शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भातकुली काठावर ‘पास’; दहाही पालिका ‘फेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST

फोटो पी ०७ माझी वसुंधरा पान २ ची लिड ‘माझी वसुंधरा’ अभियान : १५०० गुणांची होती परीक्षा प्रदीप ...

फोटो पी ०७ माझी वसुंधरा

पान २ ची लिड

‘माझी वसुंधरा’ अभियान : १५०० गुणांची होती परीक्षा

प्रदीप भाकरे

अमरावती : पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात भातकुलीने नगरपंचायत गटात राज्यातून आठवा व जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकाविला. भातकुली नगरपंचायत १५०० पैकी ६२९ गुण मिळवून काठावर पास झाली. मात्र, जिल्ह्यातील इतर दहा पालिका, तीन नगरपंचायती व अमरावती महापालिका या स्पर्धेत सपशेल अपयशी ठरल्या आहेत.

राज्यातील सहभागी २३५ नगरपालिकांमधून जिल्ह्यातील दहा नगरपालिका ५ ते सर्वाधिक २० टक्के गुण मिळवू शकल्या. चिखलदरा, शेंदूरजनाघाट व दर्यापूर पालिका अनुक्रमे ६०, ७५ व ८९ व्या क्रमांकावर राहिल्या. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय विभागाच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत पाच गटांत स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी पर्यावरण दिनी ऑनलाईन पद्धतीने झाला. एप्रिल महिन्यात राज्यस्तरावरील पथकाने शहर व ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देऊन मूल्यांकन केले होते.

-----------

बॉक्स

अमरावती २८ मध्ये २१ व्या क्रमांकावर

जिल्ह्यातील पालिका, नगरपंचायत तथा ग्रामपंचायतींप्रमाणे अमरावती महापालिका क्षेत्रात ‘माझी वसुंधरा’ स्पर्धा घेण्यात आली. मात्र, अमरावती महापालिका एकूण २८ अमृत शहरांमध्ये २१ व्या क्रमांकावर राहिली. महानगरपालिकेला १५०० पैकी २६७ गुण प्राप्त झाले.

------

बॉक्स २

असा राहिला नगरपंचायतचा स्कोअर

स्पर्धेत सहभागी झालेल्या १३२ नगरपंचायतींपैकी भातकुली नगरपंचायत आठव्या क्रमांकावर राहिली. या पंचायतीला जिल्ह्यात सर्वाधिक ६२९ गुण मिळाले. २७३ गुण घेऊन तिवसा ३५ व्या स्थानी, १३६ गुण मिळविणारी धारणी नगरपंचायत १०६ व्या क्रमांकावर, तर नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत २३४ गुण मिळवून नगरपंचायत गटात ५१ व्या क्रमांकावर राहिली.

--------

बॉक्स ३

कुऱ्हा ग्रामपंचायतला केवळ १५ गुण

अभियानात ग्रामपंचायतीदेखील सहभागी झाल्या. मात्र, त्यांना १ ते १० टक्के गुण मिळविता आले. त्या सपशेल माघारल्या. सहभागी ३०४ ग्रामपंचायतींमध्ये ब्राम्हणवाडा थडी ११२ गुण घेऊन १२० व्या क्रमांकावर, वलगाव ९८ गुण घेऊन १४३ व्या, येवदा ८६ गुण घेऊन १६१ व्या, ५४ गुण घेऊन नांदगाव पेठ २०३ व्या, तळेगाव दशासर ४२ गुण घेऊन २२५ व्या, तर केवळ १५ गुण घेऊन कुऱ्हा ग्रामपंचायत २७२ व्या क्रमांकावर राहिली.

--------

क्रमांक नगरपालिका गुण

१०२ -चांदूर रेल्वे २५५

११७- मोर्शी २४१

१३८ - अचलपूर २१९

१७३ अंजनगाव सुर्जी १७५

१८२ वरूड १६४

२२९ धामणगाव रेल्वे ८१

६० चिखलदरा ३११

८९ दर्यापूर २७१

१७० चांदूर बाजार १७७

७५ शेंदूरजनाघाट २९३

--------------

सहभागी स्थानिक स्वराज्य संस्था

२३५ नगरपरिषद

२८ अमृत सिटी

१३२ नगरपंचायत

३०४ ग्रामपंचायत

---------

कोट

माझी वसुंधरा या अभियानात एकूण १३२ नगरपंचायतींनी सहभाग घेतला होता. ५ जून रोजी जाहीर झालेल्या निकालामध्ये भातकुली नगरपंचायतने राज्यातून आठवा, तर जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळवला. भातकुलीला ६२९ गुण प्राप्त झाले. प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी तसेच शहरातील सर्व नागरिकांच्या सांघिक प्रयत्नातून हे यश प्राप्त झाले.

- करिश्मा वैद्य, मुख्याधिकारी, भातकुली

--------------