शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

वाढत्या तापमानामुळे संत्रा फळांना गळती

By admin | Updated: May 8, 2015 00:27 IST

विदर्भाच्या कॅलिफोर्नियात सूर्य आग ओकू लागल्याने संत्राबागा होरपळत आहेत. अतितापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागल्याने संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.

संजय खासबागे  वरूडविदर्भाच्या कॅलिफोर्नियात सूर्य आग ओकू लागल्याने संत्राबागा होरपळत आहेत. अतितापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागल्याने संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. तीन वर्षांपासूनच्या सतच्या नापिकीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांकडे खरिपाच्या मशागतीकरिता आर्थिक तरतूद नसल्याने शेकडो हेक्टर जमीन पडीक राहण्याची शक्यता आहे. शासनाने तातडीने पीककर्ज द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तालुक्यात १६ हजार हेक्टरमध्ये संत्र्याचे पीक आहे. सद्यस्थितीत तापमान ४४ ते ४५ डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे संत्र्याचा आंबिया बहर गळत आहे. गळतीचे प्रमाण ४० ते ५० टक्के असल्याने संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन विकली तर अनेकांची सावकारांच्या घशात गेली आहे. शेतजमिनी, मालमत्ता विक्रीपत्र, इसारचिठ्ठीसारख्या कागदपत्रांचा आधार घेऊन शेतकऱ्यांनी गहाणात मालमत्ता ठेवली आहे भूमाफियांनी त्या जमिनी हडपल्या आहेत. आता वाढत्या तापामानाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले. अशा परिस्थीतीत शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे विवाह सोहळे स्थगित होत आहेत. अनेकांना पोटाची खळगी भरण्याकरिता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामाकरिता बी- बियाणे, खते तसेच शेतीच्या मशागतीवर हजारो रुपये खर्च करावा लागतो. परंतु पैसाच नसल्याने अद्याप शेतीची मशागत सुरू झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेकडो हेक्टर जमीन पडीक राहण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तातडीने बियाणे, अनुदानावर खतांचा पुरवठा करावा तर मशागतीकरिता पीककर्जाचे मे महिन्यातच वाटप करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.