शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

अर्धवट कालव्याचे पाणी उठले शेतकऱ्याच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:30 IST

अपुऱ्या कालव्याच्या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात पाणी संत्राबागेसह शेतात शिरून त्याचा तलाव होत आहे.

ठळक मुद्देतीन वर्षात शेकडो तक्रारी : पाटबंधारे विभागाची हेकेखोरी

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : अपुऱ्या कालव्याच्या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात पाणी संत्राबागेसह शेतात शिरून त्याचा तलाव होत आहे. परिणामी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने आर्थिक फटका बसत असल्याची तक्रार तब्बल तीन वर्षांपासून संबंधित विभागाला शेतकऱ्याने केली. परंतु, हेकेखोर अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप धामणगाव गढी येथील योगेश डांगे या शेतकऱ्याने केला आहे.अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी हे गाव मेळघाटच्या पायथ्याशी वसलेले आहे. परिसरातील चंद्रभागा प्रकल्पाचे पाणी कालव्यातून शेतकºयांना ओलितासाठी देण्यात येते. मात्र, कालव्याचे बांधकाम अर्धवट करण्यात आल्याने ओलितासाठी सोडण्यात आलेले पाणी थेट शेतात शिरून तलाव होत आहे. धामणगाव गढी येथील शेतकरी योगेश साहेबराव डांगे यांनी सदर प्रकाराबद्दल २० नोव्हेंबर २०१४ ते आतापर्यंत मध्यम लघू पाटबंधारे विभाग, अचलपूरसह जिल्हाधिकाºयांना पत्र दिले. मात्र, त्याचा काहीएक परिणाम झाला नाही. नेहमीप्रमाणे आश्वासनाची खैरात देत त्यांची बोळवण करण्यात आल्याचा अनुभव त्यांना आला आहे.माझी चूक काय नुकसान भरपाई द्याअर्धवट कालवा बांधून त्याचे पाणी शेतात सोडल्याने मागील तीन वर्षांत मोठे आर्थिक नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई आपण मिळावी आणि शेतात शिरणारे पाणी कालवा पूर्ण करून बंद करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात या गरीब शेतकºयाने केली आहे.कोण देणार न्याय?मी अल्पभूधारक शेतकरी आहे. न्याय मागण्यासाठी मागील तीन वर्षांपासून कार्यालयात चपला झिजल्या. सोबत कागदी घोडे नाचविले. मात्र, पदरी निराशाच आली. शेतात पाणी शिरत असल्याने संत्रा झाडांची वाढ खुंटली आहे, तर इतर पिके सडल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. सरकार मायबाप शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे सांगते. मात्र, त्यांचे प्रशासनातील अधिकारी शेतकऱ्यांच्या जिवावर उठल्याचा प्रकार धामणगाव गढी येथे उघडकीस आला आहे. कोण देणार न्याय, हाच सवाल योगेश डांगे या अल्पभूधारक शेतकºयाने विचारला आहे.