शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

ऑक्सिजनअभावी कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, रेकाॅर्डवर नोंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:13 IST

अमरावती : करोनाच्या दुसऱ्या लाटेत ७० हजारांवर व्यक्तींना संसर्ग झाला. यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर झाली. यावेळी ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची मोठी ...

अमरावती : करोनाच्या दुसऱ्या लाटेत ७० हजारांवर व्यक्तींना संसर्ग झाला. यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर झाली. यावेळी ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची मोठी समस्या निर्माण झाली होती. या लाटेत काही रुग्णांचे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचा आरोप मृतांच्या आप्तांकडून होत आहे. मात्र, अशा मृत्यूची नोंदी शासकीय व खासगी रुग्णालयांकडे नसल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाममुळे कोणाची आई तर कुणाचे वडील, कुणाचे भाऊ बहीण या संकटाने हिरावले आहे. मृत्यूसाठी वेगवेगळी कारणे दर्शविण्यात येत असली तरी रुग्णालयाचा हलगर्जीपणा याला कारणीभूत असल्याचा आरोप रुग्णांचे नातेवाईकांकडून केल्या जात आहे.

दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील रोज नोंद होणारे एक हजारांवर रुग्ण व लगतच्या नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ तसेच मध्यप्रदेशातूनही गंभीर रुग्ण शहरात उपचारासाठी दाखल झालेत. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर कमी पडले होते. ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचेही नाकारता येत नाही. काही रुग्णांचे नातेवाईकांद्वारा असा आरोप करण्यात येत आहे. मात्र, आरोग्य विभाग म्हणतो रुग्णांच्या मृत्यूची तशी नोंद नाही. किंबहुना याविषयी आरोग्य विभागाकडे तशी तक्रार दाखल नसल्याचे सांगण्यात आले.

पाईंटर

एकूण रुग्ण : ९६,४९२

बरे झालेले : ९४,८४३

उपचार सुरू : ८८

मृत्यू : १,५६१

बॉक्स

‘त्या’ दिवशी काय घडले

*नागपूर जिल्ह्यातून येथे एप्रिल महिन्यात उपचाराला आलेल्या संक्रमितांचा एचआरसीटी स्कोर १९ होता व ऑक्सिजनचे प्रमाण ६० ते ६५ चे दरम्यान होते. *दोन रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने दाखल करण्यास नाकारले. अन्य एका रुग्णालयात बेड मिळाला. मात्र, ऑक्सिजन वेळेवर मिळाला नाही.

*त्या रुग्णाचा लगेच मृत्यू झाला, याच महिन्यात काही रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांचे सहा तासात काही मृत्यू झालेले आहेत.

बॉक्स

कुटुंबीय म्हणतात

पती

रुग्णाला थोडे घाबरल्यासारखे वाटत होते, श्वास घ्यायला त्रास होत होता. आत प्रवेश नसल्याने आम्ही सर्व रुग्णालयाचे बाहेर होतो. आम्ही डॉक्टरांना याची कल्पना दिली, मात्र, डॉक्टरांनी ऑक्सिजन लावला नाही. शेवटी गंभीर स्थिती झाल्यावर झाल्यावर सावरासावर करण्यासाठी ऑक्सिजन लावला. मात्र, उशीर झाला होता.

भाऊ

रुग्णाची प्रकृती सध्या गंभीर आहे, असे माहित असतांना ऑक्सिजन लावण्यात आलेला नव्हता, हलगर्जीपणा केला. त्याचवेळी अन्य रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आल्याचे आम्हाला रुग्णांकडून समजले. काहींनी अधिकारी व राजकीय व्यक्तींचा दबाब आणल्यावर त्यांची सुविधा करण्यात आली. आमच्या रुग्णाकडे मात्र, दुर्लक्ष करण्यात आले.

कोट

ऑक्सिजनचा तुटवडा आपल्याकडे नव्हता. त्यामुळे ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही व तशी नोंदही नाही. मृत रुग्णांच्या नातेवाईकांच्या भावना असतात. मात्र, प्रत्यक्षात तसे झालेले नाही.

- डॉ श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्यचिकित्सक