शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

संत्राफळ पीकविमा महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:15 IST

दुष्काळात तेरावा महिना, आंबिया बहराकरिता रक्कम झाली तिप्पट, संत्राबागायतदार आर्थिक अडचणीत चांदूर बाजार : प्रधानमंत्री पीक वीमा योजनांतर्गत पुनर्रचित ...

दुष्काळात तेरावा महिना, आंबिया बहराकरिता रक्कम झाली तिप्पट, संत्राबागायतदार आर्थिक अडचणीत

चांदूर बाजार : प्रधानमंत्री पीक वीमा योजनांतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा संत्रा पिकाचा आंबिया बहर तिप्पट महागला आहे. यामुळे विमा कंपनीतर्फे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचा आरोप केला जात आहे.

सध्या चोहोबाजूंनी शेतकरी अडचणीत असताना कोरोनामुळे आलेले आर्थिक संकट, गारपीट, संत्रा फळगळ, विविध प्रकारचे रोग यामुळे शेतकरी अगोदरच विवंचनेत आहे. असे असताना २०२१-२२ प्रधानमंत्री पीक विमा आंबिया संत्रा बहरच्या विमा रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. विमा योजनेत वाढ झाल्यामुळे संत्रा बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.

दरवर्षी अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आपला विमा प्रति हेक्टर ४ हजार रुपयाप्रमाणे काढत होते. मात्र यंदा ही रक्कम ४ हजारवरून तब्बल १२ हजार रुपये प्रतिहेक्टर भरावी लागणार आहे, असे नुकतेच प्रसिध्द झालेल्या परिपत्रकात नमूद केल्याची माहिती शेतकरी जिल्हा विमा प्रतिनिधी पुष्पक खापरे यांनी दिली. २०२० -२१ पर्यंत संत्रा विमा रक्कम प्रति हेक्टरी ४ हजार रुपये होती. तर विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये होती. आता शासनाने संत्रा विमा रक्कम १२ हजार रुपये केली आहे.

शेतकरी हिस्सा १२ हजार असताना ८० हजार रुपये प्रति हे्क्टर संरक्षित रक्कम मिळणार आहे. तसेच गारपीट विम्यासाठी १३३३ रुपये प्रति हेक्टरी शेतकरी हिस्सा वेगळा भरावा लागनार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. अशी एकूण १३ हजार ३३३ रुपये शेतकऱ्याच्या हिश्यावर भरावी लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२ हजार रुपये, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४ हजार रुपये आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २० हजार रुपये प्रति हेक्टरी शेतकरी पीक विमा हिस्सा लागू करण्यात आला आहे.

कोट

शेतकरी आर्थिक परिस्थितीने अडकलेला असताना खाजगीकरणाच्या नावाखाली विमा कंपनीमार्फत लुटण्याचे काम सुरू आहे. राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना लक्षात घेऊन विमा हप्ता कमी करावा. शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा

- पुष्पक खापरे, शेतकरी जिल्हा विमा प्रतिनिधी, चांदूर बाजार