शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

एरंडगाव शिवारात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:22 IST

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील एरंडगाव शिवारात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्याबाबत तातडीने उपाययोजना सुचिवण्याची मागणी तालुका ...

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील एरंडगाव शिवारात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्याबाबत तातडीने उपाययोजना सुचिवण्याची मागणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे शेतकऱ्यांनी केली आहे.

यावर्षी दमदार पाऊस झाल्याने शिवारातील विहिरीची पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकाचा पेरा वाढला. एरंडगाव शिवारात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे येथील शेतकरी अतुल कारमोरे यांनी सांगितले. तालुक्यात ४ हजार ३९९ हेक्टरमध्ये हरभरा व १२५५ हेक्टर क्षेत्रात गव्हाचा पेरा झाला आहे. अद्यापही रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरूच आहे. कपाशीवर झालेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांनी हे पीक काढून त्या क्षेत्रात हरभरा व गव्हाचा पेरा केला. ज्या शिवारात अतिपावसामुळे तुरीचे पीक जळाले, त्या क्षेत्रातही रबी हंगामाचा पेरा झाला आहे.

यंदा सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्याचा रबी हरभरा व गव्हाच्या उत्पादनाकडे कल वाढला आहे.