शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भातकुली काठावर ‘पास’; दहाही पालिका ‘फेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST

फोटो पी ०७ माझी वसुंधरा पान २ ची लिड ‘माझी वसुंधरा’ अभियान : १५०० गुणांची होती परीक्षा प्रदीप ...

फोटो पी ०७ माझी वसुंधरा

पान २ ची लिड

‘माझी वसुंधरा’ अभियान : १५०० गुणांची होती परीक्षा

प्रदीप भाकरे

अमरावती : पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात भातकुलीने नगरपंचायत गटात राज्यातून आठवा व जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकाविला. भातकुली नगरपंचायत १५०० पैकी ६२९ गुण मिळवून काठावर पास झाली. मात्र, जिल्ह्यातील इतर दहा पालिका, तीन नगरपंचायती व अमरावती महापालिका या स्पर्धेत सपशेल अपयशी ठरल्या आहेत.

राज्यातील सहभागी २३५ नगरपालिकांमधून जिल्ह्यातील दहा नगरपालिका ५ ते सर्वाधिक २० टक्के गुण मिळवू शकल्या. चिखलदरा, शेंदूरजनाघाट व दर्यापूर पालिका अनुक्रमे ६०, ७५ व ८९ व्या क्रमांकावर राहिल्या. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय विभागाच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत पाच गटांत स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी पर्यावरण दिनी ऑनलाईन पद्धतीने झाला. एप्रिल महिन्यात राज्यस्तरावरील पथकाने शहर व ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देऊन मूल्यांकन केले होते.

-----------

बॉक्स

अमरावती २८ मध्ये २१ व्या क्रमांकावर

जिल्ह्यातील पालिका, नगरपंचायत तथा ग्रामपंचायतींप्रमाणे अमरावती महापालिका क्षेत्रात ‘माझी वसुंधरा’ स्पर्धा घेण्यात आली. मात्र, अमरावती महापालिका एकूण २८ अमृत शहरांमध्ये २१ व्या क्रमांकावर राहिली. महानगरपालिकेला १५०० पैकी २६७ गुण प्राप्त झाले.

------

बॉक्स २

असा राहिला नगरपंचायतचा स्कोअर

स्पर्धेत सहभागी झालेल्या १३२ नगरपंचायतींपैकी भातकुली नगरपंचायत आठव्या क्रमांकावर राहिली. या पंचायतीला जिल्ह्यात सर्वाधिक ६२९ गुण मिळाले. २७३ गुण घेऊन तिवसा ३५ व्या स्थानी, १३६ गुण मिळविणारी धारणी नगरपंचायत १०६ व्या क्रमांकावर, तर नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत २३४ गुण मिळवून नगरपंचायत गटात ५१ व्या क्रमांकावर राहिली.

--------

बॉक्स ३

कुऱ्हा ग्रामपंचायतला केवळ १५ गुण

अभियानात ग्रामपंचायतीदेखील सहभागी झाल्या. मात्र, त्यांना १ ते १० टक्के गुण मिळविता आले. त्या सपशेल माघारल्या. सहभागी ३०४ ग्रामपंचायतींमध्ये ब्राम्हणवाडा थडी ११२ गुण घेऊन १२० व्या क्रमांकावर, वलगाव ९८ गुण घेऊन १४३ व्या, येवदा ८६ गुण घेऊन १६१ व्या, ५४ गुण घेऊन नांदगाव पेठ २०३ व्या, तळेगाव दशासर ४२ गुण घेऊन २२५ व्या, तर केवळ १५ गुण घेऊन कुऱ्हा ग्रामपंचायत २७२ व्या क्रमांकावर राहिली.

--------

क्रमांक नगरपालिका गुण

१०२ -चांदूर रेल्वे २५५

११७- मोर्शी २४१

१३८ - अचलपूर २१९

१७३ अंजनगाव सुर्जी १७५

१८२ वरूड १६४

२२९ धामणगाव रेल्वे ८१

६० चिखलदरा ३११

८९ दर्यापूर २७१

१७० चांदूर बाजार १७७

७५ शेंदूरजनाघाट २९३

--------------

सहभागी स्थानिक स्वराज्य संस्था

२३५ नगरपरिषद

२८ अमृत सिटी

१३२ नगरपंचायत

३०४ ग्रामपंचायत

---------

कोट

माझी वसुंधरा या अभियानात एकूण १३२ नगरपंचायतींनी सहभाग घेतला होता. ५ जून रोजी जाहीर झालेल्या निकालामध्ये भातकुली नगरपंचायतने राज्यातून आठवा, तर जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळवला. भातकुलीला ६२९ गुण प्राप्त झाले. प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी तसेच शहरातील सर्व नागरिकांच्या सांघिक प्रयत्नातून हे यश प्राप्त झाले.

- करिश्मा वैद्य, मुख्याधिकारी, भातकुली

--------------