शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

१०८ वर्षांपूर्वीच्या विजयस्तंभाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:48 IST

स्थानिक खरकाडीपुरा येथील एकवीरा देवीच्या प्रांगणात असलेल्या १०८ वर्षांपूर्वीचा विजयस्तंभ जमीनदोस्त करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी येथे स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येत होते. त्या परंपरेचे जतन करून विजयस्तंभाची नव्याने डागडूजी करावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचे दुर्लक्ष : स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक खरकाडीपुरा येथील एकवीरा देवीच्या प्रांगणात असलेल्या १०८ वर्षांपूर्वीचा विजयस्तंभ जमीनदोस्त करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी येथे स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येत होते. त्या परंपरेचे जतन करून विजयस्तंभाची नव्याने डागडूजी करावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.या ठिकाणी तब्बल ७० वर्षांपासून ध्वजारोहण करण्याची परंपरा असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते राम बुरंगे यांनी सांगितले. त्यांनी या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून ही बाब निदर्शनास आणून दिली होती. परंतु, प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई केली नाही.स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण करण्याचा मान पुरुष मंडळींना तर प्रजासत्ताकदिनी तो मान महिलांकडे असल्याची परंपरा होती, असे जाणकार अभिमानाने सांगतात. परंतु, या ठिकाणी १ जानेवारी २०१७ रोजी प्रेक्षागृह बांधण्यात आले. या ठिकाणी पूर्वी खेळाचे प्रांगण होते. या परिसरातील नागरिक स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनाला एकत्र येऊन या विजयस्तंभासमोर ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देत होते. चार वर्षाआधी हा विजयस्तंभ जमीनदोस्त करण्यात आल्याने त्याची अवहेलना होत असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली. या ठिकाणचे ध्वजारोहण बंद झाल्याची भावनाही नागरिकांच्या मनात धगधगत आहे. महापालिकेने या ठिकाणी पुन्हा सन्मानपूर्वक विजयस्तंभ उभारावा व या विजयस्तंभावर पुन्हा तिरंगा फडकविण्यात यावा, अशी मागणी राम बुरंगे यांच्यासह या परिसरातील नागरिकांनी केली आहे.बीड धातुपासून निर्मितीखरकाडीपुऱ्यात डोलाऱ्यात उभा असलेला विजयस्तंभ बीड धातूपासून तयार करण्यात आला होता. ब्रिटिशकालीन काळात या विजयस्तंभावर दिवाबत्तीची सोय करण्यात आली होती. जेनेकरुन रात्री पादचाºयांचे मार्गक्रमण सूकर व्हावे,त्यांना दिशा कळावी, अशी त्यामागील भूमिका होती. स्वातंत्र्यानंतर स्थानिकांनी जल्लोष करुन छोटेखानी सभेचे याच ठिकाणी आयोजन केले होते.विजयस्तंभावर स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला होता.१०८ वर्षापुर्वीचा विजयस्तंभ मागील चार वर्षांपुर्वी ध्वस्त करण्यात आला. जतनाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून विजयस्तंभाचे पावित्र्य जपायलाच हवे.- राम बुरंगे,सामाजिक कार्यकर्ता