शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा प्रक्रिया प्रकल्प गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:03 IST

वरूड-मोर्शी भागात संत्रा उत्पादकांची संख्या अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या सुविधेसाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात यावा, आशी मागणी शेतकऱ्यांमधून उमटली आहे.

ठळक मुद्देबागायतदार हवालदिल : विक्री व्यवस्थापन आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : वरूड-मोर्शी भागात संत्रा उत्पादकांची संख्या अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या सुविधेसाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात यावा, आशी मागणी शेतकऱ्यांमधून उमटली आहे.मोर्शी तालुक्यातील मायावाडी औद्योगिक वसाहतीमध्ये संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची इमारती उभी आहे. परंतु, ती केवळ एक शोभेची वास्तू म्हणून उभारून ठेवल्याचे चित्र आहे. या इमारतीत लाखो रुपयांची यंत्रसामग्री धूळखात पडलेली आहे. शासनाने हा संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरूकेल्यास या प्रकल्पाचा फायदा निश्चितच या भागातील संत्रा उत्पादकांना होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे उत्पादन अधिक प्रमाणात होते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांसाठी सहकारी तत्त्वावर मोठे साखर कारखाने उभे करण्यात आले. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीसाठी कोठेही फिरावे लागत नाही. त्यामुळे त्यांच्या मालाला परिपूर्ण मोबदला मिळतो व नुकसानही होत नाही. त्याच्या उलट स्थिती संत्राउत्पादक शेतकºयांची आहे. येथे कोणत्याही प्रकारचा प्रक्रिया प्रकल्प नसल्यामुळे शेतकऱ्यांना संत्राफळे व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नाही. व्यापारीसुद्धा परप्रांतात संत्र्याची निर्यात करतो. त्यामुळे बाजारपेठेसोबत शेतकऱ्यांचा कोणताही संबंध राहत नाही.संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू असते, तर शेतकऱ्यांना आपला माल स्वत: विकता आला असता आणि संपूर्ण मालाचे दाम शेतकºयांना मिळाले असते. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच येथील शेतकरीसुद्धा समाधानी राहिला असता. शासन वैदर्भीय शेतकºयांना सापत्न वागणूक देत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.