शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा मार्ग

By admin | Updated: August 13, 2016 23:56 IST

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी विकासाची गंगोत्री ठरणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

पालकमंत्री : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांची भागिदारी अमरावती : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी विकासाची गंगोत्री ठरणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. शासनाच्या हमीसह या प्रकल्पात भागीदार व्हावे, अशी संकल्पना आहे. हा राज्यातील एकमेव प्रकल्प असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. या समृद्धी महामार्गामुळे राज्यातील २४ जिल्हे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. प्रत्यक्ष १० जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे. तासी १५० कि.मी. अशी या मार्गावर वेगमर्यादा राहणार आहे. यामध्ये नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ १६ तासांत पार करता येणार आहे. या प्रकल्पासाठी ८११ हेक्टर जमिनीचे भूसंचयन करण्यात येणार आहे. भूसंपादनाचाही पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असला तरी शेतकऱ्यांनी भूसंचयन करणे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यामध्ये कृषी समृद्धी केंद्र ही एक नवीन वसाहत राहणार आहे. या प्रकल्पात एखाद्या शेतकऱ्याची एक हेक्टर जमीन भूसंचयन केल्यास ती एक लाख १० हजार स्क्वेअर फूट होते व एका एकराची ४४ हजार फूट होते. याची नुकसान भरपाई शासन १० वर्षांमध्ये देणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना जिरायती क्षेत्रासाठी ३० टक्के जागा म्हणजेच ३३ हजार स्केअर फूट जागा मालकी हक्काने देणार आहे. या जागेची किंमत रेडीरेकनर दरानुसार २५६ रुपये स्क्वेअर फूट म्हणजेच ८४ लाख ४८ हजार रुपयांची ही जागा राहणार आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी २७ हजार ५०० फूट जागेचे २५६ स्क्वेअर फूट दरानुसार ७० लाख ४० हजार रुपये किंमत होत आहे. शेतकरी रस्त्यावर येऊ नये, अशी शासनाची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले. या किमतीमध्ये दरवर्षी ९ टक्के वाढ होणार आहे. म्हणजेच एका शेतकऱ्याला १० वर्षांत दीड कोटी किमतीची हमी शासन देत आहे. हे कृषी समृद्धी केंद्र एमएसआरडीसी विकसित करणार आहे. १ जानेवारीला प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊन २०१९ पर्यंत या मार्गावरून वाहने धावणार आहेत. काही व्यक्ती या प्रकल्पाचा अपप्रचार करीत आहेत. मात्र शासन जर या प्रकल्पात भागीदार होत आहे तर नुकसान कसे होणार, असे पालकमंत्री म्हणाले. यावेळी विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)भूसंचयन म्हणजे काय ? एखाद्या प्रकल्पासाठी भूसंपादन किंवा जमीन अधिग्रहण केली जाते. तेव्हा जमीन मालकाला काही पर्याय नसतो. त्याच्या सातबारावर शिक्का येतो आणि जमीन विकण्याचीही मुभा राहत नाही. एकरकमी मोबदला मिळतो. रेडीरेकनरमधल्या शासकीय किमतीचा पावणेचारपट मोबदला मिळतो. शासनाचे भूसंचयन करण्याच्या योजनेमुळे भूधारकाचे अनेक फायदे होणार आहेत. एकरकमी मोबदला मिळत नाही, हे खरे. पण त्यापेक्षाही भूसंचयन अधिक फायद्याचे ठरते. यात शेतकऱ्यांची जेवढी जमीन तो शासनाच्या हवाली करतो, त्या जमिनीच्या पावपट एवढी विकसित बिनशेती (एन.ए.) जमीन त्याला पूर्ण मालकी हक्काने मिळते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. असे आहेत भूसंचयनाचे फायदे शेतकऱ्यांनी जमीन भूसंचयन करताच त्यांना कृषी समृद्धी केंद्रामधील भूखंडाची विनाअट मालकी दिली जाणार आहे. यावर दहा वर्षे वाढते अनुदान आहे. दहा वर्षांनंतरच्या किमतीची हमी शासन देत आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या जमिनीच्या सातबाऱ्यावर कुठलाही शिक्का राहणार नाही. याच केंद्रात शेतकरीपुत्रांसाठी मोफत आयटीआय प्रशिक्षण, सर्वप्रमुख शहरांतील बाजारपेठेला जोडणारी व्यवस्था, शाळा, कॉलेज, दवाखाना, पोलीस ठाणे, पोस्ट, वाहतूक आदींची सोय राहणार आहे. या शहरात मोठे रस्ते, सांडपाणी, व्यवस्थापन, मुबलक पाणी, वीज, बगीचे व क्रीडांगणे राहणार आहे. याच सोबत उद्योग, कारखाने, सेवा, हॉटेल्स, बाजारपेठ, दुकाने, पेट्रोल तसेच शीतगृह, वरवारी, शेतीमाल प्रक्रिया केंद्र, फळप्रक्रिया केंद्र, माती तपासणी केंद्र राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.