शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अपयशाचा मार्ग जातोय मृत्यूच्या दारात

By admin | Updated: February 1, 2015 22:47 IST

आजच्या स्पर्धात्मक युगात पैसा टाका अन् झटपट यश मिळवा, अशी मानसिकता मुला-मुलींची व पालकांची झाली आहे. यामध्ये अपयश आल्यास पावले आत्महत्त्येकडे वळतात.

वर्षभऱ्यात ३७ आत्महत्या : मनाविरुद्ध होणाऱ्या घटनांचा शेवटअमरावती : आजच्या स्पर्धात्मक युगात पैसा टाका अन् झटपट यश मिळवा, अशी मानसिकता मुला-मुलींची व पालकांची झाली आहे. यामध्ये अपयश आल्यास पावले आत्महत्त्येकडे वळतात. अशा आत्महत्येचे प्रमाण अलीकडेच वाढले आहे. जिल्ह्यात वर्षभरात ४७ आत्महत्या झाल्यात, असे प्रकार सामाजिकदृष्ट्या चिंताजनक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. आत्महत्यांमध्ये युवा वर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. नैराश्यातून आत्महत्या झालेल्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या युवापिढीच्या आहेत. नवविवाहिता, शाळकरी मुले, तरुण शेतकरी, उच्चशिक्षित नोकरवर्गही याला अपवाद नाही. आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. आजकाल प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियामुळे कॉलेज तरुणींमध्ये विचारांचे आदानप्रदान व एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झालेले आहे. पुस्तकापेक्षा मोबाईलवर चॅटींग करण्यात अधिकाधिक वेळ खर्ची घालणारा हा वर्ग यामध्ये धन्यता मानतात. यामधून मैत्री, प्रेम फुलत जाते आणि नको इतक्या प्रमाणात ते स्वत:ला वाहून घेतात. त्यातून एकतर्फी प्रेमाचा किंवा घरच्यांचा विरोध अशा गोष्टींमुळे तरुण तरुणींना नैराश्य येते आणि पावले आत्महत्येकडे वळतात. उच्चशिक्षित युवकांमध्येही आत्महत्येचे वाढते प्रमाण आहे. काही युवक स्वाभिमान दुखावल्याच्या नैराश्येतून आत्महत्या करतात, काही व्यक्ती व्यवसायात, नोकरीत थोड्याशा आलेल्या अपयशानेही जीवन संपवितात. सध्याच्या युगात प्रत्येक गोष्ट हायटेक बनली आहे. चैनीच्या वस्तू वापरामुळे जीवनही गतिमान झाले आहे. नवविवाहितांच्या आत्महत्यांमागे सासरचा जाच, चारित्र्यावर संशय, प्रॉपर्टी आणि पैशाची मागणी त्याचसोबत शिक्षणामुळे वाढत्या अपेक्षा, नैराश्य व अपमानास्पद जाचाला कंटाळून अखेर आत्महत्येचा पर्याय निवडतात.