शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

- अन्यथा आधार कार्ड होणार निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:09 IST

आपली विशिष्ट ओळख दर्शविणारे राष्ट्रीय ओळखपत्र सलग तीन वर्षे कुठल्याही कामासाठी न वापरल्यास ‘निराधार’ होणार आहे. असे आधार कार्ड रद्द करण्याचा निर्णय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने घेतला असल्याचे समजते.

ठळक मुद्देतीन वर्षांत वापराची अट यूआयडीएआयचा निर्णय

सुमित हरकुट/

अमरावती: आपली विशिष्ट ओळख दर्शविणारे राष्ट्रीय ओळखपत्र सलग तीन वर्षे कुठल्याही कामासाठी न वापरल्यास ‘निराधार’ होणार आहे. असे आधार कार्ड रद्द करण्याचा निर्णय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने घेतला असल्याचे समजते.यूआयडीएआयच्या निर्णयामुळे बँक खाते, पॅन कार्ड, मोबाइल फोन यांना आधार क्रमांक जोडणे बंधनकारक झाले आहे. आधार कार्ड व पॅन कार्ड यावरील नाव, जन्मतारीख, जन्मवर्ष आणि छायाचित्र यात तफावत आढळल्यास, आधारची जोडणी करता येणार नाही, असेही या प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, आधार कार्डवरील नाव, लिंग, जन्मतारीख, जन्मवर्ष इत्यादी चुका असल्यास, आधारचा वापर करताना समस्या निर्माण होऊ शकतात. अशा आधार कार्डमधील तपशिलात बदल करण्यासाठी नागरिकांना संबंधित केंद्रात सतत चकरा घालाव्या लागतात. अशांना दिलासा देण्यासाठी आता संगणकाद्वारा कुठलाही बदल नोंदविता येईल. मात्र, ज्यांचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडला आहे, अशांनाच आधारसंबंधी माहितीत बदल प्राधिकरणाच्या संकेत स्थळावर करता येईल. हा बदल प्राधिकरणाने दिलेल्या मुदतीतच करणे बंधनकारक आहे. आधार कार्ड संलग्न करण्याची मुदत नुकतीच ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत ही मुदत तब्बल पाच वेळा वाढविण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसर्वच ठिकाणी आधार बंधनकारक असले तरी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. परंतु, याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळेच सलग तीन वर्षे आधारचा वापर न केल्यास, ते निष्क्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्राधिकरणाकडून पाठविण्यात आलेल्या ई-मेलमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड