शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

गाडगेनगरचे ठाकरे, फ्रेजरपुऱ्याचे चोरमले यांच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 22:05 IST

शहर पोलीस आयुक्तालयातील गाडगेनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख असलेले पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे आणि फे्रजरपुरा पोलीस ठाण्याचे प्रमुख आसाराम चोरमले यांच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र शासनाने पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर पोलीस आयुक्तालयातील गाडगेनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख असलेले पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे आणि फे्रजरपुरा पोलीस ठाण्याचे प्रमुख आसाराम चोरमले यांच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र शासनाने पोलीस महासंचालकांना दिले आहेत.बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांनी गाडगेनगरचे मनीष ठाकरे यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे, तर फे्रजरपुऱ्याचे आसाराम चोरमले यांची तक्रार महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव आणि गृह खात्याचे अप्पर मुख्य सचिव यांना केली होती. आ. रवि राणा यांच्या दोन्ही तक्रारींची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने ठाकरे आणि चोरमले यांच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत.ठाकरेंची जिल्ह्याबाहेर बदली करामनीष ठाकरे हे गाडगेनगर पोलीस ठाण्यात रुजू झाल्यापासून अनेक सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ठाणेदारांविरुद्ध वारंवार तक्रारी केल्या आहेत. अनेक तक्रारी असल्यामुळे त्यांची अमरावती जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी राणा यांनी ठाकरे यांच्यासंबंधाने मुख्यमंत्र्यांना केलेल्या तक्रारीतून केली होती. याच आशयाची तक्रार आसाराम चोरमले यांच्याविरुद्धही आ. राणा यांनी केली होती. चोरमले यांचीही जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी राणा यांच्या पत्रातून करण्यात आलेली आहे.शासनाचे चौकशीचे आदेशमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या गृहखात्याने दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश २१ सप्टेंबर रोजी जारी केले आहेत. याअनुषंगाने ता.श्री. भोसले यांच्या स्वाक्षरीने पोलीस महासंचालकांना जारी करण्यात आलेल्या पत्रात, चौकशी करून त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांना करण्यात आल्या आहेत. आ. राणा यांच्या या दणक्यानंतर अमरावतीचे पोलीस आयुक्त ठाणेदारांची पाठराखण करतात की निष्पक्ष चौकशी, हे कळेलच!चौकशीचे आदेश झाले,जिल्ह्याबाहेरही जावे लागणार- आमदार राणागाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांची कार्यशैली पोलीसप्रमुखपदाला न शोभणारी आहे. लोकसंरक्षणासाठी दिलेल्या 'वर्दी'चा ते लोकांवर अन्याय करण्यासाठी वापर करतात. उठसूट गुन्हे दाखल करणे हा तर त्यांचा जणू छंदच झाला आहे. महत्त्वाच्या ठाण्यात अशा व्यक्तीची नेमणूक म्हणजे आश्चर्यच होय. फ्रेजरपुºयाचे आसाराम चोरमले यांची कार्यशैलीही पोलिसी खाक्या दाखविणारी आहे. 'सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय' या शब्दांची हे अधिकारी ना जाण ठेवतात, ना शान राखतात. लोकांच्या अनेक तक्रारी मला प्राप्त झाल्यात. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. वस्तुस्थिती कथन केली. कारवाई सुरू झाली आहे. दोघांचीही बदली जिल्ह्याबाहेर होणारच, अशी प्रतिक्रिया आमदार रवि राणा यांनी दिली.