शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

वातावरण बदलाने संत्रा मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:36 IST

परिसरामध्ये आठ दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुवारी (दळ) पडले. त्याच्या परिणामी संत्राबागांमध्ये झाडाखाली फळांचा सडा पडला असून, झाडावर आपोआपच संत्राफळे सडत आहेत. याचाच फायदा घेऊन व्यापारी व दलाल संगनमताने मातीमोल भावात बागांचे सौदे करून संत्राउत्पादकांची फसवणूक करीत आहेत. तथापि, काही शेतकरी त्यांच्या फसवणुकीला बळी न पडता आपला माल पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या बाजारपेठेमध्ये नेऊन आपल्या मालाची चांगली किंमत मिळवित आहेत.

ठळक मुद्देव्यापारी-दलालांच्या संगनमताने लूट : संत्रा उत्पादकांद्वारा स्वत:च बाजारपेठेत विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : परिसरामध्ये आठ दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुवारी (दळ) पडले. त्याच्या परिणामी संत्राबागांमध्ये झाडाखाली फळांचा सडा पडला असून, झाडावर आपोआपच संत्राफळे सडत आहेत. याचाच फायदा घेऊन व्यापारी व दलाल संगनमताने मातीमोल भावात बागांचे सौदे करून संत्राउत्पादकांची फसवणूक करीत आहेत. तथापि, काही शेतकरी त्यांच्या फसवणुकीला बळी न पडता आपला माल पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या बाजारपेठेमध्ये नेऊन आपल्या मालाची चांगली किंमत मिळवित आहेत.अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, धामणगाव गढी, मुरादपूर, धोतरखेडा, हनवतखेडा, परसापूर, टवलार, वागडोह, जनुना, रामापूर, कासमपूर, एकलासपूर, शहापूर, हरम, सालेपूर, पांढरी, सावळी, गोंडवाघोली हा परिसर संत्र्याकरिता प्रसिद्ध आहे.मोठ्या खेड्यांच्या बसस्टँडवर व्यापारी-दलालांची एकच गर्दी असून, बस स्टँडच्या टपरीवर चहाच्या अर्ध्या कटिंगच्या भरवशावर ‘तुम्हारा माल वायवार है, माल पर जाली है, कॉफबंद है, मार्केट में किन्नू आया है, कोलारी (कोळशी) है, मार्केट में भाव गिरे है,’ अशी बतावणी करून संत्रा बागायतदारांची हिंमत खचवून लाखोंचा माल हजारात घेण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. एखादा बाहेरील तालुक्यातील व्यापारी बस स्टँडवर उतरला आणि दलालाकडे संत्राबागांची चौकशी केली असता, दलालाकडून त्या व्यापाऱ्याला खोटी माहिती पुरवून ‘वो तो बगीचा फट गया, उसमें तो कोलारी है’, अशी बतावणी करून त्याला परत पाठविण्याची शक्कल लढवितात.परिसरात दोन वर्षांपासून पाऊस कमी असल्यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेल आटल्या. त्याचा परिणाम पिकावर झाला आहे.पाच लाखांची फळे विकली एक लाखालापथ्रोट येथील शेतकरी जगदीशप्रसाद दुबे यांनी तीन लाखांची सत्राबाग व्यापाºयाला पन्नास हजार रुपयांत विकला. पथ्रोट परिसरात आंबिया बहर मोठ्या प्रमाणात घेतला जातो. येथील संत्रा शेतकरी नामदेव नागे यांची ४०० झाडावरील संत्राफळे एक महिन्यापूर्वी पाच लाख रुपयांना व्यापाºयाने मागितली होती. मात्र, ती बाग आठ दिवसांपूर्वी पडलेल्या धुवारी (दवामुळे) एक लाखाला विकावी लागली. झाडांच्या देखभालीला लागलेला खर्चही निघाला नाही. ही शेतकऱ्यांची व्यथा दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकºयांचे कर्ज तर माफ होत नाहीच, उलट शेतकऱ्यांचे कर्ज अशा परिस्थितीमुळे वाढतच आहे, ही व्यथा आहे.बागा तोडण्याचा वेग वाढणारभूगर्भातील जलस्तर खाली गेल्यामुळे विहिरी खोदूनही पाणी लागत नाही. बोअरवेल आटल्यामुळे पुढील एप्रिल, मे महिन्यात पथ्रोट परिसरातील बागा वेगाने सुकण्याचा व तोडल्या जाण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.