शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

देवमाळी ग्रामपंचायत सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:25 IST

शहराला लागून असलेल्या देवमाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके विजयी झाल्या. या ग्रामपंचायतसाठी रविवारी झालेल्या मतदानाची सोमवारी मतमोजणी झाली. त्यात पद्मा सोळंके यांनी भाजपच्या शारदा उईके यांचा ७७ मतांनी पराभव केला. ११ सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक पाच, प्रहार तीन, काँग्रेसचे दोन व एक अपक्ष सदस्य विजयी झाले.

ठळक मुद्देसिंह आला पण गड गेला : भाजप ५, प्रहार ३, काँग्रेस २, एक अपक्ष विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहराला लागून असलेल्या देवमाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके विजयी झाल्या. या ग्रामपंचायतसाठी रविवारी झालेल्या मतदानाची सोमवारी मतमोजणी झाली. त्यात पद्मा सोळंके यांनी भाजपच्या शारदा उईके यांचा ७७ मतांनी पराभव केला. ११ सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक पाच, प्रहार तीन, काँग्रेसचे दोन व एक अपक्ष सदस्य विजयी झाले.नवनिर्वाचित सरपंच पद्मा नागेश्वर सोळंके यांना ९४४ मते मिळाली, तर भाजपच्या पराभूत उमेदवार शारदा संजय उईके यांना ८६७ मते मिळाली. सरपंचांसह प्रहारचे तीन सदस्य निवडून आले असल्याने ‘गड आला पण सिंह गेला’ अशी प्रहारची राजकीय स्थिती झाली. चार वॉर्डात विजयी ठरलेल्या ११ सदस्यांमध्ये कुंदनसिंह चंदनसिंह चव्हाण (भाजप) १७१ ,मंदा सुनील भोयर (भाजप) १७८, जयश्री आशिष उईके (भाजप) २६४, शैलेश प्रतापराव म्हाला (काँग्रेस) २४८, प्रतिभा मधुकर रोंघे (काँग्रेस) १८२, प्रवीण मुरलीधर खानझोडे (प्रहार) २२५, सुनीता वासुदेव कळसकर (प्रहार) २७०, संगीता सुरज हरदे (अपक्ष) २०६, अजिंक्य प्रताप अभ्यंकर (भाजप) ३३०, प्रियंका नीलेश लायस्कर (प्रहार) २८०, वैशाली अरविंद पिहूलकर (भाजप) ३०२ मते यांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी १० वाजता अचलपूर तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली.तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी निर्भय जैन यांच्या मार्गदर्शनात सहायक निवडणूक अधिकारी सुनिल तळोकार, योगेश देशमुख, जयप्रकाश त्रिपाठी यांनी काम पाहिले. कुठलाच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तहसील कार्यालयाबाहेर ठेवण्यात आला होता.जुने पराभूत; अजिंक्य सर्वाधिक मतांनी विजयीप्रहारचे बल्लू जवंजाळ व सहकाऱ्यांनी निवडणुकीचा किल्ला लढविला, तर भाजपतर्फे प्रताप अभ्यंकर, साहेबराव काठोळे, अभय माथने यांच्यासह दिग्गजांनी प्रहारच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत हिसकावण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी ठरला. जि प. सदस्य प्रताप अभ्यंकर यांचे पुत्र अजिंक्य अभ्यंकर यांनी सर्वाधिक मते घेऊन विजय प्राप्त केला, तर प्रहारचे दोन सदस्य पाच मतांच्या फरकाने निवडून आलेत. येत्या मे महिन्यांत जुन्या सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. जुन्यांपैकी एकही सदस्य निवडून आला नाही.