शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

देवमाळी ग्रामपंचायत सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:25 IST

शहराला लागून असलेल्या देवमाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके विजयी झाल्या. या ग्रामपंचायतसाठी रविवारी झालेल्या मतदानाची सोमवारी मतमोजणी झाली. त्यात पद्मा सोळंके यांनी भाजपच्या शारदा उईके यांचा ७७ मतांनी पराभव केला. ११ सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक पाच, प्रहार तीन, काँग्रेसचे दोन व एक अपक्ष सदस्य विजयी झाले.

ठळक मुद्देसिंह आला पण गड गेला : भाजप ५, प्रहार ३, काँग्रेस २, एक अपक्ष विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहराला लागून असलेल्या देवमाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके विजयी झाल्या. या ग्रामपंचायतसाठी रविवारी झालेल्या मतदानाची सोमवारी मतमोजणी झाली. त्यात पद्मा सोळंके यांनी भाजपच्या शारदा उईके यांचा ७७ मतांनी पराभव केला. ११ सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक पाच, प्रहार तीन, काँग्रेसचे दोन व एक अपक्ष सदस्य विजयी झाले.नवनिर्वाचित सरपंच पद्मा नागेश्वर सोळंके यांना ९४४ मते मिळाली, तर भाजपच्या पराभूत उमेदवार शारदा संजय उईके यांना ८६७ मते मिळाली. सरपंचांसह प्रहारचे तीन सदस्य निवडून आले असल्याने ‘गड आला पण सिंह गेला’ अशी प्रहारची राजकीय स्थिती झाली. चार वॉर्डात विजयी ठरलेल्या ११ सदस्यांमध्ये कुंदनसिंह चंदनसिंह चव्हाण (भाजप) १७१ ,मंदा सुनील भोयर (भाजप) १७८, जयश्री आशिष उईके (भाजप) २६४, शैलेश प्रतापराव म्हाला (काँग्रेस) २४८, प्रतिभा मधुकर रोंघे (काँग्रेस) १८२, प्रवीण मुरलीधर खानझोडे (प्रहार) २२५, सुनीता वासुदेव कळसकर (प्रहार) २७०, संगीता सुरज हरदे (अपक्ष) २०६, अजिंक्य प्रताप अभ्यंकर (भाजप) ३३०, प्रियंका नीलेश लायस्कर (प्रहार) २८०, वैशाली अरविंद पिहूलकर (भाजप) ३०२ मते यांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी १० वाजता अचलपूर तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली.तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी निर्भय जैन यांच्या मार्गदर्शनात सहायक निवडणूक अधिकारी सुनिल तळोकार, योगेश देशमुख, जयप्रकाश त्रिपाठी यांनी काम पाहिले. कुठलाच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तहसील कार्यालयाबाहेर ठेवण्यात आला होता.जुने पराभूत; अजिंक्य सर्वाधिक मतांनी विजयीप्रहारचे बल्लू जवंजाळ व सहकाऱ्यांनी निवडणुकीचा किल्ला लढविला, तर भाजपतर्फे प्रताप अभ्यंकर, साहेबराव काठोळे, अभय माथने यांच्यासह दिग्गजांनी प्रहारच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत हिसकावण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी ठरला. जि प. सदस्य प्रताप अभ्यंकर यांचे पुत्र अजिंक्य अभ्यंकर यांनी सर्वाधिक मते घेऊन विजय प्राप्त केला, तर प्रहारचे दोन सदस्य पाच मतांच्या फरकाने निवडून आलेत. येत्या मे महिन्यांत जुन्या सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. जुन्यांपैकी एकही सदस्य निवडून आला नाही.