शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात संत्र्याला अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:02 IST

कोरोना, तापमानवाढ, विविध नैसर्गिक संकटे यांचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यातून सावरत नाही तोच टोळधाडीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. सोबतच फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे. या अज्ञात रोगामुळे मोर्शी तालुक्यातील संत्राउत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे .

ठळक मुद्देपानगळ, फांद्या सुकल्या टोळधाडीनंतर संत्राउत्पादक शेतकरी संकटात

अजय पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: विक्रमी संत्राउत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या मोर्शी, वरूड तालुक्यात यंदा भीषण दुष्काळ, अज्ञात रोगाचे थैमान, बहराला गळती, गारपीट, कोरोना, तापमानवाढ, विविध नैसर्गिक संकटे यांचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यातून सावरत नाही तोच टोळधाडीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. पुन्हा बहराला गळती आणि झाडाची पाने पिवळी पडून गळत आहेत. सोबतच फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे. या अज्ञात रोगामुळे मोर्शी तालुक्यातील संत्राउत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे .मोर्शी तालुक्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्राझाडे आहेत. संत्रा उत्पादक शेतकरी दोन बहरात उत्पादन घेतात. यामध्ये आंबिया व मृग बहराचा समावेश आहे. यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मृग बहराचा संत्रा बेभाव विकावा लागला. दुसरीकडे योग्य वातावरणामुळे खुललेला आंबिया बहर मात्र कडाक्याचे ऊन, संत्रागळती, पानगळ यामुळे लयाला गेला आहे.मोर्शी तालुक्यातील घोडदेव, पाळा, सालबर्डी, डोंगर यावली, दापोरी, मायवाडी, हिवरखेड, भाईपूर, बेलोणा, अंबाडा आदी भागातील संत्रा बागांमधील आंबिया बहराला मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याने संत्राउत्पादक शेतकरी चिंतातुर झाले आहेत. कृषी विभागाने शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या चमूकडून तातडीने सर्वेक्षण करून उपाययोजना करावी, अशी मागणी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

लॉकडाऊनचाही फटकासंत्री वाहून नेणारे ट्रक लॉकडाऊन कालावधीत जागोजागी अडविण्यात आल्याने या फळाला अपेक्षित बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नाही. परिणामी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना या पिकाचा अपेक्षित लाभ झाला नाही. त्यातच आता टोळधाडीने उरलेसुरले नुकसान केले आहे. ड्रायझोनमध्ये असलेल्या मोर्शी, वरूड तालुक्यात संत्राउत्पादन हा शेतकऱ्यांच्या समृद्धीचा आधार आहे. हा आधार निसर्गाकडूनच हिरावून घेण्याचा प्रयत्न यंदा झाला. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकरी हवालदिल झाला आहे.

अज्ञात रोग, टोळधाड, आंबिया बहराच्या संत्र्याला गळती आणि आता पानगळ यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. संशोधकांनी संत्रा उत्पादकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी चर्चा करावी तसेच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या सर्वेक्षणाचे निर्देश कृषी विभागाला देणार आहे.- देवेंद्र भुयारआमदार

यंदा आंबिया बहराचे उत्पादन चांगले होण्याची आशा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होती. उत्पादनाला चांगला भाव मिळून हाती पैसा येईल, या आशेवर असलेला शेतकरी भीषण दुष्काळ, टोळधाड, बहराला गळती, पानगळ यांनी हवालदिल झाला आहे. नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले.- रूपेश वाळके, अध्यक्ष, बळीराजा संत्रा उत्पादक संस्था .

सिंचनाची सुविधा नसतानाही शेतकऱ्यांनी जिवाचे रान करून संत्राबागा जगवल्या. यंदा चांगली फळधारणा झाली असताना, अचानक अज्ञात रोगामुळे गळती सुरू झाली आहे. सतत संकटांचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आता त्वरित आर्थिक मदत द्यायला हवी.- नरेंद्र जिचकार, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

टॅग्स :agricultureशेती