शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

इंदूरकडे जाणाºया प्रवाशांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:21 IST

एकेकाळी दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा एकमेव पूर्णा-अकोला-महू (इंदूर) हा मीटरगेज रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करण्याच्या कामात विविध अडचणी येत असल्यामुळे....

ठळक मुद्देअंजनगाववासीयांची मागणी : अकोला-महू ब्रॉडगेज मार्ग पूर्ण करा

सुदेश मोरेलोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : एकेकाळी दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा एकमेव पूर्णा-अकोला-महू (इंदूर) हा मीटरगेज रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करण्याच्या कामात विविध अडचणी येत असल्यामुळे पश्चिम विदर्भातील अनेक गावांचा विकास मंदावला असल्याची ओरड होेत आहे. जे अंतर रेल्वेने २०० रुपयांत पार करता येते, त्यासाठी प्रवाशांना आठशे ते हजार रुपये खर्च करावा लागत आहे.इंदूरजवळील महूपासून खंडवाकडे येणाºया चोरल स्टेशनपर्यंत भूसंपादनात येणारे अडथळे आणि पहाडी क्षेत्रात ट्रॅक निर्मितीची समस्या यामुळे हे काम सध्या रखडले आहे. पश्चिम विदर्भातील रेल्वे मार्गावर एक प्रमुख स्टेशन असलेल्या अकोलापासून अकोटमार्गे इंदूर मध्यप्रदेशला जाणारा व प्रवाशांच्या खिशाला परवडणारा हा रेल्वेमार्ग यामुळे बंद पडला आहे. महू ते खंडवा मार्गावर पाताळपाणी या स्टेशनपासून चोरल स्थानकापर्यंत ही रेल्वे नवीन मार्गाने वळविण्यात येत आहे व त्यामुळे १५ किलोमीटरचे अंतरसुद्धा वाढले आहे.महू ते खंडवा हे अंतर जुन्या मार्गाने ११८ किलोमीटर आहे. मात्र नव्या वळणामुळे १३३ किलोमीटर होत आहे. नवीन वळणमार्ग करताना ही रेल्वे लाइन पाताळपाणीपासून बेडीदा गावाकडे वळविण्यात येते. हे वळण ४० किलोमीटर होते. जुन्या मार्गाने ते २५ किलोमीटर होते. त्यामुळे हा मार्ग १५ किमीने वाढला आहे. यासाठी किती वेळ लागेल? भूसंपादन प्रक्रिया कधी संपेल? याबाबत रेल्वे विभाग मौन बाळगून असल्याने दोनशे रुपयांत या मार्गे इंदूरला जाणाºया प्रवाशांना ट्रॅव्हल्सने पाचशे रुपयाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.सर्वोत्कृष्ट रेल्वे इंजिनीअरिंगचा नमुनाब्रिटिशकालीन रेल्वेमार्ग आगळीवेगळी सिग्नल सिस्टीम असलेला पूर्णा-अकोला ते महू इंदूर मीटरगेज रेल्वेमार्ग शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश शासनाने बांधला होता. सातपुडा पर्वताच्या घनदाट जंगलातून नद्या-डोंगरांचे अडथळे दूर करीत बांधलेला हा मार्ग तत्कालीन उत्कृष्ट इंजिनीअरिंगचा नमुना आहे.इंदूर ही रेडिमेड कापड, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल्स वस्तूंची मध्य भारतातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. यामुळे तालुका व लहान जिल्ह्यातील व्यापारी इंदूरहून व्यवहार करतात. अकोला ते महू मार्ग सुरू झाल्यास योग्य सोय होईल. बाजार विकसित होतील.- ब्रिजमोहन झंवर,अध्यक्ष, व्यापारी संघ, अंजनगावसध्या अंजनगाव किंवा पश्चिम विदर्भातील नागरिकांना ट्रॅव्हल्सनेच इंदूरला जावे लागते. विशेषत: मालवाहतूक करताना मोठा खर्च होतो. भाड्यापोटी होणारा मोठा खर्च रेल्वेमार्ग झाल्यास वाचू शकतो. प्रवाशांना बसणारा भुर्दंड वाचू शकेल.- महेंद्र शिंदी जामेकर,अंध्यक्ष, ग्राहक पंचायत, अंजनगाव