शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

आमचा रोजगार हिरावला हो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:07 IST

विविध देवी-देवतांची सोंगे घेऊन मनोरंजनातून उदरनिर्वाह करणाºया बहुरूपी समाजाचा रोजगार चोरांच्या दहशतीमुळे हिरावला असून,.....

ठळक मुद्देबहुरूपी समाजाचा टाहो : चोरांच्या दहशतीचा परिणाम; तक्रार करावी तरी कुणाकडे ?

वीरेंद्रकुमार जोगी।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विविध देवी-देवतांची सोंगे घेऊन मनोरंजनातून उदरनिर्वाह करणाºया बहुरूपी समाजाचा रोजगार चोरांच्या दहशतीमुळे हिरावला असून, गावागावांत फिरून लोककला जपणाºया या मंडळींसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. याची तक्रार करावी तरी कुणाकडे, असा त्यांचा सवाल आहे.तिवसा तालुक्यातील कुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्डी येथे सहा बहुरूपींना मारहाण केल्याची घटना २४ आॅक्टोबर रोजी उघडकीस आली. मार्डीत आलेले बहुरूपी नव्हतेच. कारण त्यांनी स्त्रीवेश धारण केला होता. बहुरूपी कधीच स्त्रीवेष करीत नाहीत, असा दावा बहुरूपी समाजाच्या प्रतिनिधींनी केला आहे. मात्र, यानंतर हे रोजगाराचे साधनच नष्ट झाल्यात जमा असल्याचे बहुरूपींचे मत आहे.बहुरूपी स्वत:ला लोककलावंत मानतात. उदरनिर्वाहासाठी देव-देवतांची सोंगे घेतात. आख्यायिकांच्या माध्यमातून देवतांचे वर्णन करतात. ही परंपरा त्यांनी वर्षानुवर्षे जपली आहे. त्यांचे कोणतेही लिखित साहित्य नाही, तर मौखिक व श्राव्य माध्यमातून पिढ्यान्पिढ्या बहुरूपी आपली कला जोपासत आहेत. बहुरूपींची नावे हिंदू-मुस्लिम धर्मीयांतील नावाची सरमिसळ असल्याने त्यांचा धर्म कोणता, जात कोणती, हे कळत नाही. आम्ही हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्मातील सण साजरे करतो, असे बहुरूपी जनजागृती कला मंच संघटनेचे राजकपूर शमशेर पठाणेकर यांनी सांगितले.छत्रपतींचा सेवक बहुरूपीछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अठरापगड जातींच्या लोकांना सोबत घेतले होते. त्यात बहुरूपी समाजाचाही समावेश होता. छत्रपतींना औरंगेजेबाने आग्य्रात नजरकैदेत ठेवले, त्यावेळी बहुरूपी बहिरजी नाईक यांनी त्यांचे वेशांतर केले होते. छत्रपतींसोबत कायम एक बहुरूपी असायचा, असे जाणकार बहुरूपी सांगतात.शिक्षणापासून वंचितबहुरूपी उदरनिर्वाहासाठी सोंगे घेऊन देशभर हिंडतो. कुटुबांचीही पायपीट सुरूच असते. अशातच मुलांना शिक्षण घेता येत नाही. एखाद्याने मुलाला शाळेत घातल्यास त्याला जातीचा उल्लेख असलेली शासकीय कागदपत्रे मागितली जातात. ती नसल्याने बहुरूपी समाजातील मुले शिक्षणापासून आजही वंचित आहेत.आम्ही लोककला जपत आहोत. मात्र, गावात प्रवेश केल्यावर लोक संशयाच्या नजरेने पाहतात, आम्हाला चोर समजून गावातून हाकलून लावतात. अशा घटना वाढल्या आहेत.- राजेश चांद औंदकर,अध्यक्ष, बहुरूपी बहुउद्देशीय संस्था