शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

देवमाळी ग्रामपंचायत सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:25 IST

शहराला लागून असलेल्या देवमाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके विजयी झाल्या. या ग्रामपंचायतसाठी रविवारी झालेल्या मतदानाची सोमवारी मतमोजणी झाली. त्यात पद्मा सोळंके यांनी भाजपच्या शारदा उईके यांचा ७७ मतांनी पराभव केला. ११ सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक पाच, प्रहार तीन, काँग्रेसचे दोन व एक अपक्ष सदस्य विजयी झाले.

ठळक मुद्देसिंह आला पण गड गेला : भाजप ५, प्रहार ३, काँग्रेस २, एक अपक्ष विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहराला लागून असलेल्या देवमाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके विजयी झाल्या. या ग्रामपंचायतसाठी रविवारी झालेल्या मतदानाची सोमवारी मतमोजणी झाली. त्यात पद्मा सोळंके यांनी भाजपच्या शारदा उईके यांचा ७७ मतांनी पराभव केला. ११ सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक पाच, प्रहार तीन, काँग्रेसचे दोन व एक अपक्ष सदस्य विजयी झाले.नवनिर्वाचित सरपंच पद्मा नागेश्वर सोळंके यांना ९४४ मते मिळाली, तर भाजपच्या पराभूत उमेदवार शारदा संजय उईके यांना ८६७ मते मिळाली. सरपंचांसह प्रहारचे तीन सदस्य निवडून आले असल्याने ‘गड आला पण सिंह गेला’ अशी प्रहारची राजकीय स्थिती झाली. चार वॉर्डात विजयी ठरलेल्या ११ सदस्यांमध्ये कुंदनसिंह चंदनसिंह चव्हाण (भाजप) १७१ ,मंदा सुनील भोयर (भाजप) १७८, जयश्री आशिष उईके (भाजप) २६४, शैलेश प्रतापराव म्हाला (काँग्रेस) २४८, प्रतिभा मधुकर रोंघे (काँग्रेस) १८२, प्रवीण मुरलीधर खानझोडे (प्रहार) २२५, सुनीता वासुदेव कळसकर (प्रहार) २७०, संगीता सुरज हरदे (अपक्ष) २०६, अजिंक्य प्रताप अभ्यंकर (भाजप) ३३०, प्रियंका नीलेश लायस्कर (प्रहार) २८०, वैशाली अरविंद पिहूलकर (भाजप) ३०२ मते यांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी १० वाजता अचलपूर तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली.तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी निर्भय जैन यांच्या मार्गदर्शनात सहायक निवडणूक अधिकारी सुनिल तळोकार, योगेश देशमुख, जयप्रकाश त्रिपाठी यांनी काम पाहिले. कुठलाच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तहसील कार्यालयाबाहेर ठेवण्यात आला होता.जुने पराभूत; अजिंक्य सर्वाधिक मतांनी विजयीप्रहारचे बल्लू जवंजाळ व सहकाऱ्यांनी निवडणुकीचा किल्ला लढविला, तर भाजपतर्फे प्रताप अभ्यंकर, साहेबराव काठोळे, अभय माथने यांच्यासह दिग्गजांनी प्रहारच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत हिसकावण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी ठरला. जि प. सदस्य प्रताप अभ्यंकर यांचे पुत्र अजिंक्य अभ्यंकर यांनी सर्वाधिक मते घेऊन विजय प्राप्त केला, तर प्रहारचे दोन सदस्य पाच मतांच्या फरकाने निवडून आलेत. येत्या मे महिन्यांत जुन्या सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. जुन्यांपैकी एकही सदस्य निवडून आला नाही.