शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

संत्राफळ पीकविमा महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:15 IST

दुष्काळात तेरावा महिना, आंबिया बहराकरिता रक्कम झाली तिप्पट, संत्राबागायतदार आर्थिक अडचणीत चांदूर बाजार : प्रधानमंत्री पीक वीमा योजनांतर्गत पुनर्रचित ...

दुष्काळात तेरावा महिना, आंबिया बहराकरिता रक्कम झाली तिप्पट, संत्राबागायतदार आर्थिक अडचणीत

चांदूर बाजार : प्रधानमंत्री पीक वीमा योजनांतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा संत्रा पिकाचा आंबिया बहर तिप्पट महागला आहे. यामुळे विमा कंपनीतर्फे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचा आरोप केला जात आहे.

सध्या चोहोबाजूंनी शेतकरी अडचणीत असताना कोरोनामुळे आलेले आर्थिक संकट, गारपीट, संत्रा फळगळ, विविध प्रकारचे रोग यामुळे शेतकरी अगोदरच विवंचनेत आहे. असे असताना २०२१-२२ प्रधानमंत्री पीक विमा आंबिया संत्रा बहरच्या विमा रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. विमा योजनेत वाढ झाल्यामुळे संत्रा बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.

दरवर्षी अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आपला विमा प्रति हेक्टर ४ हजार रुपयाप्रमाणे काढत होते. मात्र यंदा ही रक्कम ४ हजारवरून तब्बल १२ हजार रुपये प्रतिहेक्टर भरावी लागणार आहे, असे नुकतेच प्रसिध्द झालेल्या परिपत्रकात नमूद केल्याची माहिती शेतकरी जिल्हा विमा प्रतिनिधी पुष्पक खापरे यांनी दिली. २०२० -२१ पर्यंत संत्रा विमा रक्कम प्रति हेक्टरी ४ हजार रुपये होती. तर विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये होती. आता शासनाने संत्रा विमा रक्कम १२ हजार रुपये केली आहे.

शेतकरी हिस्सा १२ हजार असताना ८० हजार रुपये प्रति हे्क्टर संरक्षित रक्कम मिळणार आहे. तसेच गारपीट विम्यासाठी १३३३ रुपये प्रति हेक्टरी शेतकरी हिस्सा वेगळा भरावा लागनार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. अशी एकूण १३ हजार ३३३ रुपये शेतकऱ्याच्या हिश्यावर भरावी लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२ हजार रुपये, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४ हजार रुपये आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २० हजार रुपये प्रति हेक्टरी शेतकरी पीक विमा हिस्सा लागू करण्यात आला आहे.

कोट

शेतकरी आर्थिक परिस्थितीने अडकलेला असताना खाजगीकरणाच्या नावाखाली विमा कंपनीमार्फत लुटण्याचे काम सुरू आहे. राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना लक्षात घेऊन विमा हप्ता कमी करावा. शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा

- पुष्पक खापरे, शेतकरी जिल्हा विमा प्रतिनिधी, चांदूर बाजार