शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

अपयशाचा मार्ग जातोय मृत्यूच्या दारात

By admin | Updated: February 1, 2015 22:47 IST

आजच्या स्पर्धात्मक युगात पैसा टाका अन् झटपट यश मिळवा, अशी मानसिकता मुला-मुलींची व पालकांची झाली आहे. यामध्ये अपयश आल्यास पावले आत्महत्त्येकडे वळतात.

वर्षभऱ्यात ३७ आत्महत्या : मनाविरुद्ध होणाऱ्या घटनांचा शेवटअमरावती : आजच्या स्पर्धात्मक युगात पैसा टाका अन् झटपट यश मिळवा, अशी मानसिकता मुला-मुलींची व पालकांची झाली आहे. यामध्ये अपयश आल्यास पावले आत्महत्त्येकडे वळतात. अशा आत्महत्येचे प्रमाण अलीकडेच वाढले आहे. जिल्ह्यात वर्षभरात ४७ आत्महत्या झाल्यात, असे प्रकार सामाजिकदृष्ट्या चिंताजनक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. आत्महत्यांमध्ये युवा वर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. नैराश्यातून आत्महत्या झालेल्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या युवापिढीच्या आहेत. नवविवाहिता, शाळकरी मुले, तरुण शेतकरी, उच्चशिक्षित नोकरवर्गही याला अपवाद नाही. आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. आजकाल प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियामुळे कॉलेज तरुणींमध्ये विचारांचे आदानप्रदान व एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झालेले आहे. पुस्तकापेक्षा मोबाईलवर चॅटींग करण्यात अधिकाधिक वेळ खर्ची घालणारा हा वर्ग यामध्ये धन्यता मानतात. यामधून मैत्री, प्रेम फुलत जाते आणि नको इतक्या प्रमाणात ते स्वत:ला वाहून घेतात. त्यातून एकतर्फी प्रेमाचा किंवा घरच्यांचा विरोध अशा गोष्टींमुळे तरुण तरुणींना नैराश्य येते आणि पावले आत्महत्येकडे वळतात. उच्चशिक्षित युवकांमध्येही आत्महत्येचे वाढते प्रमाण आहे. काही युवक स्वाभिमान दुखावल्याच्या नैराश्येतून आत्महत्या करतात, काही व्यक्ती व्यवसायात, नोकरीत थोड्याशा आलेल्या अपयशानेही जीवन संपवितात. सध्याच्या युगात प्रत्येक गोष्ट हायटेक बनली आहे. चैनीच्या वस्तू वापरामुळे जीवनही गतिमान झाले आहे. नवविवाहितांच्या आत्महत्यांमागे सासरचा जाच, चारित्र्यावर संशय, प्रॉपर्टी आणि पैशाची मागणी त्याचसोबत शिक्षणामुळे वाढत्या अपेक्षा, नैराश्य व अपमानास्पद जाचाला कंटाळून अखेर आत्महत्येचा पर्याय निवडतात.