शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"तरच राष्ट्राची प्रगती होईल", राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं प्रतिपादन

By गणेश वासनिक | Updated: February 23, 2025 22:49 IST

Amravati News: पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स यांसारख्या प्रगत क्षेत्रात शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अभ्यासक्रम तयार करताना जे उद्योगांच्या गरजा पूर्ण करतील.

- गणेश वासनिक  अमरावती - पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स यांसारख्या प्रगत क्षेत्रात शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अभ्यासक्रम तयार करताना जे उद्योगांच्या गरजा पूर्ण करतील. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ रोजगारक्षम बनवता कामा नये, तर त्यांच्यात कामाप्रती आणि जीवनाप्रती योग्य दृष्टिकोनही आणला पाहिजे. तरच वाढलेल्या सामाजिक आनंदाने राष्ट्राचा विकास साधता येईल, असे गौरवोद्वगार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी येथे केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ४१ वा दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सर्वेाच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई होते. यावेळी मंचावर राज्यपालांचे सचिव आयएएस प्रशांत नारनवरे, कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यासह अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, स्टार्टअप इकोसिस्टम आणि इनक्युबेशन केंद्रांनी स्थानिक औद्योगिक मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. अमरावती विभागाच्या शाश्वत विकासासाठी स्थानिक संसाधने आणि प्रतिभांचा सर्वोत्तम वापर करावा. विद्यापीठांनी नवीन ज्ञान तयार करावे. केवळ मजबूत संशोधन आधारित परिसंस्थेद्वारेच केले जाऊ शकते. त्याकरिता शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. विद्यापीठांनी धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नमुना तयार करावा. तसेच वार्षिक शैक्षणिक दिनदर्शिका तयार करून त्याचे पालन करण्याच्या महत्त्वावर भर द्यावा. विद्यार्थ्यांच्या हितांना प्राधान्य देण्याचे काम करावे, असे राज्यपाल म्हणाले. पदवीधर विद्यार्थ्यांनी परदेशी भाषा शिकावीपरदेशी विद्यापीठांशी भागीदारी करून विद्यार्थ्यांसाठी बाजारपेठेच्या मागण्या पूर्ण करणारे नाविन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक देशांना भारतातील विविध क्षेत्रांतील कुशल व्यावसायिकांची गरज आहे. त्यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांनी कोणतीही परदेशी भाषा शिकून त्यात करिअर करावे. विद्यार्थ्यांना परदेशी भाषा संवाद कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी विद्यापीठात त्यांचे परदेशी भाषा कार्यक्रम सुरू करून मजबूत करण्यास प्रोत्साहित करावे, असे राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले.

टॅग्स :Amravatiअमरावती