शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

संत्रा उत्पादकांना बसणार २०० कोटींचा फटका

By admin | Updated: October 6, 2014 23:04 IST

तालुक्यात जवळ-जवळ ४०० कोटींचा व्यवसाय आंबिया बहाराचा होतो. मात्र यंदा येथील संत्र्याचा व्यापार २०० कोटी रुपयापर्यंत तरी होईल की नाही, याबाबत संत्रा उत्पादकांसह व्यापारी देखील साशंक आहेत.

सुरेश सवळे - चांदूरबाजारतालुक्यात जवळ-जवळ ४०० कोटींचा व्यवसाय आंबिया बहाराचा होतो. मात्र यंदा येथील संत्र्याचा व्यापार २०० कोटी रुपयापर्यंत तरी होईल की नाही, याबाबत संत्रा उत्पादकांसह व्यापारी देखील साशंक आहेत. तालुक्यातील घाटलाडकी, शिरजगाव कसबा, देऊरवाडा, ब्राम्हणवाडा, वणी, विश्रोळी, देऊरवाडा, माधान आदी अनेक गावांमध्ये संत्रा उत्पादक दरवर्षी संत्रा उत्पादनातून लाखो रुपयांची उलाढाल करतात. पण, यंदा अनियमित पावसामुळे व मध्यंतरी बसलेल्या पूर्णा नदीच्या पुराच्या तडाख्याने संत्र्याची नवीन लावलेली झाडे वाहून गेली. तर नदी काठच्या बागांना या अतिरिक्त पाण्याच्या प्रवाहाचा मोठा फटका बसला. सततच्या पावसानंतर वाढलेल्या तापमानामुळे जमिनीतील वाफेमुळे मोठ्या प्रमाणात संत्र्याची फळे गळत आहेत. आता झाडांवर उरलेल्या संत्र्यांची वाढ खुंटली असून या लहान संत्रा फळांना बाजारपेठेत भाव नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. १२०० ते १५०० रुपये अल्प दराने ही संत्री विकावी लागत आहेत. पूर्ण वाढ झालेल्या फळाला असून २ हजार ते २२०० रुपये दर मिळतो. मात्र, यंदा हा भाव मिळणार नाही, असे मत येथील संत्रा व्यापारी व्यक्त करीत आहेत. येथील बाजारपेठेतील संत्री केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गोवा सारख्या राज्यात तर जातातच; शिवाय येथील दर्जेदार संत्री परदेशातसुुध्दा जातात. सर्व राज्यातून व्यापारी या ठिकाणी व्यापार करण्यासाठी येतात. मात्र, एरवी ५ आॅक्टोबरपर्यंत मोठ्या प्रमाणात संत्र्यांची उलाढाल होत होती. ती परिस्थिती यंदा दिसत नाही.अशातच आंबिया बहाराचेही संत्रा उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागण्याचे चित्र दिसून येत आहे. एरवी ४०० कोटींची होणारी संत्र्याची उलाढाल यावेळी २०० कोटींच्या आतच आटोपते की काय, अशी स्थिती आहे. त्यामुळे फळगळतीमुळे तालुक्यातील संत्रा उत्पादकांना २०० कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. एकूणच चांदूरबाजार तालुक्यातील संत्रा उत्पादकांना भविष्यात मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे.