शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

आमचा रोजगार हिरावला हो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:07 IST

विविध देवी-देवतांची सोंगे घेऊन मनोरंजनातून उदरनिर्वाह करणाºया बहुरूपी समाजाचा रोजगार चोरांच्या दहशतीमुळे हिरावला असून,.....

ठळक मुद्देबहुरूपी समाजाचा टाहो : चोरांच्या दहशतीचा परिणाम; तक्रार करावी तरी कुणाकडे ?

वीरेंद्रकुमार जोगी।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विविध देवी-देवतांची सोंगे घेऊन मनोरंजनातून उदरनिर्वाह करणाºया बहुरूपी समाजाचा रोजगार चोरांच्या दहशतीमुळे हिरावला असून, गावागावांत फिरून लोककला जपणाºया या मंडळींसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. याची तक्रार करावी तरी कुणाकडे, असा त्यांचा सवाल आहे.तिवसा तालुक्यातील कुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्डी येथे सहा बहुरूपींना मारहाण केल्याची घटना २४ आॅक्टोबर रोजी उघडकीस आली. मार्डीत आलेले बहुरूपी नव्हतेच. कारण त्यांनी स्त्रीवेश धारण केला होता. बहुरूपी कधीच स्त्रीवेष करीत नाहीत, असा दावा बहुरूपी समाजाच्या प्रतिनिधींनी केला आहे. मात्र, यानंतर हे रोजगाराचे साधनच नष्ट झाल्यात जमा असल्याचे बहुरूपींचे मत आहे.बहुरूपी स्वत:ला लोककलावंत मानतात. उदरनिर्वाहासाठी देव-देवतांची सोंगे घेतात. आख्यायिकांच्या माध्यमातून देवतांचे वर्णन करतात. ही परंपरा त्यांनी वर्षानुवर्षे जपली आहे. त्यांचे कोणतेही लिखित साहित्य नाही, तर मौखिक व श्राव्य माध्यमातून पिढ्यान्पिढ्या बहुरूपी आपली कला जोपासत आहेत. बहुरूपींची नावे हिंदू-मुस्लिम धर्मीयांतील नावाची सरमिसळ असल्याने त्यांचा धर्म कोणता, जात कोणती, हे कळत नाही. आम्ही हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्मातील सण साजरे करतो, असे बहुरूपी जनजागृती कला मंच संघटनेचे राजकपूर शमशेर पठाणेकर यांनी सांगितले.छत्रपतींचा सेवक बहुरूपीछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अठरापगड जातींच्या लोकांना सोबत घेतले होते. त्यात बहुरूपी समाजाचाही समावेश होता. छत्रपतींना औरंगेजेबाने आग्य्रात नजरकैदेत ठेवले, त्यावेळी बहुरूपी बहिरजी नाईक यांनी त्यांचे वेशांतर केले होते. छत्रपतींसोबत कायम एक बहुरूपी असायचा, असे जाणकार बहुरूपी सांगतात.शिक्षणापासून वंचितबहुरूपी उदरनिर्वाहासाठी सोंगे घेऊन देशभर हिंडतो. कुटुबांचीही पायपीट सुरूच असते. अशातच मुलांना शिक्षण घेता येत नाही. एखाद्याने मुलाला शाळेत घातल्यास त्याला जातीचा उल्लेख असलेली शासकीय कागदपत्रे मागितली जातात. ती नसल्याने बहुरूपी समाजातील मुले शिक्षणापासून आजही वंचित आहेत.आम्ही लोककला जपत आहोत. मात्र, गावात प्रवेश केल्यावर लोक संशयाच्या नजरेने पाहतात, आम्हाला चोर समजून गावातून हाकलून लावतात. अशा घटना वाढल्या आहेत.- राजेश चांद औंदकर,अध्यक्ष, बहुरूपी बहुउद्देशीय संस्था