शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
5
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
6
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
7
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
8
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
9
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
10
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
11
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
12
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
13
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
14
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
15
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
16
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
17
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
18
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
19
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
20
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

सावकाराच्या जाचात अडकल्याने सामान्य नागरिक मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST

चांदूर बाजार : बेकायदेशीर सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश २०१४ हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यात लागू ...

चांदूर बाजार : बेकायदेशीर सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश २०१४ हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यात लागू केला आहे. मात्र, हा कायदा केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे. आता शहरासह ग्रामीण भागातही अवैध सावकारीचे जाळे पसरल्यामुळे गरजू व्यक्तींना कर्ज देऊन त्यांच्याकडून अवाढव्य व्याज वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर व सामान्य नागरिकही मेटाकुटीस आला आहे.

गरजवंतांना गोडी गुलाबीने काही रक्कम द्यायची व थोडे दिवस जाऊ द्यायचे. त्यानंतर अव्वाच्या सव्वा दर लावून ते पैसे वसूल करण्यात येत आहे. यासाठी गावगुंडांचा वापर करून पैसे वसूल करण्याचा सपाटा सध्या तालुक्यातील अवैध सावकारांतर्फे सुरू आहे. या गैरवाजवी व्याजाच्या जाचाला कंटाळून अनेकांनी आपले घरदार व शेतीसुद्धा विकल्याचे अनेक उदाहरण देता येईल. मायबाप सरकारचा कायदा धाब्यावर बसवून अवैध सावकार ग्रामीण भागात लूट करीत आहे. त्यावर कारवाई करणे गरजेचे झाले आले आहे.

आता अल्पभूधारक शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी काही सावकारांकडून कर्जाऊ रक्कम घेतली आहे. काही लोकांनी दलालांमार्फत कर्ज घेतले आहे. काही शेतकऱ्यांनी तर कोऱ्या स्टॅम्पवर लिहून देऊन कर्ज घेतले आहे. हा प्रकार तालुक्यातील ग्रामीण भागात सर्रास सुरू असतो. या अवैध सावकारीमुळे नागरिकांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. गोरगरिबांकडून अव्वाच्या सव्वा व्याज वसूल केले जात असल्यामुळे व्याजापोटी त्यांच्या परिश्रमाची कमाई वाया जात आहे. त्यामुळे अशा कर्ज घेतलेल्या कुटुंबीयांना उपाशीपोटी राहून त्या अवस्थेत अवैध सावकाराचे कर्ज घ्यावे लागत लागत आहे.

अशी केली जाते वसुली

गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला घेऊन किंवा चारचौघात शिवीगाळ करून आपले कर्ज अवैध सावकारी वसूल करण्याची पद्धत सध्या प्रचलित झाली आहे. हा प्रकार थांबवणे काळाची गरज झाली आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पैशाची गरज भासते. कधी आजार, कधी कुटुंबात लग्नासाठी तर कुठे कुटुंबात जखमी झाला तर त्याच्या उपचारासाठी सर्वसामान्यांना पैशाची गरज भासतेच. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी अवाढव्य खर्च होतो. त्यासाठी कर्ज घ्यावेच लागते. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या घरात अनेकदा दारिद्र्य राहते. अशावेळी बँकसुद्धा लवकरात लवकर कर्ज मंजूर करत नाही. त्यामुळे अवैध सावकाराकडे जाऊन सामान्य नागरिकांना हात पसरावे लागत आहे.

गरजवंताला अक्कल नसते

गरजवंत असलेल्या व्यक्तीकडून कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षऱ्या करून कर्ज दिले जाते. त्यातून निर्धारित रकमेपेक्षा जास्त व्याज वसूल केले जाते. त्यामुळे कर्जाच्या रकमेची परतफेड करता येत नाही. हे ग्रामीण भागातील वास्तव आहे. पण गरजेपोटी करावे काय, हे सर्वसामान्यांना सुचत नाही. म्हणून त्यांना कर्ज काढावे लागतात. पण अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करून स्वतः मात्र अवैध सावकार गब्बर होताना दिसत आहे.