शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदलाने संत्रा मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:36 IST

परिसरामध्ये आठ दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुवारी (दळ) पडले. त्याच्या परिणामी संत्राबागांमध्ये झाडाखाली फळांचा सडा पडला असून, झाडावर आपोआपच संत्राफळे सडत आहेत. याचाच फायदा घेऊन व्यापारी व दलाल संगनमताने मातीमोल भावात बागांचे सौदे करून संत्राउत्पादकांची फसवणूक करीत आहेत. तथापि, काही शेतकरी त्यांच्या फसवणुकीला बळी न पडता आपला माल पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या बाजारपेठेमध्ये नेऊन आपल्या मालाची चांगली किंमत मिळवित आहेत.

ठळक मुद्देव्यापारी-दलालांच्या संगनमताने लूट : संत्रा उत्पादकांद्वारा स्वत:च बाजारपेठेत विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : परिसरामध्ये आठ दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुवारी (दळ) पडले. त्याच्या परिणामी संत्राबागांमध्ये झाडाखाली फळांचा सडा पडला असून, झाडावर आपोआपच संत्राफळे सडत आहेत. याचाच फायदा घेऊन व्यापारी व दलाल संगनमताने मातीमोल भावात बागांचे सौदे करून संत्राउत्पादकांची फसवणूक करीत आहेत. तथापि, काही शेतकरी त्यांच्या फसवणुकीला बळी न पडता आपला माल पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या बाजारपेठेमध्ये नेऊन आपल्या मालाची चांगली किंमत मिळवित आहेत.अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, धामणगाव गढी, मुरादपूर, धोतरखेडा, हनवतखेडा, परसापूर, टवलार, वागडोह, जनुना, रामापूर, कासमपूर, एकलासपूर, शहापूर, हरम, सालेपूर, पांढरी, सावळी, गोंडवाघोली हा परिसर संत्र्याकरिता प्रसिद्ध आहे.मोठ्या खेड्यांच्या बसस्टँडवर व्यापारी-दलालांची एकच गर्दी असून, बस स्टँडच्या टपरीवर चहाच्या अर्ध्या कटिंगच्या भरवशावर ‘तुम्हारा माल वायवार है, माल पर जाली है, कॉफबंद है, मार्केट में किन्नू आया है, कोलारी (कोळशी) है, मार्केट में भाव गिरे है,’ अशी बतावणी करून संत्रा बागायतदारांची हिंमत खचवून लाखोंचा माल हजारात घेण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. एखादा बाहेरील तालुक्यातील व्यापारी बस स्टँडवर उतरला आणि दलालाकडे संत्राबागांची चौकशी केली असता, दलालाकडून त्या व्यापाऱ्याला खोटी माहिती पुरवून ‘वो तो बगीचा फट गया, उसमें तो कोलारी है’, अशी बतावणी करून त्याला परत पाठविण्याची शक्कल लढवितात.परिसरात दोन वर्षांपासून पाऊस कमी असल्यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेल आटल्या. त्याचा परिणाम पिकावर झाला आहे.पाच लाखांची फळे विकली एक लाखालापथ्रोट येथील शेतकरी जगदीशप्रसाद दुबे यांनी तीन लाखांची सत्राबाग व्यापाºयाला पन्नास हजार रुपयांत विकला. पथ्रोट परिसरात आंबिया बहर मोठ्या प्रमाणात घेतला जातो. येथील संत्रा शेतकरी नामदेव नागे यांची ४०० झाडावरील संत्राफळे एक महिन्यापूर्वी पाच लाख रुपयांना व्यापाºयाने मागितली होती. मात्र, ती बाग आठ दिवसांपूर्वी पडलेल्या धुवारी (दवामुळे) एक लाखाला विकावी लागली. झाडांच्या देखभालीला लागलेला खर्चही निघाला नाही. ही शेतकऱ्यांची व्यथा दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकºयांचे कर्ज तर माफ होत नाहीच, उलट शेतकऱ्यांचे कर्ज अशा परिस्थितीमुळे वाढतच आहे, ही व्यथा आहे.बागा तोडण्याचा वेग वाढणारभूगर्भातील जलस्तर खाली गेल्यामुळे विहिरी खोदूनही पाणी लागत नाही. बोअरवेल आटल्यामुळे पुढील एप्रिल, मे महिन्यात पथ्रोट परिसरातील बागा वेगाने सुकण्याचा व तोडल्या जाण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.