शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस आणि दमट हवामानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 20:25 IST

Amravati news oranges यंदाच्या बदललेल्या वातावरणामुळे संत्र्याच्या आंबिया बहराच्या फळगळीमध्ये वाढ झाली आहे. नैसर्गिकपणे होणाऱ्या १५ टक्क्यांपेक्षा ही गळती अधिक असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे१५ टक्क्यांपेक्षा अधिक गळतीने शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : यंदाच्या बदललेल्या वातावरणामुळे संत्र्याच्या आंबिया बहराच्या फळगळीमध्ये वाढ झाली आहे. नैसर्गिकपणे होणाऱ्या १५ टक्क्यांपेक्षा ही गळती अधिक असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

संत्र्याला एप्रिल महिन्यात आंबिया बहर येतो. मात्र, या महिन्यात झालेला पाऊस, दमट वातावरण, दिवसा आणि रात्रीच्या तामपानातील तफावत यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे. विदर्भात प्रामुख्याने नागपूर आणि अमरावती महसूल विभागात या फळपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. संत्र्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असून, वातावरणातील हजारो टन कार्बन डॉय ऑक्साईड शोषून घेऊन पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होत आहे.

काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे फळाची वाढ खुंटली व गळती वाढली आहे. दमट आणि उष्ण वातावरणामुळे फळाच्या देठाजवळ बुरशीचा प्रादुर्भाव झाला असून, काही संप्रेरक व अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळगळीचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. हे रोखण्यासाठी कृषी विभागाने उपाय सुचविले आहेत.

अशी करा उपाययोजना

संत्राबागेला झाडाच्या वाढीप्रमाणे आवश्यकतेनुसार ठिबक संचाने (डबल लाईन) दररोज पाणी द्या. सेंद्रिय व जैविक खते वर्षातून तीनदा आणि फळवाढीच्या अवस्थेत पाण्यात विरघळणारी रासायनिक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य खते महिन्यातून दोन ते तीन वेळा द्यावीत. फळे तोडल्यानंतर ताबडतोब वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्या आणि त्यावर कार्बंडीझम एक टक्के किंवा कॉपर ऑक्सि क्लोराईडची फवारणी केल्यास फळगळ कमी होते. फळगळ कमी करण्याकरिता २,४-डी किंवा जी.ए. (जिब्रेलिक आम्ल ) १.५ ग्रॅम अधिक रोको १०० ग्रॅम किंवा नेटिवो ७० ग्रॅम अधिक १९:१९:१९-६०० ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्य ५०० ग्रॅम अधिक स्टिकर १०० एमएल यांचे १०० लिटर पाण्यात द्रावण करून फवारणी करावी. १५ दिवसांनी पुन्हा दुसरी फवारणी करावी.

फायटोप्थेरा या बुरशी रोगाची लक्षणे

कृषी सल्ला व सेवा वरिष्ठ व्यवस्थापक गुणवंत डफरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत्राझाडांची पाने शेंड्याकडून पिवळी पडून हळूहळू गळत जातात. खोड व फांदी यातून चिकट द्रव स्रवतो. झाडाच्या मुळांचा रंग तपकिरी व काळा पडून त्याला दुर्गधी येते. ही सर्व लक्षणे फायटोप्थेरा या बुरशी रोगाची आहेत. यासाठी संत्रा बागेचे आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन आवश्यक आहे. गादी वाफ्यावर लागवड करणे, पाट पाणी किंवा आळे पद्धतीने ओलीत न करता पूर्णत: ठिंबक सिंचनाचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

...

टॅग्स :agricultureशेती