शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

आचारसंहितेनंतर 'व्हिजन डाक्युमेंट'चे अवलोकन !

By admin | Updated: February 1, 2017 00:10 IST

राज्य शासनामार्फत सुरू केलेल्या 'आमचं गाव आमचा विकास' या हितकारक योजनेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहेत.

८३९ ग्रामपंचायतींचा समावेश : ग्रामविकासाला मिळणार गतीअमरावती : राज्य शासनामार्फत सुरू केलेल्या 'आमचं गाव आमचा विकास' या हितकारक योजनेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहेत. जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींचे 'व्हिजन डाक्युमेंट' अवलोकनार्थ जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने गाव विकासाला चालना मिळणार आहे.राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखाली पंचायत समिती कार्यालय आदी प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था व या प्रणालीतील सर्व प्रशासकीय अधिकारी एकत्रितरीत्या जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींमध्ये 'आपलं गाव आपला विकास' उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत तीन दिवस विविध उपक्रम राबवून विकासाचा नियोजन आराखडा तयार करून पंचायत समितीकडे पाठविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात तीन दिवसांचा सूक्ष्म नियोजन कार्यक्रम राबविण्यात आला असून आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, पशुसंवर्धन आदींचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले. यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पशुधन पर्यवेक्षक, आशा वर्कर, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, युवक-युवती गट, ग्रामसेवक, तलाठी, बचतगटातील सदस्य, अध्यक्ष, कृषी सहायक, जलसुरक्षारक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामरोजगार सेवक, वनपाल, स्वयंसेवक, ग्रामपंचायत सेवक आदींसह ग्रामपंचायतींच्या सर्व समित्यांचे सदस्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)तांत्रिक समितीने केली आराखड्याची तपासणीआमचं गाव आमचा विकास कार्यक्रमांतर्गत २२ जुलै ते १४ आॅगस्टदरम्यान गावाचा विकास आराखडा सादर करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात गावाचा विकास आराखड्याची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायती प्रारूप आराखडे तयार करण्यासाठी बैठका, चर्चासत्र, दिंडी, मशालफेरी काढून गावात जनजागृती करण्यात आली. त्यानंतर पंचायत समितीकडे सादर केलेल्या आराखड्यांची तांत्रिक समितीकडे तपासणी करून सदर आराखडे जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले आहे. सादर आराखडे अवलोकनार्थ जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सादर केले जाणार आहे. नियोजनानुसार संबंधित गावांमधील विविध विकासकामे सुरू होणार आहेत.दृष्टिक्षेपात तालुकानिहाय ग्रामपंचायतीजिल्हाभरातील १४ तालुक्यांतर्गत एकू ण ८३९ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये अमरावती ५९, अंजनगाव सुर्जी ४९, भातकुली ४८, चिखलदरा ५३, धारणी ६२, दर्यापूर ७४, नांदगाव खंडेश्र्वर ६८, चांदूरबाजार ६७, चांदूररेल्वे ४९, अचलपूर ७०, तिवसा ४५, मोशी ६७, वरूड ६६, धामणगाव रेल्वे ६२ आदी ग्रामपंचातींचा समावेश आहे.