शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

देवमाळी ग्रामपंचायत सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:25 IST

शहराला लागून असलेल्या देवमाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके विजयी झाल्या. या ग्रामपंचायतसाठी रविवारी झालेल्या मतदानाची सोमवारी मतमोजणी झाली. त्यात पद्मा सोळंके यांनी भाजपच्या शारदा उईके यांचा ७७ मतांनी पराभव केला. ११ सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक पाच, प्रहार तीन, काँग्रेसचे दोन व एक अपक्ष सदस्य विजयी झाले.

ठळक मुद्देसिंह आला पण गड गेला : भाजप ५, प्रहार ३, काँग्रेस २, एक अपक्ष विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहराला लागून असलेल्या देवमाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके विजयी झाल्या. या ग्रामपंचायतसाठी रविवारी झालेल्या मतदानाची सोमवारी मतमोजणी झाली. त्यात पद्मा सोळंके यांनी भाजपच्या शारदा उईके यांचा ७७ मतांनी पराभव केला. ११ सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक पाच, प्रहार तीन, काँग्रेसचे दोन व एक अपक्ष सदस्य विजयी झाले.नवनिर्वाचित सरपंच पद्मा नागेश्वर सोळंके यांना ९४४ मते मिळाली, तर भाजपच्या पराभूत उमेदवार शारदा संजय उईके यांना ८६७ मते मिळाली. सरपंचांसह प्रहारचे तीन सदस्य निवडून आले असल्याने ‘गड आला पण सिंह गेला’ अशी प्रहारची राजकीय स्थिती झाली. चार वॉर्डात विजयी ठरलेल्या ११ सदस्यांमध्ये कुंदनसिंह चंदनसिंह चव्हाण (भाजप) १७१ ,मंदा सुनील भोयर (भाजप) १७८, जयश्री आशिष उईके (भाजप) २६४, शैलेश प्रतापराव म्हाला (काँग्रेस) २४८, प्रतिभा मधुकर रोंघे (काँग्रेस) १८२, प्रवीण मुरलीधर खानझोडे (प्रहार) २२५, सुनीता वासुदेव कळसकर (प्रहार) २७०, संगीता सुरज हरदे (अपक्ष) २०६, अजिंक्य प्रताप अभ्यंकर (भाजप) ३३०, प्रियंका नीलेश लायस्कर (प्रहार) २८०, वैशाली अरविंद पिहूलकर (भाजप) ३०२ मते यांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी १० वाजता अचलपूर तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली.तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी निर्भय जैन यांच्या मार्गदर्शनात सहायक निवडणूक अधिकारी सुनिल तळोकार, योगेश देशमुख, जयप्रकाश त्रिपाठी यांनी काम पाहिले. कुठलाच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तहसील कार्यालयाबाहेर ठेवण्यात आला होता.जुने पराभूत; अजिंक्य सर्वाधिक मतांनी विजयीप्रहारचे बल्लू जवंजाळ व सहकाऱ्यांनी निवडणुकीचा किल्ला लढविला, तर भाजपतर्फे प्रताप अभ्यंकर, साहेबराव काठोळे, अभय माथने यांच्यासह दिग्गजांनी प्रहारच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत हिसकावण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी ठरला. जि प. सदस्य प्रताप अभ्यंकर यांचे पुत्र अजिंक्य अभ्यंकर यांनी सर्वाधिक मते घेऊन विजय प्राप्त केला, तर प्रहारचे दोन सदस्य पाच मतांच्या फरकाने निवडून आलेत. येत्या मे महिन्यांत जुन्या सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. जुन्यांपैकी एकही सदस्य निवडून आला नाही.