शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

वातावरण बदलाने संत्रा मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:36 IST

परिसरामध्ये आठ दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुवारी (दळ) पडले. त्याच्या परिणामी संत्राबागांमध्ये झाडाखाली फळांचा सडा पडला असून, झाडावर आपोआपच संत्राफळे सडत आहेत. याचाच फायदा घेऊन व्यापारी व दलाल संगनमताने मातीमोल भावात बागांचे सौदे करून संत्राउत्पादकांची फसवणूक करीत आहेत. तथापि, काही शेतकरी त्यांच्या फसवणुकीला बळी न पडता आपला माल पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या बाजारपेठेमध्ये नेऊन आपल्या मालाची चांगली किंमत मिळवित आहेत.

ठळक मुद्देव्यापारी-दलालांच्या संगनमताने लूट : संत्रा उत्पादकांद्वारा स्वत:च बाजारपेठेत विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : परिसरामध्ये आठ दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुवारी (दळ) पडले. त्याच्या परिणामी संत्राबागांमध्ये झाडाखाली फळांचा सडा पडला असून, झाडावर आपोआपच संत्राफळे सडत आहेत. याचाच फायदा घेऊन व्यापारी व दलाल संगनमताने मातीमोल भावात बागांचे सौदे करून संत्राउत्पादकांची फसवणूक करीत आहेत. तथापि, काही शेतकरी त्यांच्या फसवणुकीला बळी न पडता आपला माल पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या बाजारपेठेमध्ये नेऊन आपल्या मालाची चांगली किंमत मिळवित आहेत.अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, धामणगाव गढी, मुरादपूर, धोतरखेडा, हनवतखेडा, परसापूर, टवलार, वागडोह, जनुना, रामापूर, कासमपूर, एकलासपूर, शहापूर, हरम, सालेपूर, पांढरी, सावळी, गोंडवाघोली हा परिसर संत्र्याकरिता प्रसिद्ध आहे.मोठ्या खेड्यांच्या बसस्टँडवर व्यापारी-दलालांची एकच गर्दी असून, बस स्टँडच्या टपरीवर चहाच्या अर्ध्या कटिंगच्या भरवशावर ‘तुम्हारा माल वायवार है, माल पर जाली है, कॉफबंद है, मार्केट में किन्नू आया है, कोलारी (कोळशी) है, मार्केट में भाव गिरे है,’ अशी बतावणी करून संत्रा बागायतदारांची हिंमत खचवून लाखोंचा माल हजारात घेण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. एखादा बाहेरील तालुक्यातील व्यापारी बस स्टँडवर उतरला आणि दलालाकडे संत्राबागांची चौकशी केली असता, दलालाकडून त्या व्यापाऱ्याला खोटी माहिती पुरवून ‘वो तो बगीचा फट गया, उसमें तो कोलारी है’, अशी बतावणी करून त्याला परत पाठविण्याची शक्कल लढवितात.परिसरात दोन वर्षांपासून पाऊस कमी असल्यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेल आटल्या. त्याचा परिणाम पिकावर झाला आहे.पाच लाखांची फळे विकली एक लाखालापथ्रोट येथील शेतकरी जगदीशप्रसाद दुबे यांनी तीन लाखांची सत्राबाग व्यापाºयाला पन्नास हजार रुपयांत विकला. पथ्रोट परिसरात आंबिया बहर मोठ्या प्रमाणात घेतला जातो. येथील संत्रा शेतकरी नामदेव नागे यांची ४०० झाडावरील संत्राफळे एक महिन्यापूर्वी पाच लाख रुपयांना व्यापाºयाने मागितली होती. मात्र, ती बाग आठ दिवसांपूर्वी पडलेल्या धुवारी (दवामुळे) एक लाखाला विकावी लागली. झाडांच्या देखभालीला लागलेला खर्चही निघाला नाही. ही शेतकऱ्यांची व्यथा दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकºयांचे कर्ज तर माफ होत नाहीच, उलट शेतकऱ्यांचे कर्ज अशा परिस्थितीमुळे वाढतच आहे, ही व्यथा आहे.बागा तोडण्याचा वेग वाढणारभूगर्भातील जलस्तर खाली गेल्यामुळे विहिरी खोदूनही पाणी लागत नाही. बोअरवेल आटल्यामुळे पुढील एप्रिल, मे महिन्यात पथ्रोट परिसरातील बागा वेगाने सुकण्याचा व तोडल्या जाण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.