शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

सावकाराच्या जाचात अडकल्याने सामान्य नागरिक मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST

चांदूर बाजार : बेकायदेशीर सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश २०१४ हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यात लागू ...

चांदूर बाजार : बेकायदेशीर सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश २०१४ हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यात लागू केला आहे. मात्र, हा कायदा केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे. आता शहरासह ग्रामीण भागातही अवैध सावकारीचे जाळे पसरल्यामुळे गरजू व्यक्तींना कर्ज देऊन त्यांच्याकडून अवाढव्य व्याज वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर व सामान्य नागरिकही मेटाकुटीस आला आहे.

गरजवंतांना गोडी गुलाबीने काही रक्कम द्यायची व थोडे दिवस जाऊ द्यायचे. त्यानंतर अव्वाच्या सव्वा दर लावून ते पैसे वसूल करण्यात येत आहे. यासाठी गावगुंडांचा वापर करून पैसे वसूल करण्याचा सपाटा सध्या तालुक्यातील अवैध सावकारांतर्फे सुरू आहे. या गैरवाजवी व्याजाच्या जाचाला कंटाळून अनेकांनी आपले घरदार व शेतीसुद्धा विकल्याचे अनेक उदाहरण देता येईल. मायबाप सरकारचा कायदा धाब्यावर बसवून अवैध सावकार ग्रामीण भागात लूट करीत आहे. त्यावर कारवाई करणे गरजेचे झाले आले आहे.

आता अल्पभूधारक शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी काही सावकारांकडून कर्जाऊ रक्कम घेतली आहे. काही लोकांनी दलालांमार्फत कर्ज घेतले आहे. काही शेतकऱ्यांनी तर कोऱ्या स्टॅम्पवर लिहून देऊन कर्ज घेतले आहे. हा प्रकार तालुक्यातील ग्रामीण भागात सर्रास सुरू असतो. या अवैध सावकारीमुळे नागरिकांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. गोरगरिबांकडून अव्वाच्या सव्वा व्याज वसूल केले जात असल्यामुळे व्याजापोटी त्यांच्या परिश्रमाची कमाई वाया जात आहे. त्यामुळे अशा कर्ज घेतलेल्या कुटुंबीयांना उपाशीपोटी राहून त्या अवस्थेत अवैध सावकाराचे कर्ज घ्यावे लागत लागत आहे.

अशी केली जाते वसुली

गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला घेऊन किंवा चारचौघात शिवीगाळ करून आपले कर्ज अवैध सावकारी वसूल करण्याची पद्धत सध्या प्रचलित झाली आहे. हा प्रकार थांबवणे काळाची गरज झाली आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पैशाची गरज भासते. कधी आजार, कधी कुटुंबात लग्नासाठी तर कुठे कुटुंबात जखमी झाला तर त्याच्या उपचारासाठी सर्वसामान्यांना पैशाची गरज भासतेच. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी अवाढव्य खर्च होतो. त्यासाठी कर्ज घ्यावेच लागते. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या घरात अनेकदा दारिद्र्य राहते. अशावेळी बँकसुद्धा लवकरात लवकर कर्ज मंजूर करत नाही. त्यामुळे अवैध सावकाराकडे जाऊन सामान्य नागरिकांना हात पसरावे लागत आहे.

गरजवंताला अक्कल नसते

गरजवंत असलेल्या व्यक्तीकडून कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षऱ्या करून कर्ज दिले जाते. त्यातून निर्धारित रकमेपेक्षा जास्त व्याज वसूल केले जाते. त्यामुळे कर्जाच्या रकमेची परतफेड करता येत नाही. हे ग्रामीण भागातील वास्तव आहे. पण गरजेपोटी करावे काय, हे सर्वसामान्यांना सुचत नाही. म्हणून त्यांना कर्ज काढावे लागतात. पण अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करून स्वतः मात्र अवैध सावकार गब्बर होताना दिसत आहे.