शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

निरंकुश बिल्डर, अधिकाऱ्यांवर फौजदारीची मात्रा

By admin | Updated: August 9, 2016 23:55 IST

पैशाच्या जोरावर अशक्य ते शक्य करून बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना धडा शिकविण्यासाठी फौजदारीची मात्रा शोधण्यात आली आहे.

साखळीला बसणार का ब्रेक? : प्रभावी अंमलबजावणीची गरज अमरावती : पैशाच्या जोरावर अशक्य ते शक्य करून बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना धडा शिकविण्यासाठी फौजदारीची मात्रा शोधण्यात आली आहे. प्रशासनातील लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन मोजक्याच काही लोकांनी हा गोरखधंदा सुरू केला आहे. बेकायदेशिर बांधकाम करणारे बिल्डर आणि लाच घेऊन त्या अवैध बांधकामाला खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची रवानगी थेट तुरूंगात करण्याचे सरकारच्या विचाराधिन आहे. राज्यातील अनधिकृत इमारती बांधणारे बांधकाम व्यावसायिक व अशा बांधकामांना झुकतेमाप देणाऱ्या अधिकाऱ्यांना लवकरच फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अनधिकृत बांधकामासंदर्भातील नवीन धोरणामध्ये या कारवाईचा अंतर्भाव करण्यात आल्याने बेकायदेशिर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे तुर्तास दणाणले आहेत. महापालिका व अन्य प्राधिकरणांनी या निर्णयाला तिलांजली न दिल्यास निरंकुश झालेल्या अभद्र युतीला आळा बसू शकेल, अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे सरकारने अनधिकृत बांधकामाबाबतचे नवीन धोरण तयार केले आहे. या धोरणामध्ये सार्वजनिक सोईसाठीची आरक्षणे, रस्ते व अन्य विकासकामांसाठी आरक्षित जमीन तसेच १:५ उतार असलेल्या जमिनीवरील बेकायदा बांधकामे नियमित केली जाणार नाहीत. चटई क्षेत्राचे उल्लंघन तसेच अन्य नियमांची पायमल्ली झाल्यास दंड भरुन ती नियमित केली जाईल. मूळ बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई अनधिकृत बांधकामाच्या नवीन धोरणामध्ये बेकायदेशिर बांधकाम करणाऱ्या मूळ बांधकाम व्यावसायिकावर कारवाईचा समावेश आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी बेकायदा बांधकामे करुन फ्लॅटची विक्री केली आहे. या इमारतींमध्ये नागरिक रहिवासी झाल्याने इमारती पाडल्यास नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे अशा बेकायदेशिर इमारती बांधणारे बांधकाम व्यावसायिक व त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडगा उगारला जाईल. या बेकायदेशिर बांधकामासाठी त्यांना दोषी ठरवून फौजदारी कारवाई केली जाणार आहे.