शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नंदनवन गारठले

By admin | Updated: June 12, 2017 00:09 IST

विदर्भाचे एकमेव पर्यटन स्थळ चिखलदऱ्यात मान्सूनच्या आगमनाने सर्वत्र वातावरण आल्हाददायी झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे एकमेव पर्यटन स्थळ चिखलदऱ्यात मान्सूनच्या आगमनाने सर्वत्र वातावरण आल्हाददायी झाले आहे. दाट धुक्याने शहरासह रस्ते हरविल्याने पर्यटकांना दिवसा आपल्या वाहनांचे दिवे लावून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी चिखलदरा पर्यटन स्थळावर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. रविवारी त्याचा प्रत्यय आला. अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूरकर लगतच्या मध्यप्रदेशातील इंदूर, खंडवा परिसराच्या पर्यटकांनी वातावरणाचा आनंद घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.चिखलदरा पर्यटन स्थळावर ७ ते ११ जूनपर्यंत सलग पाच दिवस बरसल्याने ६२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या पहिल्या सरी चांगल्या बरसल्याने पर्यटन स्थळावर गारवा निर्माण झाला आहे. गतवर्षी १४६० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तर ११ जूनपर्यंत ४१ मि.मी. नोंद होती. पावसामुळे परिसरातील नदी-नाले हळूवार खळखळू लागले असून उन्हाळ्यात बोडखे पडलेले जंगल आता कात टाकीत हिरवे होऊ लागले आहे.मान्सूनपूर्व पावसाची जिल्ह्यात दमदार हजेरीअमरावती : मान्सूनपूर्व पावसाने रविवारी जिल्ह्यातील काही भागात दमदार हजेरी लावल्याने आल्हाददायक वातारवण निर्मीत झाले. नैऋुत्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होऊन त्याचे रुपातंर वादळात होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली. यासंबधाने चक्राकार वारे असल्यामुळे विदर्भ मराठवाड्यावर ढंगाची गर्दी झाली आहे. महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. सद्यस्थितीत मान्सून कोकणच्या उत्तर भागात, पश्चिम महाराष्ट्रच्या तसेच मराठवाड्याच्या काही भागात पोहोचण्यास हवामान शास्त्रीय परिस्थिती अनुकुल आहे. त्यामुळे मान्सूनची विदर्भाकडे पुढील वाटचाल सुरु झाली आहे. रविवारी जिल्ह्यातील काही ठिकाणी दमदार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. १५ जूननंतर मान्सून विदर्भात दाखल होण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहे. दाट धुक्यात हरविले चिखलदरादाट धुके अन् बेपत्ता रस्तेपावसाच्या आगमनासोबत किंवा चाहूल लागताच विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या पर्यटन नगरीत दाट पांढरे शुुभ्र धुके पर्यटकांसाठी खास आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. रविवारी पहाटे ४ वाजतापासून तर शहर आणि रस्ते धुक्यात हरविले होते. पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना दिवसा आपल्या दुचाकीसह मोठ्या वाहनांचे लाईट लावून प्रवास करावा लागला. या परिसरात सध्या गारव्याचा आनंद नागरिकांना मिळत आहे.