शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

जगात केवळ दोनच धर्म!

By admin | Updated: January 10, 2016 00:24 IST

अमरावती : हिंदू धर्म हा शब्दच मुळातच चूक आहे. सिंधूच्या पलीकडे राहणारे हिंदू, अशी संकल्पना इराणी सत्ताधीशांनी मांडली होती.

पुरूषोत्तम नागपुरे : पहिल्या संत साहित्य संमेलनाचे उद्घाटनअमरावती : हिंदू धर्म हा शब्दच मुळातच चूक आहे. सिंधूच्या पलीकडे राहणारे हिंदू, अशी संकल्पना इराणी सत्ताधीशांनी मांडली होती. जगात केवळ दोनच धर्म आहेत, ते म्हणजे ईहवादी आणि परवादी. या दोन धर्मांशिवाय सर्वधर्मसमभाव होऊ शकत नाही. होऊ शकते ते सर्वधर्म सामंजस्य, असे ज्वलंत प्रतिपादन अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळाचे अध्यक्ष पुरूषोत्तम नागपुरे यांनी येथे केले.संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात शनिवारपासून सुरू झालेल्या अ. भा. सर्व संत साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष अशोक कामत यांच्यासह अन्य प्रभूती उपस्थित होत्या. संत साहित्य हे वैश्विक साहित्य आहे. संतांनी विश्वाच्या कल्याणाचा विचार दिला. संत साहित्याचे जागतिक स्तरावर अढळस्थान आहे. आज रंजकतेसाठी निर्माण होणारे साहित्य जन्माला घातले जाते. मात्र उद्याची पिढी घडवायची असेल तर साहित्यिकांनी कीर्तन, भजनावरच न थांबता नवसाहित्याचे निर्माण केले पाहिजे. जे हितार्थ आहे ते साहित्य सहित सर्वांचे साधले जाते. त्यामुळे वैयक्तिक अनुभव न लिहिता संताची विचारसरणी अंगिकारून नवसाहित्य निर्मिती करणे, असे आवाहन नागपुरे यांनी केले. पुण्याच्या साहित्य संमेलनावर त्यांनी जोरदार टीका केली. (प्रतिनिधी)शिकलेला माणूस बलात्कारी झालामाकडाचा माणूस नव्हे, तर माणसाचे माकड झाले असेच म्हणावे लागेल. शिकलेला माणूस ‘चतरा’ झाला. शिकलेला माणूस बलात्कारी झाला, अशी खंत व्यक्त करीत माणसाचा बाह्यविकास झाला. मात्र आंतरविकास झाला नसल्याचे अरूण शेळके म्हणाले. शिवाजी शिक्षण संस्थेचा प्रमुख म्हणून शिक्षणाने विकृती आली आणि सारी मानवताच अपंग आणि विकृत झाल्याचे आपण अधिकारवाणीने सांगू शकतो, असे शेळके म्हणाले. त्यामुळे हृदयाचा विकास साधायचा असेल तर संत साहित्याशिवाय तरणोपाय नाही, असे शेळकेंनी स्पष्ट केले. जब्बार पटेलांचे कवितावाचनहिंगोली येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक जब्बार पटेल यांनी संत नामदेव महाराजांवर कविता सादर करून सभागृहाच्या टाळ्या मिळविल्या. यावेळी स्वागताध्यक्ष देवेंद्र खडसे, उपाध्यक्ष सुभाष सावरकर, माजी मंत्री सुरेंद्र भुयार यांची समयोचित भाषणे झाली. संत साहित्य संमेलनाची गरजआज देशात सर्वत्र अशांत वातावरण दिसत असून जगभर आतंकवादाचे थैमान आहे. त्यामुळे जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या संत साहित्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. जगभर संतांनीच मानवी हिताचा विचार समाजाला देणाऱ्या चिरंतन साहित्याची निर्मिती केलेली आहे. त्या साहित्याला देश, कालाच्या मर्यादा नसतात, संतांचे ते विचार वैश्विक असतात. आज संताची, त्यांच्या साहित्याची गरज यापूर्वी कधीही नव्हती इतकी जाणवू लागली आहे. त्यासाठी संत साहित्याच्या निर्मिती कास धरावी लागणार आहे. सर्व संत साहित्य संमेलनाचे हे प्रयोजन असल्याची भूमिका आयोजकांनी मांडली. ग्रंथदिंडीने सुरूवातसकाळी १० वाजता पहिल्यावहिल्या सर्व संत साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. उद्घाटकीय कार्यक्रमात विविध पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. सभागृहाबाहेर पुस्तकांच्या स्टॉलवर पुस्तके खरेदी करण्यासाठीही चांगली गर्दी होती.संत साहित्य संमेलनात आज काय ?रविवार १० जानेवारीला सकाळी १०.३० वाजता ‘संत साहित्यदर्शन’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यानंतर दुपारी २.३० वाजता संत साहित्यातून उलगडणारे स्त्रीमनाचे भावविश्व या विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये अलका गायकवाड, ज्योती व्यास, स्मिता ठाकरे, नयना कडू, पद्मा सव्वालाखे, लता जावळे यांचा सहभाग राहील. सायंकाळी ५.३० च्या सुमारास सत्यपाल महाराज यांचे प्रबोधन होईल.अत्यल्प उपस्थिती अन् दर्दीअखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला अत्यल्प उपस्थिती होती. मात्र संत संमेलने गर्दीने नव्हे तर दर्दींच्या उपस्थितीने यशस्वी होत असल्याचे सांगत आयोजकांनी पुढील दोन दिवसांत गर्दी वाढेल, अशी अपेक्षा निवेदनादरम्यान व्यक्त केली. एखाद्या साहित्य सोहळ्याला माणसे किती हे महत्त्वाचे नाही. महत्त्व आहे ते सृजन सोहळ्यातील संदेशाला, असे सुभाष सावरकर यांनी सांगितले.