शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

५० दिवसांत ६० महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी,१३ व्यक्ती मृत

By admin | Updated: July 19, 2016 00:15 IST

जिल्ह्यात २८ मे ते १८ जुलै या कालावधीत म्हणजेच ५० दिवसांत ६० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये १३ व्यक्ती व २२ जनावरे मृत झाली.

अमरावती : जिल्ह्यात २८ मे ते १८ जुलै या कालावधीत म्हणजेच ५० दिवसांत ६० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये १३ व्यक्ती व २२ जनावरे मृत झाली. २८ गावांतील ४३५ कुटुंबे बाधित झालीत व १७० व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. जिल्ह्यात १ जून ते १८ जुलै दरम्यान ३०६.५ मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४६७.५ मिमी पाऊस पडला ही १५२.५ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच दिनांकाला १५२.५ मिमी पाऊस पडला होता. यंदा २० जूनला मान्सूनचा पहिला पाऊस पडला. त्यानंतर आठ दिवस पावसाचा खंड होता व २७ जूनपासून पाऊस सुरू झाला ते आतापर्यंत २६० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये सर्वाधिक ११ जुलै रोजी २५ मंडळात अतिवृष्टी झाली. यंदा २८ जून रोजी डवरगाव ७५ मि.मी., पापळ ७३, वऱ्हा १५५, कुऱ्हा ७२.२. २ जुलै रोजी हिवरखेड ८५, चुर्णी ७४, तिवसा ७२, कुऱ्हा ७२, मोर्शी ८२.३, अंबाडा ७४.२, हिवरखेड ६६.१, ३ जुलै रोजी अंबाडा ७१.६, सातेफळ ६८ व ९ जुलै रोजी वडाळी ६८, माहुली ६९, चांदूररेल्वे ८२.६, आमला ८४.८, घुईखेड १०२, सातेफळ ९६, पळसखेड ६५, धामणगाव १३२.४, अंजनसिंगी ६७, तळेगाव १०२, दत्तापूर ११४.५, मंगरुळ दस्तगीर १०९.४, चिंचोली ९०, भातकुली १०२, वरखेड ७३, वऱ्हा ६५.४, मोझरी ६९.८, लोणी ७२.४, राजुरा ७६.४, चिखलदरा ८५.४, टेंभुरसोडा ७२.४, सेमाडोह १००, चुर्णी महसूल मंडळात ९७.४ मिमी पाऊस पडला. (प्रतिनिधी)११ जुलैला सर्वाधिक २५ मंडळात अतिवृष्टीयंदाच्या पावसाळ्यात ११ जुलै रोजी सर्वाधिक २५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये अमरावती महसूल मंडळात वलगाव १०५ मिमी, शिराळा ८५, अचलपूर ९३, परतवाडा १०२, परसापूर ८०.३, रासेगाव ८७, असदपूर ८१.५, पथ्रोट १३१, दर्यापूर ८०.३, येवदा ८३, थिलोरी ८८.१, रामर्थि ८२, सामदा ७९, अंजनगाव ७९, सातेगाव ६५, कापूसतळणी ८४, भंडारज ९०, विहिगाव ७०, कोकर्डा ८५, धारणी ७२, धुळघाट ११३, हरिसाल ७३, सावलीखेडा १०७, चिखलदरा १७२ व सेमाडोह महसूल मंडळात १८३.४ मिमी पाऊस पडला. ंअसे झाले नुकसानया ५० दिवसात १३ व्यक्ती मृत झाले. यापैकी ८ व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्याने दोन व्यक्ती पुरात वाहून गेल्याने, तर तीन व्यक्तींचा अंगावर घराची भींत पडल्याने मृत्यू झाला. पावसाने २८ गावातील ४३५ कुटुंब बाधित झाले व १७० व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. ११ दुधाळ जनावरे व ९ जनावरे मृत पावली आहे. मृत व्यक्तींच्या वारसाला २८ लाख व जनावरांना २८ हजारांची मदत शासनाद्वारा देण्यात आली. ७६२ घरांची पडझडपावसाच्या ५० दिवसांत ७६२ घरांची पडझड झाली आहे. यामध्ये ११ घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाले. १०७ पक्या घरांची अंशत: पडझड, ५२२ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली. तर ११२ झोपड्या पूर्णत: नष्ट झाल्या आहेत व १० गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.