शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

आपत्ती नियंत्रणासाठी १६ कक्ष कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:10 IST

अमरावती : मान्सूनपूर्व तयारीसाठी प्रशासनाची लगबग सुरू झालेली आहे. यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे १६ नियंत्रण कक्ष १ जूनपासून ...

अमरावती : मान्सूनपूर्व तयारीसाठी प्रशासनाची लगबग सुरू झालेली आहे. यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे १६ नियंत्रण कक्ष १ जूनपासून पुढील चार महिन्यांकरिता उपलब्ध करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे.

जिल्ह्याचा ७० टक्के भूभाग हा ग्रामीण आहे. यामध्ये ४८२ गावे पूरप्रवण आहेत. अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाच्या नियंत्रण कक्ष महत्त्वाचे आहेत. जिल्ह्यात १४ ही तालुक्यांच्या मुख्यालयी तसेच जिल्हा व विभागस्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे १६ कक्ष जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यास, प्रकल्पांमधून पाणी सोडण्यात आल्यास, नदी, नाल्याच्या पात्रांमध्ये नागरिकांनी अतिक्रमण केल्यास डोंगराळ क्षेत्रात अतिवृष्टी यासह अन्य कारणांमुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. यामुळे ४८२ गावे बाधित होत असल्याची नोंद आहे. अशी स्थिती उद्भवल्यास १,९२६ पोहणाऱ्यांची नोंद महसूल प्रशासनाकडे आहे. या सर्व नागरिकांची मदत व शोध, बचाव पथकांच्या साहाय्याने नागरिकांना तत्काळ मदत मिळते.

आपत्ती उद्भवल्यास जिल्ह्यात मोटर बोट ६, लाईफ जॅकेट २२२, रेिंग जीकेट १२६, रोप बंडल २२, सर्च लाईट २२, मेगा फोन २२, ऑक्सिजन किट २२, बीओबी रोप १५, फायर एक्सटीग्युशर ३०, रबर ग्लोव्हज ३० लेदर ग्लोव्हज ३० आदी साहित्य उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आपत्ती प्राधिकरण अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी सांगितले.

बॉक्स

पथकांमध्ये प्रशिक्षित ४१७ मनुष्यबळ

जिल्हा आपत्ती प्राधिकरणाकडे प्रशिक्षित ४१७ मनुष्यबळ आहे. यामध्ये शोध व बचाव पथकात ३५१, प्राथमिक उपचार कक्षात ४, स्कुबा ड्रायव्हर २, मास्टर ट्रेनर १६, एनजीओ २, रेडक्रास सोसायटीचे ४२ मनुष्यबळ उपलब्ध आहे. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने विविध विभागाच्या जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्याची माहिती रामेकर यांनी दिली.