शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अपयशाचा मार्ग जातोय मृत्यूच्या दारात

By admin | Updated: February 1, 2015 22:47 IST

आजच्या स्पर्धात्मक युगात पैसा टाका अन् झटपट यश मिळवा, अशी मानसिकता मुला-मुलींची व पालकांची झाली आहे. यामध्ये अपयश आल्यास पावले आत्महत्त्येकडे वळतात.

वर्षभऱ्यात ३७ आत्महत्या : मनाविरुद्ध होणाऱ्या घटनांचा शेवटअमरावती : आजच्या स्पर्धात्मक युगात पैसा टाका अन् झटपट यश मिळवा, अशी मानसिकता मुला-मुलींची व पालकांची झाली आहे. यामध्ये अपयश आल्यास पावले आत्महत्त्येकडे वळतात. अशा आत्महत्येचे प्रमाण अलीकडेच वाढले आहे. जिल्ह्यात वर्षभरात ४७ आत्महत्या झाल्यात, असे प्रकार सामाजिकदृष्ट्या चिंताजनक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. आत्महत्यांमध्ये युवा वर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. नैराश्यातून आत्महत्या झालेल्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या युवापिढीच्या आहेत. नवविवाहिता, शाळकरी मुले, तरुण शेतकरी, उच्चशिक्षित नोकरवर्गही याला अपवाद नाही. आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. आजकाल प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियामुळे कॉलेज तरुणींमध्ये विचारांचे आदानप्रदान व एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झालेले आहे. पुस्तकापेक्षा मोबाईलवर चॅटींग करण्यात अधिकाधिक वेळ खर्ची घालणारा हा वर्ग यामध्ये धन्यता मानतात. यामधून मैत्री, प्रेम फुलत जाते आणि नको इतक्या प्रमाणात ते स्वत:ला वाहून घेतात. त्यातून एकतर्फी प्रेमाचा किंवा घरच्यांचा विरोध अशा गोष्टींमुळे तरुण तरुणींना नैराश्य येते आणि पावले आत्महत्येकडे वळतात. उच्चशिक्षित युवकांमध्येही आत्महत्येचे वाढते प्रमाण आहे. काही युवक स्वाभिमान दुखावल्याच्या नैराश्येतून आत्महत्या करतात, काही व्यक्ती व्यवसायात, नोकरीत थोड्याशा आलेल्या अपयशानेही जीवन संपवितात. सध्याच्या युगात प्रत्येक गोष्ट हायटेक बनली आहे. चैनीच्या वस्तू वापरामुळे जीवनही गतिमान झाले आहे. नवविवाहितांच्या आत्महत्यांमागे सासरचा जाच, चारित्र्यावर संशय, प्रॉपर्टी आणि पैशाची मागणी त्याचसोबत शिक्षणामुळे वाढत्या अपेक्षा, नैराश्य व अपमानास्पद जाचाला कंटाळून अखेर आत्महत्येचा पर्याय निवडतात.