शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वन जमिनीवरील ‘त्या’ रहिवाशांना मिळेल मालकी हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:17 IST

अमरावती : गत काही वर्षांपासून वनजमिनीवर असलेल्या संजय गांधीनगर, पंचशीलनगर येथील रहिवाशांच्या मालकी हक्काचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. ...

अमरावती : गत काही वर्षांपासून वनजमिनीवर असलेल्या संजय गांधीनगर, पंचशीलनगर येथील

रहिवाशांच्या मालकी हक्काचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री अश्विनी

चौबे यांच्या आदेशानुसार आता लवकरच या वनखात्याच्या जमिनीचे मालकी हक्क येथील रहिवाशांना

मिळणार आहे. यासंदर्भात खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने

पाठपुरावा केला आहे.

राणा दाम्पत्याच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून अमरावती महापालिका हद्दीलगतच्या वनपरिक्षेत्रात असणारे

वन्यपशू व हिंस्त्र जनावरे शहरात येतात. शेतीचे नुकसान करतात. त्यांच्यामुळे नागरिकांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. पिकांचे सातत्याने वन्यपशूंमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अंजनगाव बारी, गोविंदपूर, भानखेडा, वडद, छत्री तलाव, वडाळी परिसर आदी भागातील वनपरिक्षेत्र नगर वन योजनेंतर्गत अभयारण्य किंवा प्राणिसंग्रहालय घोषित करून १३५ कोटी रुपये खर्च करून संपूर्ण क्षेत्राला तारेचे कुंपण करण्यात यावे. यामुळे जीविताचे व शेतीचे रक्षण होईल आणि स्थानिकांना रोजगारसुद्धा मिळेल, असा प्रस्ताव आमदार राणा यांनी सादर केला. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी यांनी तात्काळ मंजुरी देऊन निधीसुद्धा मंजूर केला.

--------------

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या पुनर्वसित नागरिकांना घरकुल द्या

धारणी व चिखलदरा परिसरात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील १५० ते २०० गावे येतात. वन्यपशूंमुळे स्थानिकांचा संघर्ष उभा ठाकला आहे. ग्रामस्थांच्या सुरक्षितता व पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना स्थलांतरित करून पुनर्वसन करण्यासाठी या गावातील नागरिकांना इतरत्र शेतीच्या बदल्यात शेती, प्रतिव्यक्ती १५ लाख रुपये व पंतप्रधान आवास योजनेंअतर्गत निवारा घरकुल आदी देण्याची मागणी खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केंद्रीय वनमंत्री अश्विनी चौबे यांच्याकडे केली.

--------------------