शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

संत्रा प्रक्रिया प्रकल्प गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:03 IST

वरूड-मोर्शी भागात संत्रा उत्पादकांची संख्या अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या सुविधेसाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात यावा, आशी मागणी शेतकऱ्यांमधून उमटली आहे.

ठळक मुद्देबागायतदार हवालदिल : विक्री व्यवस्थापन आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : वरूड-मोर्शी भागात संत्रा उत्पादकांची संख्या अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या सुविधेसाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात यावा, आशी मागणी शेतकऱ्यांमधून उमटली आहे.मोर्शी तालुक्यातील मायावाडी औद्योगिक वसाहतीमध्ये संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची इमारती उभी आहे. परंतु, ती केवळ एक शोभेची वास्तू म्हणून उभारून ठेवल्याचे चित्र आहे. या इमारतीत लाखो रुपयांची यंत्रसामग्री धूळखात पडलेली आहे. शासनाने हा संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरूकेल्यास या प्रकल्पाचा फायदा निश्चितच या भागातील संत्रा उत्पादकांना होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे उत्पादन अधिक प्रमाणात होते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांसाठी सहकारी तत्त्वावर मोठे साखर कारखाने उभे करण्यात आले. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीसाठी कोठेही फिरावे लागत नाही. त्यामुळे त्यांच्या मालाला परिपूर्ण मोबदला मिळतो व नुकसानही होत नाही. त्याच्या उलट स्थिती संत्राउत्पादक शेतकºयांची आहे. येथे कोणत्याही प्रकारचा प्रक्रिया प्रकल्प नसल्यामुळे शेतकऱ्यांना संत्राफळे व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नाही. व्यापारीसुद्धा परप्रांतात संत्र्याची निर्यात करतो. त्यामुळे बाजारपेठेसोबत शेतकऱ्यांचा कोणताही संबंध राहत नाही.संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू असते, तर शेतकऱ्यांना आपला माल स्वत: विकता आला असता आणि संपूर्ण मालाचे दाम शेतकºयांना मिळाले असते. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच येथील शेतकरीसुद्धा समाधानी राहिला असता. शासन वैदर्भीय शेतकºयांना सापत्न वागणूक देत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.