शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

५० दिवसांत ६० महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी,१३ व्यक्ती मृत

By admin | Updated: July 19, 2016 00:15 IST

जिल्ह्यात २८ मे ते १८ जुलै या कालावधीत म्हणजेच ५० दिवसांत ६० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये १३ व्यक्ती व २२ जनावरे मृत झाली.

अमरावती : जिल्ह्यात २८ मे ते १८ जुलै या कालावधीत म्हणजेच ५० दिवसांत ६० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये १३ व्यक्ती व २२ जनावरे मृत झाली. २८ गावांतील ४३५ कुटुंबे बाधित झालीत व १७० व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. जिल्ह्यात १ जून ते १८ जुलै दरम्यान ३०६.५ मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४६७.५ मिमी पाऊस पडला ही १५२.५ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच दिनांकाला १५२.५ मिमी पाऊस पडला होता. यंदा २० जूनला मान्सूनचा पहिला पाऊस पडला. त्यानंतर आठ दिवस पावसाचा खंड होता व २७ जूनपासून पाऊस सुरू झाला ते आतापर्यंत २६० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये सर्वाधिक ११ जुलै रोजी २५ मंडळात अतिवृष्टी झाली. यंदा २८ जून रोजी डवरगाव ७५ मि.मी., पापळ ७३, वऱ्हा १५५, कुऱ्हा ७२.२. २ जुलै रोजी हिवरखेड ८५, चुर्णी ७४, तिवसा ७२, कुऱ्हा ७२, मोर्शी ८२.३, अंबाडा ७४.२, हिवरखेड ६६.१, ३ जुलै रोजी अंबाडा ७१.६, सातेफळ ६८ व ९ जुलै रोजी वडाळी ६८, माहुली ६९, चांदूररेल्वे ८२.६, आमला ८४.८, घुईखेड १०२, सातेफळ ९६, पळसखेड ६५, धामणगाव १३२.४, अंजनसिंगी ६७, तळेगाव १०२, दत्तापूर ११४.५, मंगरुळ दस्तगीर १०९.४, चिंचोली ९०, भातकुली १०२, वरखेड ७३, वऱ्हा ६५.४, मोझरी ६९.८, लोणी ७२.४, राजुरा ७६.४, चिखलदरा ८५.४, टेंभुरसोडा ७२.४, सेमाडोह १००, चुर्णी महसूल मंडळात ९७.४ मिमी पाऊस पडला. (प्रतिनिधी)११ जुलैला सर्वाधिक २५ मंडळात अतिवृष्टीयंदाच्या पावसाळ्यात ११ जुलै रोजी सर्वाधिक २५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये अमरावती महसूल मंडळात वलगाव १०५ मिमी, शिराळा ८५, अचलपूर ९३, परतवाडा १०२, परसापूर ८०.३, रासेगाव ८७, असदपूर ८१.५, पथ्रोट १३१, दर्यापूर ८०.३, येवदा ८३, थिलोरी ८८.१, रामर्थि ८२, सामदा ७९, अंजनगाव ७९, सातेगाव ६५, कापूसतळणी ८४, भंडारज ९०, विहिगाव ७०, कोकर्डा ८५, धारणी ७२, धुळघाट ११३, हरिसाल ७३, सावलीखेडा १०७, चिखलदरा १७२ व सेमाडोह महसूल मंडळात १८३.४ मिमी पाऊस पडला. ंअसे झाले नुकसानया ५० दिवसात १३ व्यक्ती मृत झाले. यापैकी ८ व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्याने दोन व्यक्ती पुरात वाहून गेल्याने, तर तीन व्यक्तींचा अंगावर घराची भींत पडल्याने मृत्यू झाला. पावसाने २८ गावातील ४३५ कुटुंब बाधित झाले व १७० व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. ११ दुधाळ जनावरे व ९ जनावरे मृत पावली आहे. मृत व्यक्तींच्या वारसाला २८ लाख व जनावरांना २८ हजारांची मदत शासनाद्वारा देण्यात आली. ७६२ घरांची पडझडपावसाच्या ५० दिवसांत ७६२ घरांची पडझड झाली आहे. यामध्ये ११ घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाले. १०७ पक्या घरांची अंशत: पडझड, ५२२ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली. तर ११२ झोपड्या पूर्णत: नष्ट झाल्या आहेत व १० गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.