शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

‘विदर्भाच्या कॅलिफोर्निया’तील संत्री मातीमोल, दर नीचांकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 12:20 IST

Orange farmer Amravati news  विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या रसाळ संत्र्याला भाव नसल्याने संत्राउत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत.

ठळक मुद्देहवा राजाश्रय१२ ते १५ रुपये किलोमोर्शी तालुक्यात तीच स्थिती

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती  :  विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या रसाळ संत्र्याला भाव नसल्याने संत्राउत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत. ५० रुपये किलो असलेल्या संत्र्याचा दर केवळ १२ ते १५ रुपये प्रतिकिलोवर आला असून, २०० रुपये क्रेटने शेतकऱ्यांची संत्री विकली जात असल्याचे चित्र आहे.अतिपावसामुळे यावर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत संत्राबागांमध्ये मोठ्या  प्रमाणात फळगळ झाली. त्यामध्ये संत्राउत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्या संकटावर मात करून शिल्लक राहिलेल्या संत्राफळांवर लाखो रुपये खर्च करून विविध फवारण्या व उपाययोजना करून फळांची शेतकऱ्यांनी योग्य जपणूक करून त्यांना टिकवून ठेवले. मात्र, अचानक आता संत्र्याला भाव मिळत नसल्याने जरूड तसेच वरूड व मोर्शी तालुक्यांतील संत्राउत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत. 

मोर्शी आणि वरूड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संत्राबागा आहेत. लॉकडाऊनच्या टाळेबंदीमुळे सर्वत्र वाहतूक बंद होती. त्यावेळी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात संत्री असूनदेखील भाव नसल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.  यावर्षी आंबिया बहराची फूट चांगली झाली होती. मात्र, जुलै ते ऑगस्ट महिन्यात बागांमध्ये ३५ ते ५० टक्के संत्री गळून पडली. आता उर्वरित मालाला संत्राउत्पादक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. मध्यंतरी अतिपावसामुळेही काळे व पिवळे डाग पडून फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली होती. त्यातून वाचलेल्या संत्र्यालाही भाव नसल्याने संत्रा बागायतदारांची कोंडी झाली आहे. 

१२०० ते १५०० रुपये भाव सध्या संत्र्याला १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यंदा आंबिया बहराचे उत्पादन चांगले होण्याची आशा संत्राउत्पादक शेतकऱ्यांना होती. संत्रा उत्पादनाला चांगला भाव मिळून पैसा हातात येईल, या आशेवर असलेला शेतकरी होता. भीषण दुष्काळ, टोळधाड, फळगळ, पानगळ, कोरोना या सर्व संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. भावामुळे मातीमोल भावाने विक्री होत असल्याने आता तरी संत्राल्या राजाश्रय मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेती