शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी वाहतूक ‘ओव्हरलोड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:51 IST

शहरातील अस्तव्यस्त वाहतूक अपघातास कारणीभूत ठरत असून, ओव्हरलोड प्रवासी वाहतूकही सर्रास होत आहे.

ठळक मुद्देधोक्याची घंटा : शहर बस, आॅटो प्रवाशांचा जीव टांगणीला

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील अस्तव्यस्त वाहतूक अपघातास कारणीभूत ठरत असून, ओव्हरलोड प्रवासी वाहतूकही सर्रास होत आहे. शहर बस व आॅटो प्रवासी वाहतूक क्षमतेपेक्षा अधिक होत असतानाही वाहतूक पोलीस व महापालिका यंत्रणा गप्प आहे, ही धोक्याची घंटा असून, प्रवाशांच्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शहराच्या वर्दळीत धावणाºया शहर बस व आॅटोमध्ये क्षमतपेक्षा अधिक वाहतूक सुरु असताना प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अमरावती-बडनेरा मार्गावर हे दृष्य पाहताना अनेकांच्या भुवय्या उंचावत आहे. शहर बसच्या लटकून प्रवासी वाहतूक धोकादायक ठरत असतानाही प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यातच आॅटो चालकांचाही मनमानी कारभार वाहतुकीला बळ देत आहे. शहरात २५ च्याजवळपास शहर बसेस असून पाच हजारांवर आॅटो आहेत. दिवसभराच्या वर्दळीत शहरात बसेस व आॅटोंचे आवागमन सर्वाधिक आहे. पायी व दुचाकीस्वारांना बस व आॅटोच्या दुरूनच जावे लागत आहे. बस व आॅटो कुठे व कोणत्या क्षणी थांबेल, याचा अंदाज नागरिकांना येत नसल्याने अपघात घडत आहे. बस व आॅटो क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून जात असताना एकीकडे झुकल्या जातात, मात्र, त्याचीही पर्वा केली जात नाही. ही वाहतूक जीवघेणी ठरू शकते, याची पुसटशी कल्पनाही बस व आॅटो चालकांना नाही. असे असतानाही वाहतूक पोलीस, संबंधित ठाण्याच्या हद्दीतील पोलीस व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.