शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

वाढत्या तापमानामुळे संत्रा फळांना गळती

By admin | Updated: May 8, 2015 00:27 IST

विदर्भाच्या कॅलिफोर्नियात सूर्य आग ओकू लागल्याने संत्राबागा होरपळत आहेत. अतितापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागल्याने संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.

संजय खासबागे  वरूडविदर्भाच्या कॅलिफोर्नियात सूर्य आग ओकू लागल्याने संत्राबागा होरपळत आहेत. अतितापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागल्याने संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. तीन वर्षांपासूनच्या सतच्या नापिकीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांकडे खरिपाच्या मशागतीकरिता आर्थिक तरतूद नसल्याने शेकडो हेक्टर जमीन पडीक राहण्याची शक्यता आहे. शासनाने तातडीने पीककर्ज द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तालुक्यात १६ हजार हेक्टरमध्ये संत्र्याचे पीक आहे. सद्यस्थितीत तापमान ४४ ते ४५ डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे संत्र्याचा आंबिया बहर गळत आहे. गळतीचे प्रमाण ४० ते ५० टक्के असल्याने संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन विकली तर अनेकांची सावकारांच्या घशात गेली आहे. शेतजमिनी, मालमत्ता विक्रीपत्र, इसारचिठ्ठीसारख्या कागदपत्रांचा आधार घेऊन शेतकऱ्यांनी गहाणात मालमत्ता ठेवली आहे भूमाफियांनी त्या जमिनी हडपल्या आहेत. आता वाढत्या तापामानाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले. अशा परिस्थीतीत शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे विवाह सोहळे स्थगित होत आहेत. अनेकांना पोटाची खळगी भरण्याकरिता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामाकरिता बी- बियाणे, खते तसेच शेतीच्या मशागतीवर हजारो रुपये खर्च करावा लागतो. परंतु पैसाच नसल्याने अद्याप शेतीची मशागत सुरू झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेकडो हेक्टर जमीन पडीक राहण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तातडीने बियाणे, अनुदानावर खतांचा पुरवठा करावा तर मशागतीकरिता पीककर्जाचे मे महिन्यातच वाटप करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.