शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जगात केवळ दोनच धर्म!

By admin | Updated: January 10, 2016 00:24 IST

अमरावती : हिंदू धर्म हा शब्दच मुळातच चूक आहे. सिंधूच्या पलीकडे राहणारे हिंदू, अशी संकल्पना इराणी सत्ताधीशांनी मांडली होती.

पुरूषोत्तम नागपुरे : पहिल्या संत साहित्य संमेलनाचे उद्घाटनअमरावती : हिंदू धर्म हा शब्दच मुळातच चूक आहे. सिंधूच्या पलीकडे राहणारे हिंदू, अशी संकल्पना इराणी सत्ताधीशांनी मांडली होती. जगात केवळ दोनच धर्म आहेत, ते म्हणजे ईहवादी आणि परवादी. या दोन धर्मांशिवाय सर्वधर्मसमभाव होऊ शकत नाही. होऊ शकते ते सर्वधर्म सामंजस्य, असे ज्वलंत प्रतिपादन अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळाचे अध्यक्ष पुरूषोत्तम नागपुरे यांनी येथे केले.संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात शनिवारपासून सुरू झालेल्या अ. भा. सर्व संत साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष अशोक कामत यांच्यासह अन्य प्रभूती उपस्थित होत्या. संत साहित्य हे वैश्विक साहित्य आहे. संतांनी विश्वाच्या कल्याणाचा विचार दिला. संत साहित्याचे जागतिक स्तरावर अढळस्थान आहे. आज रंजकतेसाठी निर्माण होणारे साहित्य जन्माला घातले जाते. मात्र उद्याची पिढी घडवायची असेल तर साहित्यिकांनी कीर्तन, भजनावरच न थांबता नवसाहित्याचे निर्माण केले पाहिजे. जे हितार्थ आहे ते साहित्य सहित सर्वांचे साधले जाते. त्यामुळे वैयक्तिक अनुभव न लिहिता संताची विचारसरणी अंगिकारून नवसाहित्य निर्मिती करणे, असे आवाहन नागपुरे यांनी केले. पुण्याच्या साहित्य संमेलनावर त्यांनी जोरदार टीका केली. (प्रतिनिधी)शिकलेला माणूस बलात्कारी झालामाकडाचा माणूस नव्हे, तर माणसाचे माकड झाले असेच म्हणावे लागेल. शिकलेला माणूस ‘चतरा’ झाला. शिकलेला माणूस बलात्कारी झाला, अशी खंत व्यक्त करीत माणसाचा बाह्यविकास झाला. मात्र आंतरविकास झाला नसल्याचे अरूण शेळके म्हणाले. शिवाजी शिक्षण संस्थेचा प्रमुख म्हणून शिक्षणाने विकृती आली आणि सारी मानवताच अपंग आणि विकृत झाल्याचे आपण अधिकारवाणीने सांगू शकतो, असे शेळके म्हणाले. त्यामुळे हृदयाचा विकास साधायचा असेल तर संत साहित्याशिवाय तरणोपाय नाही, असे शेळकेंनी स्पष्ट केले. जब्बार पटेलांचे कवितावाचनहिंगोली येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक जब्बार पटेल यांनी संत नामदेव महाराजांवर कविता सादर करून सभागृहाच्या टाळ्या मिळविल्या. यावेळी स्वागताध्यक्ष देवेंद्र खडसे, उपाध्यक्ष सुभाष सावरकर, माजी मंत्री सुरेंद्र भुयार यांची समयोचित भाषणे झाली. संत साहित्य संमेलनाची गरजआज देशात सर्वत्र अशांत वातावरण दिसत असून जगभर आतंकवादाचे थैमान आहे. त्यामुळे जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या संत साहित्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. जगभर संतांनीच मानवी हिताचा विचार समाजाला देणाऱ्या चिरंतन साहित्याची निर्मिती केलेली आहे. त्या साहित्याला देश, कालाच्या मर्यादा नसतात, संतांचे ते विचार वैश्विक असतात. आज संताची, त्यांच्या साहित्याची गरज यापूर्वी कधीही नव्हती इतकी जाणवू लागली आहे. त्यासाठी संत साहित्याच्या निर्मिती कास धरावी लागणार आहे. सर्व संत साहित्य संमेलनाचे हे प्रयोजन असल्याची भूमिका आयोजकांनी मांडली. ग्रंथदिंडीने सुरूवातसकाळी १० वाजता पहिल्यावहिल्या सर्व संत साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. उद्घाटकीय कार्यक्रमात विविध पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. सभागृहाबाहेर पुस्तकांच्या स्टॉलवर पुस्तके खरेदी करण्यासाठीही चांगली गर्दी होती.संत साहित्य संमेलनात आज काय ?रविवार १० जानेवारीला सकाळी १०.३० वाजता ‘संत साहित्यदर्शन’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यानंतर दुपारी २.३० वाजता संत साहित्यातून उलगडणारे स्त्रीमनाचे भावविश्व या विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये अलका गायकवाड, ज्योती व्यास, स्मिता ठाकरे, नयना कडू, पद्मा सव्वालाखे, लता जावळे यांचा सहभाग राहील. सायंकाळी ५.३० च्या सुमारास सत्यपाल महाराज यांचे प्रबोधन होईल.अत्यल्प उपस्थिती अन् दर्दीअखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला अत्यल्प उपस्थिती होती. मात्र संत संमेलने गर्दीने नव्हे तर दर्दींच्या उपस्थितीने यशस्वी होत असल्याचे सांगत आयोजकांनी पुढील दोन दिवसांत गर्दी वाढेल, अशी अपेक्षा निवेदनादरम्यान व्यक्त केली. एखाद्या साहित्य सोहळ्याला माणसे किती हे महत्त्वाचे नाही. महत्त्व आहे ते सृजन सोहळ्यातील संदेशाला, असे सुभाष सावरकर यांनी सांगितले.