शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

‘विदर्भाच्या कॅलिफोर्निया’तील संत्री मातीमोल, दर नीचांकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 12:20 IST

Orange farmer Amravati news  विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या रसाळ संत्र्याला भाव नसल्याने संत्राउत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत.

ठळक मुद्देहवा राजाश्रय१२ ते १५ रुपये किलोमोर्शी तालुक्यात तीच स्थिती

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती  :  विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या रसाळ संत्र्याला भाव नसल्याने संत्राउत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत. ५० रुपये किलो असलेल्या संत्र्याचा दर केवळ १२ ते १५ रुपये प्रतिकिलोवर आला असून, २०० रुपये क्रेटने शेतकऱ्यांची संत्री विकली जात असल्याचे चित्र आहे.अतिपावसामुळे यावर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत संत्राबागांमध्ये मोठ्या  प्रमाणात फळगळ झाली. त्यामध्ये संत्राउत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्या संकटावर मात करून शिल्लक राहिलेल्या संत्राफळांवर लाखो रुपये खर्च करून विविध फवारण्या व उपाययोजना करून फळांची शेतकऱ्यांनी योग्य जपणूक करून त्यांना टिकवून ठेवले. मात्र, अचानक आता संत्र्याला भाव मिळत नसल्याने जरूड तसेच वरूड व मोर्शी तालुक्यांतील संत्राउत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत. 

मोर्शी आणि वरूड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संत्राबागा आहेत. लॉकडाऊनच्या टाळेबंदीमुळे सर्वत्र वाहतूक बंद होती. त्यावेळी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात संत्री असूनदेखील भाव नसल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.  यावर्षी आंबिया बहराची फूट चांगली झाली होती. मात्र, जुलै ते ऑगस्ट महिन्यात बागांमध्ये ३५ ते ५० टक्के संत्री गळून पडली. आता उर्वरित मालाला संत्राउत्पादक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. मध्यंतरी अतिपावसामुळेही काळे व पिवळे डाग पडून फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली होती. त्यातून वाचलेल्या संत्र्यालाही भाव नसल्याने संत्रा बागायतदारांची कोंडी झाली आहे. 

१२०० ते १५०० रुपये भाव सध्या संत्र्याला १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यंदा आंबिया बहराचे उत्पादन चांगले होण्याची आशा संत्राउत्पादक शेतकऱ्यांना होती. संत्रा उत्पादनाला चांगला भाव मिळून पैसा हातात येईल, या आशेवर असलेला शेतकरी होता. भीषण दुष्काळ, टोळधाड, फळगळ, पानगळ, कोरोना या सर्व संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. भावामुळे मातीमोल भावाने विक्री होत असल्याने आता तरी संत्राल्या राजाश्रय मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेती