शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
3
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
4
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
5
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
6
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
9
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
10
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
11
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
13
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
14
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
15
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
16
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
18
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
19
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
20
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

शेंदूरजनाघाट येथून गेला देशाच्या कानाकोपऱ्यात संत्रा ज्यूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:13 IST

संजय खासबागे वरूड : तालुक्यात सन १९५७ मध्ये चार दोन युवकांनी एकत्र येऊन संत्राफळांवर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभी करण्याचा ...

संजय खासबागे

वरूड : तालुक्यात सन १९५७ मध्ये चार दोन युवकांनी एकत्र येऊन संत्राफळांवर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न केला. संत्र्यावर प्रक्रिया करणारा कारखाना उभा करण्याचा ध्यास घेऊन अमरावती फ्रूट ग्रोअर्स इंडस्ट्रीयल को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या नावाने संत्र्याचा ज्यूस काढणारी फॅक्टरी सन १९५७ मध्ये शेंदूरजनाघाट या छोट्याशा गावात उभी राहिली. या संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब तरार, तर सचिव काँग्रेसचे तत्कालीन माजी आमदार महादेवराव आंडे हे होते. तांत्रिक अधिकारी म्हणून गंगाधर खेरडे यांनी मद्रास येथून शिक्षण घेऊन याच फॅक्टरीमध्ये काम केले. त्यांनी येथील संत्रा ज्यूस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविला.

फॅक्टरीचे उद्घाटन राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते २७ नोव्हेंबर १९६० रोजी पार पडले होते. ध्येयवेड्या युवकांनी स्वभरवशावर संत्र्याचा रस बंगळुरु, कोलकाता, चेन्नई, मुंबई, कानपूर, अमृतसर, नागपूर आदी मोठ्या शहरांत पोहचविला. १९५८ ते १९६३ पर्यंत ही सोसायटी सुरळीत चालली. सहकारी तत्त्वावर सरू असलेल्या ज्यूस फॅक्टरीतून देशात ठिकठिकाणी ज्यूस पाठविण्याचे काम सुरू होते. सन १९६३ मध्ये अमरावती जिल्हा बँकेच्या कर्जावर सुरु असलेल्या या संस्थेला कर्जफेड करताना नाइलाजाने आपल्या मालकीची जागा बँक व्यवस्थापनाला विकावी लागली. आता या जागेवर अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. तथापि, या ज्यूस फॅक्टरीचा शिलालेख तेव्हाच्या संत्रा प्रक्रिया केंद्राची साक्ष देतो.

सहकारी तत्त्वावर वरूडला १९९२ मध्ये सोपॅक प्रकल्प

वरूड येथेसुद्धा सन १९९२ मध्ये सहकारी तत्त्वावर सोपॅक प्राईव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रकल्प रोशनखेडा फाट्यावर उभा राहिला. उत्पादन सुरू झाले. संत्रा रसाने भरलेल्या बॉटल ‘सोपॅक’ नावाने बाजारात आल्या. परंतु केवळ राजकीय हेवेदाव्यातून ही कंपनी बंद पडली. शासनाचा संत्रा प्रक्रिया कारखाना व्हावा, यासाठी तत्कालीन कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी जोरकस प्रयत्न केले. वरूड आणि काटोलकरिता असलेला संत्रा प्रकल्प पूर्ण होऊन तो मोर्शी तालूक्यात मायवाडी औैद्योगिक वसाहतीमध्ये सन १९९५ मध्ये कार्यान्वित झाला. संत्रा प्रक्रिया केंद्र म्हणून गवगवा झाला असला तरी प्रत्यक्षात तेथे संत्र्याला व्हॅक्सिनेशनच केले गेले. भाजपच्या सत्ताकाळात दुसऱ्यांदा या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, प्रकल्प केवळ दोन दिवसच सुरू ठेवण्यात आला. शासनानेच या प्रक्रिया केंद्राचे तीनतेरा वाजविले आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला.