शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

१०८ वर्षांपूर्वीच्या विजयस्तंभाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:48 IST

स्थानिक खरकाडीपुरा येथील एकवीरा देवीच्या प्रांगणात असलेल्या १०८ वर्षांपूर्वीचा विजयस्तंभ जमीनदोस्त करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी येथे स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येत होते. त्या परंपरेचे जतन करून विजयस्तंभाची नव्याने डागडूजी करावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचे दुर्लक्ष : स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक खरकाडीपुरा येथील एकवीरा देवीच्या प्रांगणात असलेल्या १०८ वर्षांपूर्वीचा विजयस्तंभ जमीनदोस्त करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी येथे स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येत होते. त्या परंपरेचे जतन करून विजयस्तंभाची नव्याने डागडूजी करावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.या ठिकाणी तब्बल ७० वर्षांपासून ध्वजारोहण करण्याची परंपरा असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते राम बुरंगे यांनी सांगितले. त्यांनी या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून ही बाब निदर्शनास आणून दिली होती. परंतु, प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई केली नाही.स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण करण्याचा मान पुरुष मंडळींना तर प्रजासत्ताकदिनी तो मान महिलांकडे असल्याची परंपरा होती, असे जाणकार अभिमानाने सांगतात. परंतु, या ठिकाणी १ जानेवारी २०१७ रोजी प्रेक्षागृह बांधण्यात आले. या ठिकाणी पूर्वी खेळाचे प्रांगण होते. या परिसरातील नागरिक स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनाला एकत्र येऊन या विजयस्तंभासमोर ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देत होते. चार वर्षाआधी हा विजयस्तंभ जमीनदोस्त करण्यात आल्याने त्याची अवहेलना होत असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली. या ठिकाणचे ध्वजारोहण बंद झाल्याची भावनाही नागरिकांच्या मनात धगधगत आहे. महापालिकेने या ठिकाणी पुन्हा सन्मानपूर्वक विजयस्तंभ उभारावा व या विजयस्तंभावर पुन्हा तिरंगा फडकविण्यात यावा, अशी मागणी राम बुरंगे यांच्यासह या परिसरातील नागरिकांनी केली आहे.बीड धातुपासून निर्मितीखरकाडीपुऱ्यात डोलाऱ्यात उभा असलेला विजयस्तंभ बीड धातूपासून तयार करण्यात आला होता. ब्रिटिशकालीन काळात या विजयस्तंभावर दिवाबत्तीची सोय करण्यात आली होती. जेनेकरुन रात्री पादचाºयांचे मार्गक्रमण सूकर व्हावे,त्यांना दिशा कळावी, अशी त्यामागील भूमिका होती. स्वातंत्र्यानंतर स्थानिकांनी जल्लोष करुन छोटेखानी सभेचे याच ठिकाणी आयोजन केले होते.विजयस्तंभावर स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला होता.१०८ वर्षापुर्वीचा विजयस्तंभ मागील चार वर्षांपुर्वी ध्वस्त करण्यात आला. जतनाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून विजयस्तंभाचे पावित्र्य जपायलाच हवे.- राम बुरंगे,सामाजिक कार्यकर्ता