापूर्वी संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. परंतु त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच उपाययोजना करून अंजनगाव शहरात शांतता प्रस्थापित केली होती. त्याला मुख्य कारण तत्कालीन ठाणेदारपदी असलेले पोलीस निरीक्षक डोंगरे, ठाकरे, मानकर, पडघम व सद्यस्थितीत ठाणेदारपदी रुजू असलेले मल्लिकार्जुन इंगळे यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पथसंचलन केले.गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असताना अंजनगाव शहरात भावी काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, या मुख्य उद्देशाने उपविभागीय अधिकारी शिवतरे, ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे, उपनिरीक्षक उपासे, छत्रपती घावट, गायकवाड यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशन येथून ओम चौक, शनिवारा, आलम चौक, पाचपावली, नेताजी चौक, नवले चौक, डब्बीपुरा, शहापुरा मार्गे जुने एसटी स्टँड मार्गे गुलजारपुरा, पानअटाईमार्गे शनिवारा पोलीस स्टेशनमार्गे शहरातील दोन्ही भागामधून रुटमार्च काढण्यात आला. यामध्ये बनारस येथील सीआयएसएफचे २५ जवान व एक अधिकारी यामध्ये प्रमुख आकर्षण होते. रुटमार्चमध्ये पथ्रोट येथील पाच कर्मचारी व एक अधिकारी, रहिमापूर येथील पाच अधिकारी व एक कर्मचारी, अंजनगाव पोलीस स्टेशनचे ३५ कर्मचारी व ६ अधिकारी असे ६७ कर्मचारी रुटमार्चमध्ये सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)