शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

शेंदूरजनाघाट येथून गेला देशाच्या कानाकोपऱ्यात संत्रा ज्यूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:13 IST

संजय खासबागे वरूड : तालुक्यात सन १९५७ मध्ये चार दोन युवकांनी एकत्र येऊन संत्राफळांवर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभी करण्याचा ...

संजय खासबागे

वरूड : तालुक्यात सन १९५७ मध्ये चार दोन युवकांनी एकत्र येऊन संत्राफळांवर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न केला. संत्र्यावर प्रक्रिया करणारा कारखाना उभा करण्याचा ध्यास घेऊन अमरावती फ्रूट ग्रोअर्स इंडस्ट्रीयल को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या नावाने संत्र्याचा ज्यूस काढणारी फॅक्टरी सन १९५७ मध्ये शेंदूरजनाघाट या छोट्याशा गावात उभी राहिली. या संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब तरार, तर सचिव काँग्रेसचे तत्कालीन माजी आमदार महादेवराव आंडे हे होते. तांत्रिक अधिकारी म्हणून गंगाधर खेरडे यांनी मद्रास येथून शिक्षण घेऊन याच फॅक्टरीमध्ये काम केले. त्यांनी येथील संत्रा ज्यूस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविला.

फॅक्टरीचे उद्घाटन राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते २७ नोव्हेंबर १९६० रोजी पार पडले होते. ध्येयवेड्या युवकांनी स्वभरवशावर संत्र्याचा रस बंगळुरु, कोलकाता, चेन्नई, मुंबई, कानपूर, अमृतसर, नागपूर आदी मोठ्या शहरांत पोहचविला. १९५८ ते १९६३ पर्यंत ही सोसायटी सुरळीत चालली. सहकारी तत्त्वावर सरू असलेल्या ज्यूस फॅक्टरीतून देशात ठिकठिकाणी ज्यूस पाठविण्याचे काम सुरू होते. सन १९६३ मध्ये अमरावती जिल्हा बँकेच्या कर्जावर सुरु असलेल्या या संस्थेला कर्जफेड करताना नाइलाजाने आपल्या मालकीची जागा बँक व्यवस्थापनाला विकावी लागली. आता या जागेवर अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. तथापि, या ज्यूस फॅक्टरीचा शिलालेख तेव्हाच्या संत्रा प्रक्रिया केंद्राची साक्ष देतो.

सहकारी तत्त्वावर वरूडला १९९२ मध्ये सोपॅक प्रकल्प

वरूड येथेसुद्धा सन १९९२ मध्ये सहकारी तत्त्वावर सोपॅक प्राईव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रकल्प रोशनखेडा फाट्यावर उभा राहिला. उत्पादन सुरू झाले. संत्रा रसाने भरलेल्या बॉटल ‘सोपॅक’ नावाने बाजारात आल्या. परंतु केवळ राजकीय हेवेदाव्यातून ही कंपनी बंद पडली. शासनाचा संत्रा प्रक्रिया कारखाना व्हावा, यासाठी तत्कालीन कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी जोरकस प्रयत्न केले. वरूड आणि काटोलकरिता असलेला संत्रा प्रकल्प पूर्ण होऊन तो मोर्शी तालूक्यात मायवाडी औैद्योगिक वसाहतीमध्ये सन १९९५ मध्ये कार्यान्वित झाला. संत्रा प्रक्रिया केंद्र म्हणून गवगवा झाला असला तरी प्रत्यक्षात तेथे संत्र्याला व्हॅक्सिनेशनच केले गेले. भाजपच्या सत्ताकाळात दुसऱ्यांदा या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, प्रकल्प केवळ दोन दिवसच सुरू ठेवण्यात आला. शासनानेच या प्रक्रिया केंद्राचे तीनतेरा वाजविले आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला.