शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस आणि दमट हवामानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 20:25 IST

Amravati news oranges यंदाच्या बदललेल्या वातावरणामुळे संत्र्याच्या आंबिया बहराच्या फळगळीमध्ये वाढ झाली आहे. नैसर्गिकपणे होणाऱ्या १५ टक्क्यांपेक्षा ही गळती अधिक असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे१५ टक्क्यांपेक्षा अधिक गळतीने शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : यंदाच्या बदललेल्या वातावरणामुळे संत्र्याच्या आंबिया बहराच्या फळगळीमध्ये वाढ झाली आहे. नैसर्गिकपणे होणाऱ्या १५ टक्क्यांपेक्षा ही गळती अधिक असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

संत्र्याला एप्रिल महिन्यात आंबिया बहर येतो. मात्र, या महिन्यात झालेला पाऊस, दमट वातावरण, दिवसा आणि रात्रीच्या तामपानातील तफावत यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे. विदर्भात प्रामुख्याने नागपूर आणि अमरावती महसूल विभागात या फळपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. संत्र्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असून, वातावरणातील हजारो टन कार्बन डॉय ऑक्साईड शोषून घेऊन पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होत आहे.

काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे फळाची वाढ खुंटली व गळती वाढली आहे. दमट आणि उष्ण वातावरणामुळे फळाच्या देठाजवळ बुरशीचा प्रादुर्भाव झाला असून, काही संप्रेरक व अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळगळीचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. हे रोखण्यासाठी कृषी विभागाने उपाय सुचविले आहेत.

अशी करा उपाययोजना

संत्राबागेला झाडाच्या वाढीप्रमाणे आवश्यकतेनुसार ठिबक संचाने (डबल लाईन) दररोज पाणी द्या. सेंद्रिय व जैविक खते वर्षातून तीनदा आणि फळवाढीच्या अवस्थेत पाण्यात विरघळणारी रासायनिक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य खते महिन्यातून दोन ते तीन वेळा द्यावीत. फळे तोडल्यानंतर ताबडतोब वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्या आणि त्यावर कार्बंडीझम एक टक्के किंवा कॉपर ऑक्सि क्लोराईडची फवारणी केल्यास फळगळ कमी होते. फळगळ कमी करण्याकरिता २,४-डी किंवा जी.ए. (जिब्रेलिक आम्ल ) १.५ ग्रॅम अधिक रोको १०० ग्रॅम किंवा नेटिवो ७० ग्रॅम अधिक १९:१९:१९-६०० ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्य ५०० ग्रॅम अधिक स्टिकर १०० एमएल यांचे १०० लिटर पाण्यात द्रावण करून फवारणी करावी. १५ दिवसांनी पुन्हा दुसरी फवारणी करावी.

फायटोप्थेरा या बुरशी रोगाची लक्षणे

कृषी सल्ला व सेवा वरिष्ठ व्यवस्थापक गुणवंत डफरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत्राझाडांची पाने शेंड्याकडून पिवळी पडून हळूहळू गळत जातात. खोड व फांदी यातून चिकट द्रव स्रवतो. झाडाच्या मुळांचा रंग तपकिरी व काळा पडून त्याला दुर्गधी येते. ही सर्व लक्षणे फायटोप्थेरा या बुरशी रोगाची आहेत. यासाठी संत्रा बागेचे आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन आवश्यक आहे. गादी वाफ्यावर लागवड करणे, पाट पाणी किंवा आळे पद्धतीने ओलीत न करता पूर्णत: ठिंबक सिंचनाचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

...

टॅग्स :agricultureशेती