शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अतिउष्णतेमुळे संत्रा फळांची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:13 IST

पान२ ची बॉटम नांदगाव खंडेश्वर : संत्राबागेतील आंबिया बहराची फळे अतिउष्णतेमुळे गळत आहे. १५ दिवसांपूर्वी तालुक्यात अवकाळी पाऊस ...

पान२ ची बॉटम

नांदगाव खंडेश्वर : संत्राबागेतील आंबिया बहराची फळे अतिउष्णतेमुळे गळत आहे. १५ दिवसांपूर्वी तालुक्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे उष्णतामान कमी होऊन हवेत गारवा निर्माण झाला होता. पण, आता एकाएकी उष्णतामान वाढल्याने हवामानातील या बदलातील परिणामामुळे संत्रा झाडावरील फळे गळत आहे.

तालुक्यात ८२० हेक्टर संत्रा फळबाग आहे. आंबिया बहराची आवळ्याच्या आकाराची फळे झाडावर आहेत. हवामानात बदल होऊन उष्णतामान वाढल्याने संत्रा फळे गळत आहे. या शेतकऱ्यानी हवामानावर आधारित पीक विमा काढला आहे. कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम फळे व पिकांवर होत असून, संत्रा बागायतदार हवालदिल झाले आहेत. या बदलामुळे आंब्याचा मोहोर व फळांची गळती होत आहे. या वातावरणामुळे खरबूज व टरबुजावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. बदलते हवामान भाजीपाला, फळे व पिकांसाठी हानिकारक ठरत आहे. विदर्भात सध्या गहू व हरभरा पिकांची काढणी सुरू आहे. जवळपास ७० टक्के काढणी झाली आहे. उर्वरित ३० टक्के पिकाला या वातावरणाचा फटका बसत आहे.

कोट

येणस येथील शिवारात पाच एकर संत्राबाग आहे. त्यावर आवळ्याच्या आकाराची आंबिया बहराची संत्री फळे आहे. अतिउष्ण तापमानामुळे झाडावरची फळे गळत आहे. जवळपास झाडावरील अर्धा फळांचा माल गळाला. तालुक्यातील संत्राबागांतील जवळपास हीच परिस्थिती आहे.

- मनोज कडू,

शेतकरी, येनस

-----------