शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

"तरच राष्ट्राची प्रगती होईल", राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं प्रतिपादन

By गणेश वासनिक | Updated: February 23, 2025 22:49 IST

Amravati News: पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स यांसारख्या प्रगत क्षेत्रात शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अभ्यासक्रम तयार करताना जे उद्योगांच्या गरजा पूर्ण करतील.

- गणेश वासनिक  अमरावती - पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स यांसारख्या प्रगत क्षेत्रात शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अभ्यासक्रम तयार करताना जे उद्योगांच्या गरजा पूर्ण करतील. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ रोजगारक्षम बनवता कामा नये, तर त्यांच्यात कामाप्रती आणि जीवनाप्रती योग्य दृष्टिकोनही आणला पाहिजे. तरच वाढलेल्या सामाजिक आनंदाने राष्ट्राचा विकास साधता येईल, असे गौरवोद्वगार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी येथे केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ४१ वा दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सर्वेाच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई होते. यावेळी मंचावर राज्यपालांचे सचिव आयएएस प्रशांत नारनवरे, कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यासह अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, स्टार्टअप इकोसिस्टम आणि इनक्युबेशन केंद्रांनी स्थानिक औद्योगिक मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. अमरावती विभागाच्या शाश्वत विकासासाठी स्थानिक संसाधने आणि प्रतिभांचा सर्वोत्तम वापर करावा. विद्यापीठांनी नवीन ज्ञान तयार करावे. केवळ मजबूत संशोधन आधारित परिसंस्थेद्वारेच केले जाऊ शकते. त्याकरिता शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. विद्यापीठांनी धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नमुना तयार करावा. तसेच वार्षिक शैक्षणिक दिनदर्शिका तयार करून त्याचे पालन करण्याच्या महत्त्वावर भर द्यावा. विद्यार्थ्यांच्या हितांना प्राधान्य देण्याचे काम करावे, असे राज्यपाल म्हणाले. पदवीधर विद्यार्थ्यांनी परदेशी भाषा शिकावीपरदेशी विद्यापीठांशी भागीदारी करून विद्यार्थ्यांसाठी बाजारपेठेच्या मागण्या पूर्ण करणारे नाविन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक देशांना भारतातील विविध क्षेत्रांतील कुशल व्यावसायिकांची गरज आहे. त्यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांनी कोणतीही परदेशी भाषा शिकून त्यात करिअर करावे. विद्यार्थ्यांना परदेशी भाषा संवाद कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी विद्यापीठात त्यांचे परदेशी भाषा कार्यक्रम सुरू करून मजबूत करण्यास प्रोत्साहित करावे, असे राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले.

टॅग्स :Amravatiअमरावती