शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

अमरावती जिल्ह्यात संत्र्याला अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:02 IST

कोरोना, तापमानवाढ, विविध नैसर्गिक संकटे यांचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यातून सावरत नाही तोच टोळधाडीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. सोबतच फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे. या अज्ञात रोगामुळे मोर्शी तालुक्यातील संत्राउत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे .

ठळक मुद्देपानगळ, फांद्या सुकल्या टोळधाडीनंतर संत्राउत्पादक शेतकरी संकटात

अजय पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: विक्रमी संत्राउत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या मोर्शी, वरूड तालुक्यात यंदा भीषण दुष्काळ, अज्ञात रोगाचे थैमान, बहराला गळती, गारपीट, कोरोना, तापमानवाढ, विविध नैसर्गिक संकटे यांचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यातून सावरत नाही तोच टोळधाडीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. पुन्हा बहराला गळती आणि झाडाची पाने पिवळी पडून गळत आहेत. सोबतच फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे. या अज्ञात रोगामुळे मोर्शी तालुक्यातील संत्राउत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे .मोर्शी तालुक्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्राझाडे आहेत. संत्रा उत्पादक शेतकरी दोन बहरात उत्पादन घेतात. यामध्ये आंबिया व मृग बहराचा समावेश आहे. यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मृग बहराचा संत्रा बेभाव विकावा लागला. दुसरीकडे योग्य वातावरणामुळे खुललेला आंबिया बहर मात्र कडाक्याचे ऊन, संत्रागळती, पानगळ यामुळे लयाला गेला आहे.मोर्शी तालुक्यातील घोडदेव, पाळा, सालबर्डी, डोंगर यावली, दापोरी, मायवाडी, हिवरखेड, भाईपूर, बेलोणा, अंबाडा आदी भागातील संत्रा बागांमधील आंबिया बहराला मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याने संत्राउत्पादक शेतकरी चिंतातुर झाले आहेत. कृषी विभागाने शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या चमूकडून तातडीने सर्वेक्षण करून उपाययोजना करावी, अशी मागणी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

लॉकडाऊनचाही फटकासंत्री वाहून नेणारे ट्रक लॉकडाऊन कालावधीत जागोजागी अडविण्यात आल्याने या फळाला अपेक्षित बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नाही. परिणामी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना या पिकाचा अपेक्षित लाभ झाला नाही. त्यातच आता टोळधाडीने उरलेसुरले नुकसान केले आहे. ड्रायझोनमध्ये असलेल्या मोर्शी, वरूड तालुक्यात संत्राउत्पादन हा शेतकऱ्यांच्या समृद्धीचा आधार आहे. हा आधार निसर्गाकडूनच हिरावून घेण्याचा प्रयत्न यंदा झाला. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकरी हवालदिल झाला आहे.

अज्ञात रोग, टोळधाड, आंबिया बहराच्या संत्र्याला गळती आणि आता पानगळ यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. संशोधकांनी संत्रा उत्पादकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी चर्चा करावी तसेच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या सर्वेक्षणाचे निर्देश कृषी विभागाला देणार आहे.- देवेंद्र भुयारआमदार

यंदा आंबिया बहराचे उत्पादन चांगले होण्याची आशा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होती. उत्पादनाला चांगला भाव मिळून हाती पैसा येईल, या आशेवर असलेला शेतकरी भीषण दुष्काळ, टोळधाड, बहराला गळती, पानगळ यांनी हवालदिल झाला आहे. नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले.- रूपेश वाळके, अध्यक्ष, बळीराजा संत्रा उत्पादक संस्था .

सिंचनाची सुविधा नसतानाही शेतकऱ्यांनी जिवाचे रान करून संत्राबागा जगवल्या. यंदा चांगली फळधारणा झाली असताना, अचानक अज्ञात रोगामुळे गळती सुरू झाली आहे. सतत संकटांचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आता त्वरित आर्थिक मदत द्यायला हवी.- नरेंद्र जिचकार, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

टॅग्स :agricultureशेती