शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

इंदूरकडे जाणाºया प्रवाशांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:21 IST

एकेकाळी दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा एकमेव पूर्णा-अकोला-महू (इंदूर) हा मीटरगेज रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करण्याच्या कामात विविध अडचणी येत असल्यामुळे....

ठळक मुद्देअंजनगाववासीयांची मागणी : अकोला-महू ब्रॉडगेज मार्ग पूर्ण करा

सुदेश मोरेलोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : एकेकाळी दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा एकमेव पूर्णा-अकोला-महू (इंदूर) हा मीटरगेज रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करण्याच्या कामात विविध अडचणी येत असल्यामुळे पश्चिम विदर्भातील अनेक गावांचा विकास मंदावला असल्याची ओरड होेत आहे. जे अंतर रेल्वेने २०० रुपयांत पार करता येते, त्यासाठी प्रवाशांना आठशे ते हजार रुपये खर्च करावा लागत आहे.इंदूरजवळील महूपासून खंडवाकडे येणाºया चोरल स्टेशनपर्यंत भूसंपादनात येणारे अडथळे आणि पहाडी क्षेत्रात ट्रॅक निर्मितीची समस्या यामुळे हे काम सध्या रखडले आहे. पश्चिम विदर्भातील रेल्वे मार्गावर एक प्रमुख स्टेशन असलेल्या अकोलापासून अकोटमार्गे इंदूर मध्यप्रदेशला जाणारा व प्रवाशांच्या खिशाला परवडणारा हा रेल्वेमार्ग यामुळे बंद पडला आहे. महू ते खंडवा मार्गावर पाताळपाणी या स्टेशनपासून चोरल स्थानकापर्यंत ही रेल्वे नवीन मार्गाने वळविण्यात येत आहे व त्यामुळे १५ किलोमीटरचे अंतरसुद्धा वाढले आहे.महू ते खंडवा हे अंतर जुन्या मार्गाने ११८ किलोमीटर आहे. मात्र नव्या वळणामुळे १३३ किलोमीटर होत आहे. नवीन वळणमार्ग करताना ही रेल्वे लाइन पाताळपाणीपासून बेडीदा गावाकडे वळविण्यात येते. हे वळण ४० किलोमीटर होते. जुन्या मार्गाने ते २५ किलोमीटर होते. त्यामुळे हा मार्ग १५ किमीने वाढला आहे. यासाठी किती वेळ लागेल? भूसंपादन प्रक्रिया कधी संपेल? याबाबत रेल्वे विभाग मौन बाळगून असल्याने दोनशे रुपयांत या मार्गे इंदूरला जाणाºया प्रवाशांना ट्रॅव्हल्सने पाचशे रुपयाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.सर्वोत्कृष्ट रेल्वे इंजिनीअरिंगचा नमुनाब्रिटिशकालीन रेल्वेमार्ग आगळीवेगळी सिग्नल सिस्टीम असलेला पूर्णा-अकोला ते महू इंदूर मीटरगेज रेल्वेमार्ग शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश शासनाने बांधला होता. सातपुडा पर्वताच्या घनदाट जंगलातून नद्या-डोंगरांचे अडथळे दूर करीत बांधलेला हा मार्ग तत्कालीन उत्कृष्ट इंजिनीअरिंगचा नमुना आहे.इंदूर ही रेडिमेड कापड, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल्स वस्तूंची मध्य भारतातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. यामुळे तालुका व लहान जिल्ह्यातील व्यापारी इंदूरहून व्यवहार करतात. अकोला ते महू मार्ग सुरू झाल्यास योग्य सोय होईल. बाजार विकसित होतील.- ब्रिजमोहन झंवर,अध्यक्ष, व्यापारी संघ, अंजनगावसध्या अंजनगाव किंवा पश्चिम विदर्भातील नागरिकांना ट्रॅव्हल्सनेच इंदूरला जावे लागते. विशेषत: मालवाहतूक करताना मोठा खर्च होतो. भाड्यापोटी होणारा मोठा खर्च रेल्वेमार्ग झाल्यास वाचू शकतो. प्रवाशांना बसणारा भुर्दंड वाचू शकेल.- महेंद्र शिंदी जामेकर,अंध्यक्ष, ग्राहक पंचायत, अंजनगाव