शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शेतकऱ्यांना अनुदानावर मुरघास बनविण्याचे यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 22:59 IST

जिल्ह्यात दुष्काळ स्थितीमध्ये आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचाही सहभाग आहे. यामध्ये यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत गाळपेर क्षेत्रामध्ये चारा पीके घेण्यासाठी दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत जमिनी उपलब्ध करून घेण्यासाठी ५० अर्जाचे नमुने शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांना वितरीत करण्यात आले. यात कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत ५० टक्के अनुदानावर मुरघास बनविणारे यंत्राचा पुरवठा केला केला जाणार आहे.

ठळक मुद्देदुष्काळाशी लढा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात दुष्काळ स्थितीमध्ये आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचाही सहभाग आहे. यामध्ये यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत गाळपेर क्षेत्रामध्ये चारा पीके घेण्यासाठी दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत जमिनी उपलब्ध करून घेण्यासाठी ५० अर्जाचे नमुने शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांना वितरीत करण्यात आले. यात कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत ५० टक्के अनुदानावर मुरघास बनविणारे यंत्राचा पुरवठा केला केला जाणार आहे.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गंत ५० टक्के अनुदानावर मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे उपस्थितांना १६ जानेवारीचे शासन निर्णयानुसार सूचित करण्यात आले. प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प मुंबई यांनी ९ जानेवारी २०१८ च्या पत्रान्वये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गंत घटक-भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करणे व विविध संस्था, व्यावसायिक बँका यांनी मूल्यांकन करण्याच्या व्यावसायिक प्रस्तावना सहाय्य करणे अंतर्गत मुरघास बनविण्याचे मशीन पुरवठा करणे या बाबींचा सकारात्मक विचार करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने या प्रकल्पांतर्गंत जिल्ह्यामध्ये मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांचा पुरवठा केला जाणार आहे, त्याकरिता गरजू पशुपालकांनी संबंधित तालुक्याचे उपविभागीय कृषी अधिकाºयांकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.या योजनेंतर्गंत लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या व प्रकल्पांतर्गंत गावातील कोणत्याही यंत्रणेकडे नोंदणी झालेले शेतकरी गट, स्वयंसहायता गट, बचत गट केवळ पात्र राहतील. शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांच्या प्रकल्पास नोंदणीकृत बँक, वित्तीय संस्था यांचेकडून कर्ज मंजूर होणे आवश्यक आहे.काय आहे मुरघास?हिरव्या वैरणीतील उपलब्ध पोषण मूल्य घटकांचे जतन करण्यासाठी (हिरव्या वैरणीची प्रत व दर्जा कायम राखण्यासाठी) अतिरिक्त हिरवी वैरण योग्यवेळी कापणी करून वैरणीत ३० टक्के शुष्कांक (ड्रायमेंटर) व ७० टक्के आर्द्रता असताना कुट्टी करून सीलो पीट, सीलो बॅग्स, सीलो बॉल्समध्ये हवाबंद स्थितीत (अनअ‍ेरोबीक कंडीशन) मुरण्यासाठी, आंबविण्यासाठी (फरमेंटेश्न) साठविली जाते. या हिरवी वैरण साठविण्याच्या, टिकविण्याच्या पद्धतीला मुरघाट बनविणे असे संबोधिले जाते.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये मुरघास बनविण्याचे मशीनचा पुरवठा करण्यात येईल.- डॉ. मोहन गोहत्रेउपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन