शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

अशासकीय प्रशासक मंडळाच्या हालचालींना वेग

By admin | Updated: August 1, 2014 00:03 IST

सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर असलेल्या शासकीय प्रशासकांना बसविण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे.

अमरावती बाजार समिती : इच्छुक पुढारी लागले कामालाजितेंद्र दखने - अमरावतीसहकार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर असलेल्या शासकीय प्रशासकांना बसविण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. यामध्ये वर्णी लागावी यासाठी अनेक इच्छुक पुढाऱ्यांनी आपआपल्या राजकीय गॉडफादरमार्फत जोरदार 'लॉबींग' सुरु केली आहे. जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी सध्या अचलपूर, अमरावती आणि अंजनगाव सुर्जी या तीन कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासकीय प्रशासक कार्यरत आहेत. तर नांदगाव खंडेश्वर व तिवसा बाजार समीतीवर अशासकीय प्रशासक मंडळ कार्यरत आहे व वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे, दर्यापूर आणि धारणी या सात बाजार समितींवर विद्यमान संचालक मंडळ कार्यभार सांभाळत आहेत. यापैकी दर्यापूर आणि वरुड बाजार समितीच्या संचालक मंडळाची येत्या आॅगस्ट महिन्याअखेर कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने या बाजार समित्यांवर शासकीय प्रशासक नियुक्त केलेजाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, तिवसा, अचलपूर, अमरावती, अंजनगाव सुर्जी या पाच बाजार समितींच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे १० एप्रिल २०१४ नंतर राज्य शासनाने या बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिन्यांपर्यंत पुढे ढकलल्यामुळे येथील प्रशासक हटवून अशासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी शासनस्तरावर राजकीय पुढाऱ्यांनी अशासकीय प्रशासक मंडळाची मांगणी रेटून धरली याची दखल घेत शासन स्तरावरुन जिल्हा निबंधकांना प्रस्ताव मागविण्यात आले. यामध्ये अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी या तीन बाजार समितींचा समावेश आहे. या समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ निवडीच्या हालचाली तेज होताच राजकीय गॉडफादर कडे जोरदार लॉबींग सुरु केले असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा निबंधकांनी संबंधीत तालुक्याचे सहायक निबंधक यांच्या मार्फत पडताळणी प्रस्ताव मागवून हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती आहे. राजकीय हालचालींना वेग आल्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्र ढवळून निघाले आहे.