शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:23 IST

सन १९५६ मध्ये भारतातील आधुनिक वैद्यकीय व्यवसाय व वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे नियमन करण्याच्या दृष्टीने मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची स्थापना करण्यात आली.

ठळक मुद्देआयएमएची पत्रपरिषद : भावी डॉक्टरांचे भविष्य धोक्यात

आॅनलाईन लोकमतअमरावती : सन १९५६ मध्ये भारतातील आधुनिक वैद्यकीय व्यवसाय व वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे नियमन करण्याच्या दृष्टीने मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची स्थापना करण्यात आली. पण, आता नव्याने राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) विधेयक आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याने व वैद्यकीय क्षेत्रात पुरेसा अनुभव नसलेल्या अवैद्यकीय लोकाद्वारा चालविल्या जाण्याचा घाट रचला जात असून, याला आयएमएचा विरोध आहे. या विधेयकाच्या विरोधात देशभर ठिकठिकाणी महायात्रा काढण्यात येत असल्याची माहिती (प्रोफेशन प्रोटेक्शन स्किम - पीपीएस) चे अध्यक्ष डॉ. कृष्णा पराते यांनी शनिवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेमध्ये यांनी दिली.मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया ही एक पारदर्शक संघटना बरखास्त करून केंद्र सरकारने वैद्यकीय शिक्षणासंबधी अत्यल्प माहिती असलेल्या अवैद्यकीय प्रतिनिधींचा भरमार असलेल्या आयोेग (एनएमसी) कमिशन स्थापन करण्याचा प्रयत्न चालविले आहे. सदर विधेयक आमच्या व अनेक राजकीय पक्षाच्या खासदारांच्या विरोधामुळे संसदेच्या स्टँडिंग कमिटीकडे पाठविण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. संजय देशपांडे यांनी यावेळी दिली. सदर आयोगातील तरतुदी या भावी डॉक्टरांच्या भविष्यावर विपरीत परिणाम करणारी आहेत तसेच ब्रिज कोर्सव्दारे आयुष डॉक्टरांना सहा महिन्यांचे जुजबी प्रशिक्षण देऊन अ‍ॅलोपॅथी व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाईल, असेही यामध्ये नमूद करण्यात आल्याचे आयएमएचे माजी राज्य उपाध्यक्ष वसंत लुंगे यांनी स्पष्ट केले.आयोगातील तरतुदींमुळे पाल्यांचे डॉक्टर होेण्याची स्वप्न धुळीस मिळू शकते. कारण शासकीय कोटा कमी करून स्वत: फी ठरविण्याचा अधिकार असलेल्या खासगी जागांचा कोटा सरकारच्या मर्जीनुसार वाढविण्यात जाणार आहे. सर्व राज्यांना समान प्रतिनिधित्व मिळवण्याचा अधिकार या प्रस्तावित आयोगात हिरावून घेण्यात येणार आहे. या आयोगातील तरतुदीनुसार केवळ पाच राज्यांना साखळी पद्धतीने प्रतिनिधित्व दिले जाईल तसेच अत्यंत कठीण असलेली वैद्यकीय प्रवेश परीक्षा व वैद्यकीय अभ्यासक्रम उत्तीर्ण करूनही वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना मिळविण्यासाठी आणखी एक कठीण परीक्षा (एक्झीट एक्झाम ) द्यावी लागणार आहे.विद्यापीठांशी घेतलेल्या परीक्षांना महत्त्वच उरणार नाही. सगळ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्ण तपासून शिकविण्याऐवजी एक्झिट परीक्षेची तयारी करावी लागेल. असल्याची माहिती नागपूरच्या अध्यक्ष वैशाली खंडाई यांनी दिली. यावेळी अमरावती आयएमएचे अध्यक्ष बी.आर. देशमुख, दिनेश ठाकरे, सचिव दिनेश वाघाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.