शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

जलयुक्त शिवार अभियानातून टंचाईवर मात

By admin | Updated: May 2, 2016 00:09 IST

राज्य दुष्काळाच्या छायेत असले तरी येत्या काळात जलयुक्त शिवार अभियानातून पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करता येईल,..

पालकमंत्र्यांचा दावा : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६ वा दिन साजराअमरावती : राज्य दुष्काळाच्या छायेत असले तरी येत्या काळात जलयुक्त शिवार अभियानातून पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करता येईल, असा दावा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी येथे केला. ते महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या दिनाच्या मुख्य समारंभाप्रसंगी बोलत होते.येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शासकीय समारंभात सकाळी ८ वाजता ना. पोटे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण झाले. त्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीत गायिले. पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले. याप्रसंगी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गीत्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, पोलीस अधीक्षक लखमी गौतम आदी उपस्थित होते. ना. पोेट म्हणाले, जिल्ह्यातील टंचाई कायम संपुष्टात आणण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या अभियानांतर्गत २५३ गावांमध्ये २२१३२ टीएमसी जलसाठा निर्माण झाला आहे. यामुळे संरक्षित सिंचनासाठी ३२६२४ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानामुळे गावागावांत सिंचन क्षमता वाढीस लागून पाण्याची समस्या दूर होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी ज्या थोर विभूतींच्या बलिदानातून त्यांच्या अस्सिम त्यागातून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली त्या सर्व शहिदांना थोर विभूतींना अभिवादन केले. प्रवीण पोटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते यावेळी वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यात जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. अमरावती विभागस्तरावर दलित वस्ती विकास व सुधारणा अभियानांतर्गत ग्रामपंचायत सावंगी मोहाडी जि.अकोला, वरुडताफा ता रिसोड, मोझरी ता. तिवसा, पैलपाडा जि. अकोला यांना पाच लाखांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.