शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा मार्ग

By admin | Updated: August 13, 2016 23:56 IST

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी विकासाची गंगोत्री ठरणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

पालकमंत्री : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांची भागिदारी अमरावती : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी विकासाची गंगोत्री ठरणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. शासनाच्या हमीसह या प्रकल्पात भागीदार व्हावे, अशी संकल्पना आहे. हा राज्यातील एकमेव प्रकल्प असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. या समृद्धी महामार्गामुळे राज्यातील २४ जिल्हे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. प्रत्यक्ष १० जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे. तासी १५० कि.मी. अशी या मार्गावर वेगमर्यादा राहणार आहे. यामध्ये नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ १६ तासांत पार करता येणार आहे. या प्रकल्पासाठी ८११ हेक्टर जमिनीचे भूसंचयन करण्यात येणार आहे. भूसंपादनाचाही पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असला तरी शेतकऱ्यांनी भूसंचयन करणे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यामध्ये कृषी समृद्धी केंद्र ही एक नवीन वसाहत राहणार आहे. या प्रकल्पात एखाद्या शेतकऱ्याची एक हेक्टर जमीन भूसंचयन केल्यास ती एक लाख १० हजार स्क्वेअर फूट होते व एका एकराची ४४ हजार फूट होते. याची नुकसान भरपाई शासन १० वर्षांमध्ये देणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना जिरायती क्षेत्रासाठी ३० टक्के जागा म्हणजेच ३३ हजार स्केअर फूट जागा मालकी हक्काने देणार आहे. या जागेची किंमत रेडीरेकनर दरानुसार २५६ रुपये स्क्वेअर फूट म्हणजेच ८४ लाख ४८ हजार रुपयांची ही जागा राहणार आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी २७ हजार ५०० फूट जागेचे २५६ स्क्वेअर फूट दरानुसार ७० लाख ४० हजार रुपये किंमत होत आहे. शेतकरी रस्त्यावर येऊ नये, अशी शासनाची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले. या किमतीमध्ये दरवर्षी ९ टक्के वाढ होणार आहे. म्हणजेच एका शेतकऱ्याला १० वर्षांत दीड कोटी किमतीची हमी शासन देत आहे. हे कृषी समृद्धी केंद्र एमएसआरडीसी विकसित करणार आहे. १ जानेवारीला प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊन २०१९ पर्यंत या मार्गावरून वाहने धावणार आहेत. काही व्यक्ती या प्रकल्पाचा अपप्रचार करीत आहेत. मात्र शासन जर या प्रकल्पात भागीदार होत आहे तर नुकसान कसे होणार, असे पालकमंत्री म्हणाले. यावेळी विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)भूसंचयन म्हणजे काय ? एखाद्या प्रकल्पासाठी भूसंपादन किंवा जमीन अधिग्रहण केली जाते. तेव्हा जमीन मालकाला काही पर्याय नसतो. त्याच्या सातबारावर शिक्का येतो आणि जमीन विकण्याचीही मुभा राहत नाही. एकरकमी मोबदला मिळतो. रेडीरेकनरमधल्या शासकीय किमतीचा पावणेचारपट मोबदला मिळतो. शासनाचे भूसंचयन करण्याच्या योजनेमुळे भूधारकाचे अनेक फायदे होणार आहेत. एकरकमी मोबदला मिळत नाही, हे खरे. पण त्यापेक्षाही भूसंचयन अधिक फायद्याचे ठरते. यात शेतकऱ्यांची जेवढी जमीन तो शासनाच्या हवाली करतो, त्या जमिनीच्या पावपट एवढी विकसित बिनशेती (एन.ए.) जमीन त्याला पूर्ण मालकी हक्काने मिळते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. असे आहेत भूसंचयनाचे फायदे शेतकऱ्यांनी जमीन भूसंचयन करताच त्यांना कृषी समृद्धी केंद्रामधील भूखंडाची विनाअट मालकी दिली जाणार आहे. यावर दहा वर्षे वाढते अनुदान आहे. दहा वर्षांनंतरच्या किमतीची हमी शासन देत आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या जमिनीच्या सातबाऱ्यावर कुठलाही शिक्का राहणार नाही. याच केंद्रात शेतकरीपुत्रांसाठी मोफत आयटीआय प्रशिक्षण, सर्वप्रमुख शहरांतील बाजारपेठेला जोडणारी व्यवस्था, शाळा, कॉलेज, दवाखाना, पोलीस ठाणे, पोस्ट, वाहतूक आदींची सोय राहणार आहे. या शहरात मोठे रस्ते, सांडपाणी, व्यवस्थापन, मुबलक पाणी, वीज, बगीचे व क्रीडांगणे राहणार आहे. याच सोबत उद्योग, कारखाने, सेवा, हॉटेल्स, बाजारपेठ, दुकाने, पेट्रोल तसेच शीतगृह, वरवारी, शेतीमाल प्रक्रिया केंद्र, फळप्रक्रिया केंद्र, माती तपासणी केंद्र राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.