शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

शेततळे निर्मितीने ७५ टक्के पल्ला गाठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:58 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेले जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्हाभरात यंत्रणेने उत्कृष्ट कामगिरी बजावली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : दर्यापूर लक्ष्य, शंभर टक्क््यांसाठी ३० एप्रिलपर्यंत डेडलाईन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेले जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्हाभरात यंत्रणेने उत्कृष्ट कामगिरी बजावली.विशेषत: शेततळे निर्मितीने ७५ टक्के पल्ला गाठला असून, उर्वरित २५ टक्के निर्मितीसाठी ३० एप्रिलपर्यंत ‘डेडलाईन’ आहे. दर्यापूर तालुक्यात सर्वाधिक शेततळ्यांची निर्मिती केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्हाधिकारी बांगर हे सलग दोन दिवसांपासून महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत आहेत. उन्हाचा पारा वाढत असताना जलयुक्त शिवार योजना व शेतकºयांच्या मागणीनुसार शेततळे निर्मितीसाठी ते स्वत: लक्ष घालत आहेत. जिल्ह्यात ४५०० शेततळे निर्मितीचे लक्ष्य होते. महसूल आणि कृषी विभागाच्या समन्वन्यातून दर्यापूर तालुक्यात १४२८ शेततळे निर्माण करता आले. ३० एप्रिलपर्यंत दर्यापूर तालुक्यात दोन हजार शेततळे निर्मितीचे लक्ष्य पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केला. अचलपूर, तिवसा, नांदगाव खंडेश्र्वर, धारणी, चिखलदरा, अमरावती, धामणगाव रेल्वे, वरूड, मोर्शी, भातकुली, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे आदी तालुक्यांतील शेतकºयांच्या मागणीनुसार शेततळे मंजूर करण्यात आले. मात्र, खारपाणपट्टा असलेल्या भागात शेततळे निर्मितीस प्राधान्य दिले जात असून भविष्यात ते दर्यापूर तालुक्यासाठी वरदान ठरेल, असे ते म्हणाले. शासनाकडून शेततळे निर्मितीसाठी निधी उपलब्ध असून, शेतकºयांची मागणी येताच प्रक्रियेअंती शेततळे निर्मितीसाठी यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. या योजनेच्या पूर्णत्वासाठी जानेवारीपासून वेग आला आहे. तलाठी, कृषी सहायकांनी मोलाची कामगिरी बजावली. शेततळे निर्मितीचे लक्ष्य ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करून तसा अहवाल शासनाकडे पाठविला जाईल, असे जिल्हाधिकारी बांगर म्हणाले.