शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शेतकऱ्यांना अनुदानावर मुरघास बनविण्याचे यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 22:59 IST

जिल्ह्यात दुष्काळ स्थितीमध्ये आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचाही सहभाग आहे. यामध्ये यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत गाळपेर क्षेत्रामध्ये चारा पीके घेण्यासाठी दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत जमिनी उपलब्ध करून घेण्यासाठी ५० अर्जाचे नमुने शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांना वितरीत करण्यात आले. यात कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत ५० टक्के अनुदानावर मुरघास बनविणारे यंत्राचा पुरवठा केला केला जाणार आहे.

ठळक मुद्देदुष्काळाशी लढा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात दुष्काळ स्थितीमध्ये आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचाही सहभाग आहे. यामध्ये यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत गाळपेर क्षेत्रामध्ये चारा पीके घेण्यासाठी दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत जमिनी उपलब्ध करून घेण्यासाठी ५० अर्जाचे नमुने शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांना वितरीत करण्यात आले. यात कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत ५० टक्के अनुदानावर मुरघास बनविणारे यंत्राचा पुरवठा केला केला जाणार आहे.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गंत ५० टक्के अनुदानावर मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे उपस्थितांना १६ जानेवारीचे शासन निर्णयानुसार सूचित करण्यात आले. प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प मुंबई यांनी ९ जानेवारी २०१८ च्या पत्रान्वये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गंत घटक-भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करणे व विविध संस्था, व्यावसायिक बँका यांनी मूल्यांकन करण्याच्या व्यावसायिक प्रस्तावना सहाय्य करणे अंतर्गत मुरघास बनविण्याचे मशीन पुरवठा करणे या बाबींचा सकारात्मक विचार करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने या प्रकल्पांतर्गंत जिल्ह्यामध्ये मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांचा पुरवठा केला जाणार आहे, त्याकरिता गरजू पशुपालकांनी संबंधित तालुक्याचे उपविभागीय कृषी अधिकाºयांकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.या योजनेंतर्गंत लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या व प्रकल्पांतर्गंत गावातील कोणत्याही यंत्रणेकडे नोंदणी झालेले शेतकरी गट, स्वयंसहायता गट, बचत गट केवळ पात्र राहतील. शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांच्या प्रकल्पास नोंदणीकृत बँक, वित्तीय संस्था यांचेकडून कर्ज मंजूर होणे आवश्यक आहे.काय आहे मुरघास?हिरव्या वैरणीतील उपलब्ध पोषण मूल्य घटकांचे जतन करण्यासाठी (हिरव्या वैरणीची प्रत व दर्जा कायम राखण्यासाठी) अतिरिक्त हिरवी वैरण योग्यवेळी कापणी करून वैरणीत ३० टक्के शुष्कांक (ड्रायमेंटर) व ७० टक्के आर्द्रता असताना कुट्टी करून सीलो पीट, सीलो बॅग्स, सीलो बॉल्समध्ये हवाबंद स्थितीत (अनअ‍ेरोबीक कंडीशन) मुरण्यासाठी, आंबविण्यासाठी (फरमेंटेश्न) साठविली जाते. या हिरवी वैरण साठविण्याच्या, टिकविण्याच्या पद्धतीला मुरघाट बनविणे असे संबोधिले जाते.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये मुरघास बनविण्याचे मशीनचा पुरवठा करण्यात येईल.- डॉ. मोहन गोहत्रेउपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन