शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

अवकाळी पाऊस आणि दमट हवामानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 20:25 IST

Amravati news oranges यंदाच्या बदललेल्या वातावरणामुळे संत्र्याच्या आंबिया बहराच्या फळगळीमध्ये वाढ झाली आहे. नैसर्गिकपणे होणाऱ्या १५ टक्क्यांपेक्षा ही गळती अधिक असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे१५ टक्क्यांपेक्षा अधिक गळतीने शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : यंदाच्या बदललेल्या वातावरणामुळे संत्र्याच्या आंबिया बहराच्या फळगळीमध्ये वाढ झाली आहे. नैसर्गिकपणे होणाऱ्या १५ टक्क्यांपेक्षा ही गळती अधिक असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

संत्र्याला एप्रिल महिन्यात आंबिया बहर येतो. मात्र, या महिन्यात झालेला पाऊस, दमट वातावरण, दिवसा आणि रात्रीच्या तामपानातील तफावत यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे. विदर्भात प्रामुख्याने नागपूर आणि अमरावती महसूल विभागात या फळपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. संत्र्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असून, वातावरणातील हजारो टन कार्बन डॉय ऑक्साईड शोषून घेऊन पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होत आहे.

काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे फळाची वाढ खुंटली व गळती वाढली आहे. दमट आणि उष्ण वातावरणामुळे फळाच्या देठाजवळ बुरशीचा प्रादुर्भाव झाला असून, काही संप्रेरक व अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळगळीचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. हे रोखण्यासाठी कृषी विभागाने उपाय सुचविले आहेत.

अशी करा उपाययोजना

संत्राबागेला झाडाच्या वाढीप्रमाणे आवश्यकतेनुसार ठिबक संचाने (डबल लाईन) दररोज पाणी द्या. सेंद्रिय व जैविक खते वर्षातून तीनदा आणि फळवाढीच्या अवस्थेत पाण्यात विरघळणारी रासायनिक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य खते महिन्यातून दोन ते तीन वेळा द्यावीत. फळे तोडल्यानंतर ताबडतोब वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्या आणि त्यावर कार्बंडीझम एक टक्के किंवा कॉपर ऑक्सि क्लोराईडची फवारणी केल्यास फळगळ कमी होते. फळगळ कमी करण्याकरिता २,४-डी किंवा जी.ए. (जिब्रेलिक आम्ल ) १.५ ग्रॅम अधिक रोको १०० ग्रॅम किंवा नेटिवो ७० ग्रॅम अधिक १९:१९:१९-६०० ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्य ५०० ग्रॅम अधिक स्टिकर १०० एमएल यांचे १०० लिटर पाण्यात द्रावण करून फवारणी करावी. १५ दिवसांनी पुन्हा दुसरी फवारणी करावी.

फायटोप्थेरा या बुरशी रोगाची लक्षणे

कृषी सल्ला व सेवा वरिष्ठ व्यवस्थापक गुणवंत डफरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत्राझाडांची पाने शेंड्याकडून पिवळी पडून हळूहळू गळत जातात. खोड व फांदी यातून चिकट द्रव स्रवतो. झाडाच्या मुळांचा रंग तपकिरी व काळा पडून त्याला दुर्गधी येते. ही सर्व लक्षणे फायटोप्थेरा या बुरशी रोगाची आहेत. यासाठी संत्रा बागेचे आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन आवश्यक आहे. गादी वाफ्यावर लागवड करणे, पाट पाणी किंवा आळे पद्धतीने ओलीत न करता पूर्णत: ठिंबक सिंचनाचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

...

टॅग्स :agricultureशेती